शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

आलापल्ली ग्रा.पं.कडे सव्वा काेटींचे पथदिवे बिल थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:35 IST

आलापल्ली येथील पथदिव्यांचे विद्युत बिल १ काेटी २३ लाख रुपये आहे. मागील दहा वर्षांपासून पथदिव्यांचे वीज बिल थकीत आहे. ...

आलापल्ली येथील पथदिव्यांचे विद्युत बिल १ काेटी २३ लाख रुपये आहे. मागील दहा वर्षांपासून पथदिव्यांचे वीज बिल थकीत आहे. १५ दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गडचिरोली, संवर्ग विकास अधिकारी अहेरी, वीज वितरण कार्यालय आलापल्ली यांना निवेदन देऊन पथदिवे सुरू करण्यासाठी मागणी केली. एवढ्या मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्यामुळे हे बिल कसे भरायचे? याबाबत तसेच येथील ग्राम विकास अधिकाऱ्याचा प्रभार ग्रामसेविका संध्या गेडाम यांच्याकडे असून त्यांच्याकडे २ ग्रामपंचायती आहेत. त्यामुळे ग्रामसेविका संध्या गेडाम नियमित कार्यालयात उपस्थित राहत नाही. त्यामुळे येथे पूर्ण वेळ ग्राम विकास अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासाठी मार्गदर्शन करण्याची विनंती केली. परंतु दोन्ही कार्यालयाकडून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर शुक्रवारी सरपंच शंकर मेश्राम, उपसरपंच विनोद आकनपल्लीवार, सदस्य पुष्पा अलोणे, सोमेश्वर रामटेके, स्वप्नील श्रीरामवार, शंकर बोलुवार, अनुसया सप्पीडवार, माया कोरेत, संतोष अर्का आदी सदस्यांनी ग्रामपंचायतच्या कार्यालयात कामकाज न करता पोर्चमध्ये बसून दिवसभर लोकांच्या अडचणी जाणून प्रशासनाचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला.

बाॅक्स

अवैध धंदे वाढण्याची शक्यता

आलापल्ली येथील पथदिव्यांची वीज खंडित केल्याने वीजपुरवठा खंडित केला आहे. पथदिवे बंद असल्यामुळे गावात चोरी, अवैध धंदे आणि अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. जोपर्यंत ग्रामपंचायतीच्या पत्राची दखल घेऊन बंद पथदिवे सुरू केले जात नाही. तसेच स्थायी ग्राम विकास अधिकाऱ्याची नियुक्ती हाेत नाही, तोपर्यंत आम्ही कार्यालयात न बसता पाेर्चमध्ये बसूनच काम करणार, असा पवित्रा पदाधिकाऱ्यांचा आहे, असे सरपंच शंकर मेश्राम यांनी लोकमतला सांगितले.