शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

चकमकीत ठार झालेले सर्व इसम नक्षली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 12:10 AM

२२ एप्रिल रोजी भामरागड तालुक्याच्या कसनासूर जंगलात झालेल्या पोलीस नक्षल चकमकीत ३४ नक्षलवादी ठार झाले. सदर घटनेबाबत सत्यशोधन समितीच्या सदस्यांनी सोमवारी पत्र परिषद घेऊन ही चकमक बनावट असल्याचा आरोप केला होता.

ठळक मुद्देमानवाधिकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा दावा : सत्यशोधन समितीचे आरोप ठरविले निराधार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २२ एप्रिल रोजी भामरागड तालुक्याच्या कसनासूर जंगलात झालेल्या पोलीस नक्षल चकमकीत ३४ नक्षलवादी ठार झाले. सदर घटनेबाबत सत्यशोधन समितीच्या सदस्यांनी सोमवारी पत्र परिषद घेऊन ही चकमक बनावट असल्याचा आरोप केला होता. त्या पार्श्वभूमीवर मानवाधिकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पत्र परिषद घेऊन सत्यशोधन समितीचे सर्व आरोप फेटाळले. तसेच कसनासूर चकमकीत ठार झालेले सर्व इसम नक्षलवादी आहेत. झालेली ही चकमक १०० टक्के खरी असून या चकमकीत निरपराध लोकांचा बळी गेला नाही, असा दावा भारतीय मानवाधिकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी गडचिरोली येथे पत्र परिषद घेऊन केला.पत्र परिषदेला मानवाधिकार परिषदेचे प्रदेश अध्यक्ष गजेंद्र डोमळे, प्रदेश निरिक्षक पुरूषोत्तम ठाकरे, विभागीय अध्यक्ष शशिकांत मोकासे, विलास झोडगे, मंगेश कामडी, निखील सुंदरकर, रेवती रेभनकर, दिनेश चुधरी, माधवी कुळमेथे, संजय रामटेके आदी उपस्थित होते.यावेळी पुरूषोत्तम ठाकरे व गजेंद्र डोमळे यांनी सांगितले की, मानवाधिकार परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश मोकाशी यांनी कसनासूर जंगलात झालेल्या नक्षल चकमकीची दखल घेऊन चौकशी समिती तयार केली. या समितीतील सहा पदाधिकाºयांनी ६ मे रोजी कसनासूर व बोरीया गावाला प्रत्यक्ष भेट देऊन या घटनेची सत्यता स्थानिकांकडून जाणून घेतली. सदर चकमक खोटी नसून सत्य आहे, असे चौकशीअंती कळले, असे डोमळे व ठाकरे यावेळी म्हणाले. भारतीय मानवाधिकार परिषद ही नक्षल समर्थक अथवा नक्षलविरोधी नाही. तसेच पोलीस समर्थक अथवा पोलीस विरोधीही नाही, असे स्पष्ट करीत कसनासूर चकमकीबाबत ज्या संस्था व व्यक्तींनी नक्षल समर्थनाची भूमिका घेतली आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच केंद्रीय व राज्य मानवाधिकार आयोगाकडून सदर नक्षल चकमकीची नि:पक्ष चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी