शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

अहेरी शहर व क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 00:57 IST

जनतेने आपल्यावर जो विश्वास दाखविला आहे, त्याला आपण कदापी तडा जाऊ देणार नाही, विकास कामांसाठी पक्षभेद व जातीभेद विसरून सर्वांनी सहकार्य करावे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे आश्वासन : अहेरीच्या दसरा महोत्सवाची थाटात सांगता

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : जनतेने आपल्यावर जो विश्वास दाखविला आहे, त्याला आपण कदापी तडा जाऊ देणार नाही, विकास कामांसाठी पक्षभेद व जातीभेद विसरून सर्वांनी सहकार्य करावे. अहेरी शहरासह विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहो, असे आश्वासन राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.अहेरी येथे आयोजित ऐतिहासिक दसरा महोत्सवात ते बोलत होते. संपूर्ण महाराष्टÑात प्रसिद्ध असलेल्या अहेरी येथील दसरा महोत्सवात घटस्थापनेपासून सतत नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांची पालखी काढण्यात आली. ना.आत्राम पालखीत बसून जनतेला अभिवादन करीत गडदेवीची पूजा करायला अहेरीलगतच्या गडअहेरी येथे पोहोचले. त्यानंतर देवीची पूजाअर्चा त्यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर आपट्याचे पाने सोने म्हणून वाटण्यास प्रारंभ झाला. अहेरीच्या दसरा महोत्सवाला २०० वर्षांची परंपरा लाभली असून ना. आत्राम यांनी सुरुवातीला रूढी, परंपरा व संस्कृतीविषयी सविस्तर माहिती दिली. राजामाता रूख्मिणीदेवीच्या मार्गदर्शनात त्यांच्या आशीर्वादाने आपण काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. अहेरीचा दसरा महोत्सव हा केवळ राजपरिवाराचा नसून राजपरिवारावर प्रेम करणारा सर्व जनतेचाही आहे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी प्रामुख्याने राजमाता रूख्मिणीदेवी, अवधेशबाबा आत्राम उपस्थित होते.दरम्यान जनतेला संबोधित करताना ना. आत्राम म्हणाले, स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर अमडेली गावात वीज एकाचवेळी पोहोचली. आपण स्वत: महामंडळाच्या एसटीने अमडेली गावात प्रवास करीत पोहोचलो. तेथील ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी तेथील नागरिकांनी गावातील विविध समस्या आपल्या पुढे मांडल्या.वीज, पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य, सिंचन या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहो, कोणतीही समस्या ही एकाचवेळी मार्गी लागणार नाही. पुढील दोन वर्षात आपण या समस्या दूर करण्यासाठी शासनस्तरावर निधीची तरतूद करून त्या मार्गी लावण्यासाठी आपण पूर्ण करू, असेही ना. आत्राम यावेळी म्हणाले. येत्या काही दिवसात आपण अहेरी शहराचा चेहरामोहरा बदलवून टाकणार, असेही त्यांनी यावेळी सांगितले.सदर दसरा महोत्सवाला जवळपास २० हजारवर नागरिक उपस्थित होते. महाराष्टÑ, छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा राज्यासह गडचिरोली व विदर्भातील नागरिकांनी हजेरी लावली होती. दरम्यान यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त सुरक्षा व्यवस्थेसाठी होता.अहेरी जिल्ह्याची घोषणा होणारस्वतंत्र अहेरी जिल्हा करण्यात यावा, ही आपली फार जुनी मागणी आहे. राजे विश्वेश्वरराव महाराज यांनीही स्वतंत्र अहेरी जिल्ह्याचे स्वप्न बघितले होते. हे स्वप्न येत्या काही दिवसात साकार होणार आहे. स्वतंत्र अहेरी जिल्ह्याची निर्मिती होण्यासंदर्भात शासनस्तरावर हालचाली सुरू असून तशी तयारीही शासनाने चालविली आहे. यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. त्यापूर्वी अहेरी शहराचा विकास करण्यासाठी आपण गतीने प्रयत्न करू, असे ना. अम्ब्रिशराव आत्राम यावेळी म्हणाले.वनावर आधारित उद्योग निर्मिती करूगडचिरोली जिल्ह्यात ७८ टक्के जंगल असून अहेरी उपविभागाचा अधिकाधिक भाग जंगलव्याप्त आहे. या जिल्ह्यात पर्यावरण व वनावर आधारित उद्योग निर्मितीला चांगला वाव आहे. पर्यावरणाला चालना देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून येथील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी वनावर आधारित उद्योग निर्माण करण्यात येतील, असेही ना. आत्राम यांनी यावेळी आश्वासित केले.