शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

दारू व तंबाखूमुक्तीची लोकचळवळ व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:00 IST

महाराष्ट्र शासन, टाटा ट्रस्ट, सर्च संस्था आणि गडचिरोली जिल्ह्यातील जनता यांच्या संयुक्त सहभागातून मुक्तिपथ अभियान चालविले जात आहे.

ठळक मुद्देअभय बंग यांचा मानस : माध्यमांसोबत साधला संवाद, व्यसनमुक्तीसाठी पोलीस व शिक्षण विभाग सक्रिय

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : महाराष्ट्र शासन, टाटा ट्रस्ट, सर्च संस्था आणि गडचिरोली जिल्ह्यातील जनता यांच्या संयुक्त सहभागातून मुक्तिपथ अभियान चालविले जात आहे. या अभियानातून दारू व तंबाखुमुक्तीसाठीचे कार्य सुरू आहे. या कार्यात आता प्रशासनाकडूनही सहयोग मिळत आहे. मात्र गडचिरोली जिल्हा १०० टक्के दारू व तंबाखूमुक्त होण्यासाठी लोकचळवळ निर्माण होण्याची गरज आहे, असा मानस सर्चचे संस्थापक डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केला.स्थानिक मुक्तीपथच्या जिल्हा कार्यालयात सोमवारी माध्यमांसोबत संवाद या मथळ्यांतर्गत आयोजित बैठकीत त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. जिल्ह्यात १ सप्टेंबर २०१६ पासून दारू व तंबाखुमुक्तीसाठी मुक्तीपथ अभियान राबविण्यात येत आहे. मागील काही दिवसांमध्ये मुक्तीपथच्या माध्यमातून कायदा अंमलबजावणीसाठी पोलीस विभागाच्या माध्यमातून नियोजन केल्या गेले. यामध्ये जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांची पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली व कृतीसाठी नियोजन करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व पोलिस पाटलांची बैठक घेवून कृती आराखडा तयार करण्यात आला. दारू व तंबाखूबंदीसाठी तक्रार नोंदणीसाठी हेल्पलाईन तयार करण्यात आली.अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने विविध तालुक्यात तंबाखूबंदीसाठी धाडी टाकण्यात आल्या. गडचिरोलीत अन्न व औषध विभागाची चमू लहान असल्यामुळे नागपूर येथून सदस्यांना नेमून कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील आदिवासी भागात इलाका बैठकी घेऊन दारूमुक्तीसाठी प्रयत्न करण्यात आले. व्यापक जाणीव जागृती कार्यक्रमांतर्गत गणेश उत्सव, दुर्गा उत्सव, पोळा, मार्कंडादेव व चपराळा यात्रा उत्सवात दारू व तंबाखुमुक्तीसाठी विविध पध्दतींचा वापर करून व्यापक जाणीव जागृती करण्यात आली. याप्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत डॉ. अभय बंग यांनी व्यसन सोडण्याबाबतचे गैरसमज चर्चेदरम्यान दूर केले. यावेळी मुक्तीपथ अभियानाचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, संतोष सावळकर उपस्थित होते.पत्रकारांना पुरस्कारतंबाखू व दारूमुक्तीच्या कार्याला लोकांकडून प्रतिसाद मिळून लोकचळवळ निर्माण होण्याच्या उद्देशाने व्यसनमुक्तीवर लिखाण करणाºया पत्रकारांसाठी पुरस्काराची योजना डॉ. अभय बंग यांनी यावेळी जाहीर केली. माध्यमाने व्यसनमुक्तीची चळवळ उभारावी, असेही ते म्हणाले.३९७ ग्रा.पं.मध्ये व्यसनमुक्ती समित्या स्थापनसध्यास्थितीत जिल्ह्यातील ४५६ पैकी ३९७ ग्रामपंचायतीमंध्ये व्यसनमुक्त समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. १५०० पैकी १२०३ गावांमध्ये गावसंघटन स्थापन करण्यात आले. तर ६४१ गावांनी दारूविक्री बंदीचा ठराव घेतला असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.