शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ राज्यासह अहेरी जिल्हा निर्माण होणार

By admin | Updated: November 2, 2016 01:14 IST

अहेरी विधानसभा क्षेत्र भौगोलिकदृष्ट्या क्षेत्रफळाने मोठे आहे. गतीने विकास करण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्यासह अहेरी जिल्ह्याची निर्मिती होणार आहे.

शासनस्तरावर हालचाली वाढल्या : अम्ब्रीशराव आत्राम यांची पत्रकार परिषदेत माहितीअहेरी : अहेरी विधानसभा क्षेत्र भौगोलिकदृष्ट्या क्षेत्रफळाने मोठे आहे. गतीने विकास करण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्यासह अहेरी जिल्ह्याची निर्मिती होणार आहे. या दिशेने भाजपप्रणीत केंद्र व राज्य सरकारच्या हालचाली वाढल्या आहेत, अशी माहिती आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यात राज्य सरकारकडून दोन वर्षात झालेल्या विकासकामांचा आढावा त्यांनी सोमवारी राजमहालात पत्रकार परिषद घेऊन मांडला. यावेळी ते बोलत होते. मागील सरकारच्या ३३ वर्षातील विकास कामाच्या तुलनेत भाजप-सेना युती सरकारने अतुलनीय कामगिरी केली आहे. विदर्भ राज्य निर्मितीस शासन कटिबद्ध असून माझ्याकडूनही याकरिता प्रयत्न सुरू आहे, असे ना. आत्राम यांनी सांगितले. जिल्ह्यात आवश्यक मोठ्या नद्यांवर व नाल्यांवर पूल निर्मिती तसेच सिंचन क्षेत्र निर्माण करणे तसेच महामार्ग निर्मिती करण्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे. चामोर्शी, मुलचेरा तालुक्यातील बंगाली बांधवांना त्यांच्या जमिनजुमल्याचे प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी ओपीटीसी आदी माध्यमातून निधी उपलब्ध करावा लागणार आहे. जिल्ह्यातील आलापल्लीसह पाचही मॉडेल स्कूलकरिता अडीच कोटींचा निधी मिळविण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. याशिवाय नागेपल्ली येथे ८.५० कोटी रूपयांच्या नळ योजनेचे भूमिपूजन लवकरच करण्यात येणार आहे. मार्र्कंडा तिर्थस्थळाचा विकास करण्यात येणार आहे. चिन्ना-वेट्रा सिंचन प्रकल्पाचे काम ८० टक्के झाले असून उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असेही ना. आत्राम पत्रकार परिषदेत म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात देश व राज्यात विकासाचा झंझावात सुरू आहे. विविध नाविण्यपूर्ण योजनेतून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची भूमिका शासनाने घेतली आहे, असेही ना. आत्राम यावेळी म्हणाले. यावेळी पत्रकार परिषदेला नगरसेवक गिरीश मद्देर्लावार, अमोल गुडेल्लीवार, सय्यद मिसार आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)मेडिगट्टा सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांसाठी फायदेशीरसिरोंचा तालुक्यातील मेडिगट्टा सिंचन प्रकल्पाच्या पाण्याने एकही घर बुडणार नाही. उलट या सिंचन प्रकल्पामुळे अहेरी व सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. जवळपास २५ हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येणार आहे. या सिंचन प्रकल्पाचे पाणी उलट प्रवाहाने प्राणहिता नदीमार्गाने येणार असल्याने अहेरी तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा होणार आहे. चव्हेला प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर अहेरी तालुका उन्हाळ्यातील पाणीटंचाईच्या समस्यापासून पूर्णत: मुक्त होणार आहे. देवलमरी, रेगुंठा, महागाव हे लघु सिंचन प्रकल्पही लवकरच पूर्ण करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी यावेळी सांगितले.सूरजागड लोह प्रकल्प जिल्ह्यातच होणारएटापल्ली तालुक्यातील सूरजागड लोह प्रकल्प परिसरात लायड मेटल कंपनीमार्फत लोह दगड उत्खननाचे काम करण्यात आले. यातून ३०० मजुरांना २५ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. सूरजागड लोह प्रकल्प एटापल्ली तालुक्यात अथवा अहेरी विधानसभा क्षेत्रातच उभारण्यात येणार आहे, अशी माहिती ना. आत्राम यांनी दिली. प्रकल्पाच्या अनुषंगाने एटापल्ली तालुक्यातील ५०० वर बेरोजगारांना आयटीआय प्रशिक्षणाची गरज आहे. गडचिरोली-सूरजागड लोह मार्गाचे सर्वेक्षण होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.