शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

दारू व तंबाखूमुक्तीची लोकचळवळ व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:00 IST

महाराष्ट्र शासन, टाटा ट्रस्ट, सर्च संस्था आणि गडचिरोली जिल्ह्यातील जनता यांच्या संयुक्त सहभागातून मुक्तिपथ अभियान चालविले जात आहे.

ठळक मुद्देअभय बंग यांचा मानस : माध्यमांसोबत साधला संवाद, व्यसनमुक्तीसाठी पोलीस व शिक्षण विभाग सक्रिय

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : महाराष्ट्र शासन, टाटा ट्रस्ट, सर्च संस्था आणि गडचिरोली जिल्ह्यातील जनता यांच्या संयुक्त सहभागातून मुक्तिपथ अभियान चालविले जात आहे. या अभियानातून दारू व तंबाखुमुक्तीसाठीचे कार्य सुरू आहे. या कार्यात आता प्रशासनाकडूनही सहयोग मिळत आहे. मात्र गडचिरोली जिल्हा १०० टक्के दारू व तंबाखूमुक्त होण्यासाठी लोकचळवळ निर्माण होण्याची गरज आहे, असा मानस सर्चचे संस्थापक डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केला.स्थानिक मुक्तीपथच्या जिल्हा कार्यालयात सोमवारी माध्यमांसोबत संवाद या मथळ्यांतर्गत आयोजित बैठकीत त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. जिल्ह्यात १ सप्टेंबर २०१६ पासून दारू व तंबाखुमुक्तीसाठी मुक्तीपथ अभियान राबविण्यात येत आहे. मागील काही दिवसांमध्ये मुक्तीपथच्या माध्यमातून कायदा अंमलबजावणीसाठी पोलीस विभागाच्या माध्यमातून नियोजन केल्या गेले. यामध्ये जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांची पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली व कृतीसाठी नियोजन करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व पोलिस पाटलांची बैठक घेवून कृती आराखडा तयार करण्यात आला. दारू व तंबाखूबंदीसाठी तक्रार नोंदणीसाठी हेल्पलाईन तयार करण्यात आली.अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने विविध तालुक्यात तंबाखूबंदीसाठी धाडी टाकण्यात आल्या. गडचिरोलीत अन्न व औषध विभागाची चमू लहान असल्यामुळे नागपूर येथून सदस्यांना नेमून कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील आदिवासी भागात इलाका बैठकी घेऊन दारूमुक्तीसाठी प्रयत्न करण्यात आले. व्यापक जाणीव जागृती कार्यक्रमांतर्गत गणेश उत्सव, दुर्गा उत्सव, पोळा, मार्कंडादेव व चपराळा यात्रा उत्सवात दारू व तंबाखुमुक्तीसाठी विविध पध्दतींचा वापर करून व्यापक जाणीव जागृती करण्यात आली. याप्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत डॉ. अभय बंग यांनी व्यसन सोडण्याबाबतचे गैरसमज चर्चेदरम्यान दूर केले. यावेळी मुक्तीपथ अभियानाचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, संतोष सावळकर उपस्थित होते.पत्रकारांना पुरस्कारतंबाखू व दारूमुक्तीच्या कार्याला लोकांकडून प्रतिसाद मिळून लोकचळवळ निर्माण होण्याच्या उद्देशाने व्यसनमुक्तीवर लिखाण करणाºया पत्रकारांसाठी पुरस्काराची योजना डॉ. अभय बंग यांनी यावेळी जाहीर केली. माध्यमाने व्यसनमुक्तीची चळवळ उभारावी, असेही ते म्हणाले.३९७ ग्रा.पं.मध्ये व्यसनमुक्ती समित्या स्थापनसध्यास्थितीत जिल्ह्यातील ४५६ पैकी ३९७ ग्रामपंचायतीमंध्ये व्यसनमुक्त समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. १५०० पैकी १२०३ गावांमध्ये गावसंघटन स्थापन करण्यात आले. तर ६४१ गावांनी दारूविक्री बंदीचा ठराव घेतला असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.