शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

अहेरी जिल्ह्याला अद्यापही ‘रेड सिग्नल’

By admin | Updated: February 8, 2015 23:46 IST

राज्य सरकारच्यास्तरावर काही नवीन जिल्हे व नवे तालुके निर्माण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे. अहेरी जिल्ह्याची जुनी मागणी असून अद्यापही शासनाकडे

गडचिरोली : राज्य सरकारच्यास्तरावर काही नवीन जिल्हे व नवे तालुके निर्माण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे. अहेरी जिल्ह्याची जुनी मागणी असून अद्यापही शासनाकडे याबाबतचा प्रस्ताव नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे अहेरी जिल्हा निर्मितीला पुन्हा रेड सिग्नलच असल्याचे दिसून येत आहे.राज्यात जवळजवळ सात नवीन जिल्हे निर्माण करण्याबाबत मागणी मागील अनेक वर्षांपासून शासनाकडे होत आहे. सध्या नव्या सरकारने अमरावती जिल्ह्यात नवीन तीन तालुके निर्माण करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. यामध्ये आसेगाव पूर्णा, बडनेरा, चुरणी हे नवे तालुके निर्माण करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात १४ ऐवजी १७ तालुके होतील. राज्य सरकारकडे अनेक नवीन जिल्हे निर्माण करण्यासाठी मागणी आहे. यामध्ये अमरावतीचे विभाजन करून अचलपूर, नागपूरचे विभाजन करून काटोल, चंद्रपूरचे विभाजन करून चिमूर, यवतमाळचे विभाजन करून पुसद, गडचिरोलीचे विभाजन करून अहेरी जिल्हा निर्माण करावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून अहेरी उपविभागातील तालुक्यांचा अंतर हे अडीचशे ते साडेतीनशे किमीच्या अंतरावर आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना गडचिरोली येथे प्रशासकीय कामासाठी येताना आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणावर येतो. ही बाब लक्षात घेऊन अहेरी जिल्हा निर्माण करावा, अशी मागणी जोर धरत आहे. राज्य सरकारने सध्या नवे तालुके व जिल्हे निर्माण करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्याच्या विभाजनाचा कोणताही प्रस्ताव शासनस्तरावर नसल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अहेरी उपविभागावर जिल्हा निर्मितीबाबत प्रतीक्षेची पाळी येणार आहे.