शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

आलापल्लीचे बसस्थानक कुलूपबंदच

By admin | Updated: May 8, 2014 02:20 IST

अहेरी आगारापासून सात किमी अंतरावर आलापल्ली हे चौफर वर्दळीचे ठिकाण आहे.

 अहेरी : अहेरी आगारापासून सात किमी अंतरावर आलापल्ली हे चौफर वर्दळीचे ठिकाण आहे. या ठिकाणी जुने बसस्थानक आहे. या बसस्थानकात सहाय्यक वाहतूक नियंत्रकाची नियुक्ती महामंडळाच्यावतीने अद्यापही करण्यात न आल्याने आलापल्लीच्या बसस्थानकावरिल वाहतूक नियंत्रकाचे कार्यालय गेल्या अनेक वर्षापासून कुलूपबंदच आहे. आलापल्ली बसस्थानकावरून जवळपास १८ तास बसेस ये-जा करीत असतात. येथून हैद्राबाद, शिर्डी, अमरावती, आकोट, वर्धा, लातूर, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, यवतमाळ आदी लांब पल्ल्याच्या जलद, निमआराम, साधारण बसेस तसेच मानव विकास मिशनच्या स्कूल बसेस धावतात. तसेच वर्धा, नागपूर आदी ठिकाणावरून सिरोंचा, चंद्रपूर, नागपूरकडे लांब पल्ल्याच्या बसेस सरळ धावतात.

भामराग, एटापल्ली, मुलचेरा आदी अतिदुर्गम भागातील मार्गावरही आलापल्ली बसस्थानकावरून बसेस सोडल्या जातात. या ठिकाणी दिवसभर बसेस व प्रवाशांची वर्दळ असते. मात्र या ठिकाणी नियंत्रक कार्यरत नसल्याने या ठिकाणावरून मोठ्या शहराकडे प्रवास करणार्‍या नव्या प्रवाशांना चौकशी करता येत नाही. त्यामुळे अनेक प्रवाशांना कोणत्या मार्गे प्रवास करावा, याची माहिती मिळत नाही. आलापल्ली येथे शासनाच्यावतीने बसस्थानकाच्या नव्या इमारतीचे बांधकाम मंजूर करण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी अद्यापही पक्क्या बसस्थानकाचे बांधकाम करण्यात आले नाही. यामुळे पाच तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आलापल्ली येथे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

आलापल्ली येथे वनविभाग, सार्वजनिक बांधकाम तसेच इतरही विभागाचे कार्यालय आहेत. आलापल्ली शहराची अहेरी, सिरोंचा, भामरागड, मुलचेरा, एटापल्ली या तालुक्यातील नागरिकांचा संबंध येत असतो. ाात्र या ठिकाणी बसस्थानकाची स्वतंत्र इमारत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असते. येथे तत्काळ नवे बसस्थानकाची इमारत उभारून सहाय्यक वाहतूक नियंत्रकाची नियुक्ती करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)