शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

कृषिपंप अजूनही विजेच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: August 27, 2014 23:28 IST

देसाईगंज शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विजेवर चालणारे मोटार पम्प मिळाले़ पम्प चालविण्याकरिता शेतकऱ्यांनी शेतातील विजेसाठी डिमांडची रक्कम भरून दोन वर्षाचा कालावधी लोटला मात्र

दोन वर्ष लोटले : डिमांड भरले मात्र शेतकऱ्यांना विजेची जोडणी नाहीदेसाईगंज शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विजेवर चालणारे मोटार पम्प मिळाले़ पम्प चालविण्याकरिता शेतकऱ्यांनी शेतातील विजेसाठी डिमांडची रक्कम भरून दोन वर्षाचा कालावधी लोटला मात्र अजूनही शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत़ नैसर्गिक संकट आल्यास शेतकऱ्यांची पिके विजेअभावी करपण्याची भीती देखील वर्तविण्यात येत आहे़ शेतकऱ्यांच्या सर्वागिण विकासाकरीता शासन विविध योजना राबविते मात्र शासकीय योजनांचा फायदा कित्येक शेतकऱ्यांसाठी दिवास्वप्न ठरत आहे़ शासनाच्या योजनेतून शेतकऱ्यांनी शेतात विहिरी बांधल्या. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विजेवर चालणारे मोटार पम्पही मिळाले़ मात्र विजेच्या जोडणीअभावी मोटारपम्प निरूपयोगी झाले आहेत़ शासन आपल्या अखत्यारीतील सर्वच विभागाला शेतकऱ्यांना सहकार्य राखण्याची भाषा बोलत असते़ मात्र शेतकऱ्यांचे वीज वितरण कंपनीमार्फत हाल होत असताना शासन केवळ बघ्याच्या भूमिकेत आहे़ सन २०१३-१४ मध्ये तालुका कृषी विभागामार्फत ३१५ व जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत ९१ विजेवर चालणाऱ्या कृषी पम्पाचे वितरण करण्यात आले़ त्यापैकी अर्ध्यापेक्ष अधिक शेतकऱ्यांची पूर्वीचीच विजेची जोडणी आहे़ शेतातील कृषी पम्पाच्या नवीन वीज जोडणीकरिता मागिल दोन वर्षांपासून शेतकऱ्यांनी डिमांड भरलेला आहे़ दोन वर्षाचा कालावधी लोटूनही अजून पर्यंत शेतकऱ्यांना विजेची जोडणी मिळालेली नाही. जेष्ठता यादीनुसार कृषी पम्पाच्या जोडणीचे काम सुरू आहे असे वीज वितरण कंपनीने सांगितले आहे़ मात्र असे असतांना देखील वीज वितरण कंपनीकडे अजूनही १८० नविन कृषी वीज जोडणी शिल्लक आहे़ यावरून वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांच्या बाबतीत किती उदासीन आहे हे लक्षात येते़ पावसाळयात वीज जोडणी होऊ शकत नाही़ मात्र आॅक्टोबर पासून तर जून महिन्यापर्यंत शेतकऱ्यांच्या शेतात विजेची जोडणी होऊ शकते. जेष्ठता यादीनूसार विजेची जोडणी होत असल्याचा गवगवा कंपनी करीत आहे़ मात्र ही जोडणी खरच त्यानुसार होते किंवा नाही या बाबत शेतकऱ्यांनी शहानिशा करणे गरजेचे आहे़ शेतकऱ्यांकडे विहीर, कृषी पम्प आहे. मात्र नैसर्गीक संकटामुळे शेतकऱ्यांना पाण्याची गरज भासल्यास शेताला पाणी उपलब्ध होऊ शकत नाही पम्प असतानाही विजेअभावी शेतातील पिके करपण्याची वेळ शेतकऱ्यांवर येण्याची शक्यता अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे . (वार्ताहर)