शहरं
Join us  
Trending Stories
1
कपडे फाडले; लाथा मारल्या, धमकी दिली, जगतापांनी आयोगाला दिलेल्या तक्रार अर्जात धक्कादायक बाबी समोर
2
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
3
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बनवले तरुणींचे अश्लील व्हिडीओ; ७ आरोपींची पोलिसांनी काढली धिंड
4
ऑपरेशन सिंदूर: सैन्याने IPS अधिकाऱ्याचा सन्मान का केला? पाकिस्तानचा रहीम यार खान एअरबेस जवळच होता...
5
बुलेट ट्रेनचं देशातील पहिलं रेल्वे स्टेशन बांधून तयार, या दोन स्थानकांदरम्यान धावणार पहिली ट्रेन
6
कोसळल्या धारा...! केरळमध्ये मान्सून दाखल झाला; महाराष्ट्रात कधी पोहोचणार...
7
Nuclear Weapon : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचं नुकसान झालं? पाकचं परराष्ट्र मंत्रालय म्हणतंय... 
8
"काळजी करू नका…’’ पुंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या पीडितांना राहुल गांधींनी दिला धीर
9
Corona Virus : मास्क लावायला हवा का, बूस्टर डोसची गरज आहे का, कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट किती संसर्गजन्य?
10
'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
11
पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी
12
अरे देवा! तरुणाला चष्मा न लावणं पडलं महागात; ५०० रुपयांऐवजी गमावले तब्बल ९० हजार
13
ट्रम्पच्या 'त्या' निर्णयामुळे बेल्जियमच्या भावी राजकुमारीचे शिक्षण धोक्यात; कोण आहे एलिझाबेथ?
14
Hit And Run : विक्रोळीत भरधाव वेगाने येणारा टँकर दुचाकीवर धडकला; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू, चालक फरार
15
'हयगय केली जाणार नाही', IG जालिंदर सुपेकरांचं नाव चर्चेत, अजित पवारांचा कारवाईचा इशारा
16
कोरोना का वाढतोय? लसीचा प्रभाव संपला की अन्य काही...; २०१९ मध्ये जेव्हा पहिल्यांदा आलेला तेव्हा... 
17
Jyoti Malhotra : "ती गुप्तहेर नाही, फक्त एक..."; पाकिस्तानी बहीण हिरा बतूलने घेतली ज्योती मल्होत्राची बाजू
18
१०० ते १५० लोक, ६१ लॅपटॉप, ४१ मोबाईल, पुण्यात बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड
19
काळरात्र! सर्पदंशाने दोन सख्या भावंडांचा झोपेतच मृत्यू, कोयाळ गाव हादरलं
20
Operation Sindoor : चार वार अन् शत्रू झाला लाचार! भारताची अशी एअर स्ट्राईक जिने पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं 

अहेरी शहर व क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 00:57 IST

जनतेने आपल्यावर जो विश्वास दाखविला आहे, त्याला आपण कदापी तडा जाऊ देणार नाही, विकास कामांसाठी पक्षभेद व जातीभेद विसरून सर्वांनी सहकार्य करावे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे आश्वासन : अहेरीच्या दसरा महोत्सवाची थाटात सांगता

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : जनतेने आपल्यावर जो विश्वास दाखविला आहे, त्याला आपण कदापी तडा जाऊ देणार नाही, विकास कामांसाठी पक्षभेद व जातीभेद विसरून सर्वांनी सहकार्य करावे. अहेरी शहरासह विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहो, असे आश्वासन राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.अहेरी येथे आयोजित ऐतिहासिक दसरा महोत्सवात ते बोलत होते. संपूर्ण महाराष्टÑात प्रसिद्ध असलेल्या अहेरी येथील दसरा महोत्सवात घटस्थापनेपासून सतत नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांची पालखी काढण्यात आली. ना.आत्राम पालखीत बसून जनतेला अभिवादन करीत गडदेवीची पूजा करायला अहेरीलगतच्या गडअहेरी येथे पोहोचले. त्यानंतर देवीची पूजाअर्चा त्यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर आपट्याचे पाने सोने म्हणून वाटण्यास प्रारंभ झाला. अहेरीच्या दसरा महोत्सवाला २०० वर्षांची परंपरा लाभली असून ना. आत्राम यांनी सुरुवातीला रूढी, परंपरा व संस्कृतीविषयी सविस्तर माहिती दिली. राजामाता रूख्मिणीदेवीच्या मार्गदर्शनात त्यांच्या आशीर्वादाने आपण काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. अहेरीचा दसरा महोत्सव हा केवळ राजपरिवाराचा नसून राजपरिवारावर प्रेम करणारा सर्व जनतेचाही आहे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी प्रामुख्याने राजमाता रूख्मिणीदेवी, अवधेशबाबा आत्राम उपस्थित होते.दरम्यान जनतेला संबोधित करताना ना. आत्राम म्हणाले, स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर अमडेली गावात वीज एकाचवेळी पोहोचली. आपण स्वत: महामंडळाच्या एसटीने अमडेली गावात प्रवास करीत पोहोचलो. तेथील ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी तेथील नागरिकांनी गावातील विविध समस्या आपल्या पुढे मांडल्या.वीज, पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य, सिंचन या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहो, कोणतीही समस्या ही एकाचवेळी मार्गी लागणार नाही. पुढील दोन वर्षात आपण या समस्या दूर करण्यासाठी शासनस्तरावर निधीची तरतूद करून त्या मार्गी लावण्यासाठी आपण पूर्ण करू, असेही ना. आत्राम यावेळी म्हणाले. येत्या काही दिवसात आपण अहेरी शहराचा चेहरामोहरा बदलवून टाकणार, असेही त्यांनी यावेळी सांगितले.सदर दसरा महोत्सवाला जवळपास २० हजारवर नागरिक उपस्थित होते. महाराष्टÑ, छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा राज्यासह गडचिरोली व विदर्भातील नागरिकांनी हजेरी लावली होती. दरम्यान यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त सुरक्षा व्यवस्थेसाठी होता.अहेरी जिल्ह्याची घोषणा होणारस्वतंत्र अहेरी जिल्हा करण्यात यावा, ही आपली फार जुनी मागणी आहे. राजे विश्वेश्वरराव महाराज यांनीही स्वतंत्र अहेरी जिल्ह्याचे स्वप्न बघितले होते. हे स्वप्न येत्या काही दिवसात साकार होणार आहे. स्वतंत्र अहेरी जिल्ह्याची निर्मिती होण्यासंदर्भात शासनस्तरावर हालचाली सुरू असून तशी तयारीही शासनाने चालविली आहे. यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. त्यापूर्वी अहेरी शहराचा विकास करण्यासाठी आपण गतीने प्रयत्न करू, असे ना. अम्ब्रिशराव आत्राम यावेळी म्हणाले.वनावर आधारित उद्योग निर्मिती करूगडचिरोली जिल्ह्यात ७८ टक्के जंगल असून अहेरी उपविभागाचा अधिकाधिक भाग जंगलव्याप्त आहे. या जिल्ह्यात पर्यावरण व वनावर आधारित उद्योग निर्मितीला चांगला वाव आहे. पर्यावरणाला चालना देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून येथील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी वनावर आधारित उद्योग निर्माण करण्यात येतील, असेही ना. आत्राम यांनी यावेळी आश्वासित केले.