शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

अहेरी शहरात एक कोटींच्या विकास कामांना सुरुवात

By admin | Updated: September 9, 2015 01:35 IST

अहेरी शहरासाठी राज्य शासनाकडून एक कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून सदर निधीतून अहेरी शहरात रस्ते, नाली बांधकाम व इतर कामे केली जाणार आहेत.

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ : रस्ते व नालींची सुविधा होणारअहेरी : अहेरी शहरासाठी राज्य शासनाकडून एक कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून सदर निधीतून अहेरी शहरात रस्ते, नाली बांधकाम व इतर कामे केली जाणार आहेत. या कामाचा शुभारंभ पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला.काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या नेत्र तपासणी शिबिरादरम्यान ज्या नागरिकांना चष्मे लागले, अशा नागरिकांना चष्म्यांचे वाटप पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच राष्ट्रीयकृत बँकेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर अहेरी शहरातील दानशूर चौक ते तहसील कार्यालय, कोत्तूर रोड, बाजारवाडीतील तीन सिमेंट रस्ते, अहेरी शहरातील काही वॉर्डांमधील नाली बांधकाम केले जाणार आहे. यासाठी एक कोटी रूपयांचा खर्च येणार असून त्याचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी अहेरीला संपूर्ण जिल्ह्यात राजनगरी संबोधल्या जाते. त्यामुळे अहेरी शहराचा विकास करून एखाद्या राजाच्या नगराप्रमाणे हे शहर ठेवण्याचे आश्वासन आपण निवडणुकीच्या वेळी दिले होते. नागरिकांना दिलेले आश्वासन आपण पाळणार आहोत. राज्य शासनाकडून यासाठी निधी खेचून आणला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिले. ज्या कामांचा अहेरीत शुभारंभ करण्यात आला आहे, त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. शहरातील समस्या नागरिकांनी आपल्या लक्षात आणून द्याव्या, अधिकाऱ्यांच्या मार्फतीने पाठपुरावा करून त्या सोडविल्या जातील, असेही आश्वासन दिले. या कार्यक्रमाला अहेरी येथील नागरिक, भाजपा व नाग विदर्भ आंदोलन समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. येथील कार्यक्रम आटोपून पालकमंत्री मुलचेरा तालुक्याच्या दौऱ्यावर रवाना झाले. (प्रतिनिधी)