शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
4
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
5
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
6
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
7
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
8
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
9
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
10
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
11
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
12
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
13
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
14
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
15
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
16
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
17
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
18
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
19
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
20
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...

परीक्षेच्या तोंडावर पुन्हा क्रीडा स्पर्धा

By admin | Updated: February 7, 2015 23:22 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत ११ ते १४ फेब्रुवारीदरम्यान जिल्हा परिषदेच्या प्रांगणात जिल्हास्तरीय शालेय बाल क्रीडा व कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत ११ ते १४ फेब्रुवारीदरम्यान जिल्हा परिषदेच्या प्रांगणात जिल्हास्तरीय शालेय बाल क्रीडा व कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ऐन परीक्षेच्या तोंडावर क्रीडा व कला महोत्सवाचे आयोजन करण्याचे प्रयोजन काय हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला असल्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना आपले काम सोडून क्रीडा स्पर्धांसाठी हजेरी लावावी लागणार आहे. शिवाय या आयोजनावर चार लाखांवर निधीची उधळपट्टीही केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या क्रीडा व सुप्त कलागुणांचा विकास व्हावा या हेतुने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली दिवाळीनंतर केंद्रस्तरीय, तालुकास्तरीय कला व क्रीडा महोत्सव घेण्यात येतात. या संमेलनासाठी जिल्हा परिषदेचा लाखो रूपयाचा निधी खर्च होतो. विद्यार्थ्यांच्या क्रीडा व कला विकासाच्या दृष्टीकोणातून अशा प्रकारचे महोत्सव घेणे गरजेचे आहे. मात्र कला व क्रीडा महोत्सव जानेवारी महिन्यापर्यंतच उरकून घ्यायला पाहिजे होते. मात्र जिल्हा परिषद पोट निवडणुकीच्या आचारसंहितेचा बाऊ करून जि.प. शिक्षण विभागाने ११ फेब्रुवारीपासून चार दिवशीय जिल्हास्तरीय शालेय क्रीडा व कला महोत्सव आयोजित केले आहे. या कला व क्रीडा महोत्सवात सहभागी होणारे विद्यार्थी आपल्या शिक्षकांकडून विविध खेळांचे व कला स्पर्धांची तयारी गेल्या अनेक दिवसांपासून करीत आहेत. यामुळे या महोत्सवात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. महिनाभरानंतर शाळांच्या परीक्षा होतात. त्याच्या तोंडावरच हा क्रीडा महोत्सव जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षक यांना अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे सोडून या महोत्सवासाठी हजेरी लावावी लागणार आहे. जिल्हास्तरावर होणाऱ्या या क्रीडा महोत्सवात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिल्या जाते. मात्र भविष्यात या प्रमाणपत्राच्या भरवशावर खेळाडू विद्यार्थ्यांना कोणताही लाभ मिळत नाही. या क्रीडा स्पर्धांच्या प्रमाणपत्राला कवडीची किमत नसल्याने या स्पर्धांवर निधीची उधळपट्टी का असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांना उगाच क्रीडा संमेलनाच्या नावाखाली वेठीस धरण्याचा हा प्रकार गडचिरोली जिल्हा परिषदेने चालविला आहे. त्यामुळे या क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात याव्या, अशी मागणी पालकांनी केली आहे. दरवर्षी या स्पर्धांवर होणाऱ्या खर्चातून पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे हात ओले होत असल्याने आयोजनावर सर्वांचाच भर असल्याचे दिसते. (स्थानिक प्रतिनिधी)