शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

१२ शेतकºयांना बैलजोडी वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 21:59 IST

अहेरी येथील दानशूरचा राजा गणेश मंडळ व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने यावर्षी अभिनव व सामाजिक उपक्रम राबवून १२ गरजू व गरीब शेतकºयांना मोफत बैलजोडी व गायींचे वाटप केले.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची उपस्थिती : अहेरी दानशूर गणेश मंडळाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अहेरी येथील दानशूरचा राजा गणेश मंडळ व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने यावर्षी अभिनव व सामाजिक उपक्रम राबवून १२ गरजू व गरीब शेतकºयांना मोफत बैलजोडी व गायींचे वाटप केले.बैलजोडी वाटपाच्या कार्यक्रमाला पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे, विश्वहिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत उपाध्यक्ष गोविंद शेंडे, सनद गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते. अहेरी येथील दानशूर राजा गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी गणरायाची प्रतिष्ठापणा केली जाते. गणरायाच्या प्रतिष्ठापणेदरम्यान १० दिवस धार्मिक उत्सवांबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.देशाची अर्थव्यवस्था बळकट होत चालली असली तरी शेतकºयांची आर्थिक परिस्थिती मात्र बेताची बनत चालली आहे. शेती कसण्यासाठी बैलजोडी हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. मात्र बैलजोडी नसल्याने शेती कसणे शक्य होत नाही.गणेशोत्सवादरम्यान लाखो रूपयांचा खर्च केला जातो. काही खर्च अनावश्यकही राहतो. अहेरी येथील दानशूराचा गणेश मंडळाने यावर्षी अनावश्यक खर्चाला आळा घालून वाचलेल्या पैशातून १२ बैलजोड्या व दोन गायी खरेदी केल्या. सदर बैलजोड्या व गायी शेतकºयांना वितरित केल्या. गणेशोत्सव साजरा करण्याबरोबरच सामाजिक उपक्रमही राबविल्याने दानशूर राजा गणेश मंडळाच्या सदस्यांची कौतुक केले जात आहे. प्रास्ताविक प्रविण पुल्लुरवार, संचालन पूर्वा दोंतुलवार तर आभार गुडेल्लीवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष रवी नेलकुद्री, नितीन दोंतुलवार, विनोद जलेला, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा संयोजक अमित बेझलवार, दिगु खतवार, पवन दोंतुलवार, श्रीनिवासी भंडारी, संतोष मंचालवार आदींनी सहकार्य केले.मान्यवरांनी केले उपक्रमाचे कौतुकबैलजोडी वितरण कार्यक्रमाला पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्यासह विश्वहिंदू परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. बैलजोडी वाटपाच्या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम म्हणाले, दानशूर राजा गणेश मंडळाचा उपक्रम राज्यात आदर्श निर्माण करणारा आहे. बैलजोडीचे वाटप करून शेतकºयांना आधार दिला आहे. तर वृध्द नागरिकांना चष्म्यांचे वाटप करून नवी दृष्टी प्रदान केली आहे, असे गौरवोद्गार काढले. उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे, विश्व हिंदू परिषदेचे गोविंद शेंडे, सनद गुप्ता यांनी सुध्दा कौतुक केले.