शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

वडिलांचे अस्थिविसर्जन करून नववधू चढली बोहल्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 23:33 IST

कन्यादान करण्याचे भाग लाभणे सर्वांच्याच नशिबी नसते. ज्याला हे भाग्य लाभते त्या पित्याला आपले जीवन कृतार्थ झाल्याचा आनंद नक्कीच लाभतो. अशाच आनंदात मुलीच्या लग्नाची तयारी करत असलेल्या वडिलाचा ऐन लग्नाच्या दोन दिवसांपूर्वी उष्माघाताने मृत्यू झाला.

ठळक मुद्देकोरचीतील घटना : लग्न दोन दिवसांवर असताना वडिलांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कन्यादान करण्याचे भाग लाभणे सर्वांच्याच नशिबी नसते. ज्याला हे भाग्य लाभते त्या पित्याला आपले जीवन कृतार्थ झाल्याचा आनंद नक्कीच लाभतो. अशाच आनंदात मुलीच्या लग्नाची तयारी करत असलेल्या वडिलाचा ऐन लग्नाच्या दोन दिवसांपूर्वी उष्माघाताने मृत्यू झाला. पण ते दु:ख गिळून त्यांच्या लेकीने सकाळी वडिलांचे अस्थिविसर्जन करून सायंकाळी बोहोल्यावर चढण्याचा निर्णय घेतला.ही कहानी आहे कोरचीतील विजय बोरकर (५०) व त्यांची मुलगी राणी यांची. गडचिरोली नजीकचा पोर्ला येथील मूळचे रहिवासी असलेले बोरकर कुटुंबीय २० वर्षांपूर्वी उदरनिर्वाह करण्यासाठी कोरचीला आले आणि येथेच स्थायी झाले. कोरचीच्या त्रिमूर्ती वाचनालयाच्या बाजूला शासकीय जागेत झोपडी बांधून ते राहात होते. कुटुंबात पत्नी व एक मुलगी असा छोटासा संसार होता. विजय बोरकर हे टिनटप्पर गोळा करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. पत्नी दुसऱ्याच्या घरची भांडीकुंडी घासून पतीला हातभार लावायची. त्यांना राणी नामक एकुलती एक मुलगी आहे. कुरखेडा तालुक्यातील लेंढारी येथील अनिल शेंडे या युवकाशी तिचा विवाह ठरला. ३० मे रोजी संध्याकाळी विवाहाचा मुहूर्त निघाला. रात्रदिवस राबुन, आहे त्याच परिस्थितीत एकुलत्या एक मुलीचे लग्न चांगल्याप्रकारे लग्न लावण्याची मनोमन इच्छा बाळगून विजय बोरकर कामाला लागले. पण कन्यादान करणे त्यांच्या नशिबीच नव्हते. नियतीने ऐनवेळी घात केला आणि त्यांच्यावर काळाने एकाएकी झडप घातली.हात पिवळे होण्याआधीच पित्यावर अंत्यसंस्कार करण्याची पाळी मुलीवर आली. २९ मे रोजी मंडप पूजन होते. त्यानंतर गुरूवारी ३० मे रोजी सकाळी पित्याचे अस्थिविसर्जन केल्यानंतर संध्याकाळी दु:ख उराशी बाळगून ती बोहल्यावर चढली.हळदीने पिवळे झालेले मुलीचे हात बघण्याची इच्छा विजयची होती. तिच्या लग्नातील आनंदासाठी फार मोठे काबाडकष्ट सहन केले. मात्र मुलीचा आनंदलेला चेहरा बघण्याचे भाग्य अभागी पित्याला लाभले नाही. तर सासरी जाताना वडिलाच्या कुशीत मन हलके करण्याचे भाग्यही राणीला लाभले नाही.अन् स्वप्न अधुरेच राहिलेमुलीच्या लग्नात आवश्यक असणाºया गोष्टी झाल्या का? अजून कशाची गरज आहे? असे प्रश्न ते आपल्या अर्धांगिनीला विचारत होते, तर कधी आपल्या लाडल्या मुलीला काही पाहिजे काय? अशीही विचारणा करीत होते. जसजशी लग्नाची तारीख जवळ येत होती, तसतशी बापाला चिंता भेडसावत होती. लग्न पत्रिका वाटप करण्याबरोबरच इतर कामे करणेही गरजेचे होते. ती कामे करीत असतानाच २८ मे रोजी संध्याकाळी विजय बोरकर यांचा उष्माघाताने मृत्यु झाला.

टॅग्स :marriageलग्न