शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
3
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
4
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
5
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
6
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
7
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
8
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
9
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
10
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
11
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
12
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
13
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
14
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
15
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
16
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
17
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
18
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
19
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
20
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला

तलावातील मगरीमुळे नागरिकांमध्ये वाढली उत्कंठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 6:00 AM

तलावाचे मालकी हक्क व नियंत्रण चामोर्शी नगर परिषद प्रशासनाकडे आहे. त्यापूर्वी ग्रामपंचायत प्रशासन तलावाचे नियंत्रण व नियोजन करीत असे. २००२-२००३ मध्ये तलाव जवळपास कोरडा पडल्याने उन्हाळी पिकांसाठी कंत्राटी पद्धतीने दिला होता. तेव्हा चणा व इतर कडधान्य पिकाची लागवड अनेक शेतकऱ्यांनी केली होती.

ठळक मुद्देभीतीचे वातावरण : सुरक्षेची खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चामोर्शी शहराच्या मध्यभागी असलेल्या तलावात नागरिकांना वारंवार मगरीचे दर्शन होत असल्यामुळे मगर पाहण्यासाठी या तलावाकडे येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. पण सोबतच भीतीचेही वातावरणही निर्माण झाले आहे. अनेकांना मगरीचे दर्शन झाले असल्याने लोक विविध प्रकारची चर्चा करीत असल्याचे दिसून येत आहे. मगरीपासून धोका होऊ नये, यासाठी नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.तलावाचे मालकी हक्क व नियंत्रण चामोर्शी नगर परिषद प्रशासनाकडे आहे. त्यापूर्वी ग्रामपंचायत प्रशासन तलावाचे नियंत्रण व नियोजन करीत असे. २००२-२००३ मध्ये तलाव जवळपास कोरडा पडल्याने उन्हाळी पिकांसाठी कंत्राटी पद्धतीने दिला होता. तेव्हा चणा व इतर कडधान्य पिकाची लागवड अनेक शेतकऱ्यांनी केली होती. याचाच या तलावात त्यावेळी मगरीचा मागमूसही नव्हता. त्यानंतरच्या काळात भरपूर पाऊस झाल्यामुळे हा तलाव कोरडा पडला नाही.पावसाळ्याच्या पुरात कुठूनतरी मगरीचे पिल्लू वाहत आले असावे. त्या नर-मादीमुळे या ठिकाणी एका पेक्षा अधिक मगरी असू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. येथील पिल्लू मोठी झाल्याने तलावाच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करीत असावी, अशी शंका येत आहे. या तलावाच्या काठावर महादेवाचे नाग मंदिर असल्याने येथे भाविकांची नेहमी गर्दी असते. निर्माल्य विसर्जन ही नित्याची बाब झाली आहे. या तलावातील मगरीचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे, तशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.तलाव सौंदर्यीकरणाच्या मागणीला जोरचामोर्शी शहरात विरंगुळा व मनोरंजनाचे कोणतेही मोठे साधन नाही. शहराच्या मध्यभागी असलेल्या एकमेव तलावाचे सौंदर्यीकरण करून तेथे नागरिकांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध केल्यास नगर पंचायतीच्या उत्पन्नात भर पडू शकते. त्यामुळे सदर तलावाचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरत आहे. तलावाचे सौंदर्यीकरण केल्यास मगरीसारख्या प्राण्यांचा नागरिकांना त्रास होणार नाही. पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल. तसेच चामोर्शीकरांसाठी विरंगुळ्याचे चांगले स्थळ निर्माण होईल, असा नागरिकांमध्ये सूर आहे.सदर तलावात भरपूर पाणी असल्याने येथील मगरीला पकडणे सध्या अशक्य आहे. या तलावातील पाणी कमी होताच मगरीला पकडले जाईल. तोपर्यंत नागरिकांनी तसेच या तलावात कपडे धुण्यासाठी येणाऱ्या महिलांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. तलावाच्या पाळीवरून ये-जा करणाऱ्यांनीही विशेष खबरदारी घ्यावी.- प्रवीण लेले,वनपरिक्षेत्राधिकारी, चामोर्शीतलावातील मगरीला पकडणे ही वनविभागाची जबाबदारी आहे. वनविभाग आम्हाला जे सहकार्य मागेल ते सहकार्य आम्ही करू.- सतीश चौधरी, मुख्याधिकारी, नगर पंचायत चामोर्शी