शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

२३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लाहेरी-भामरागड रस्ता हाेणार चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:34 IST

अतिदुर्गम व नक्षलग्रस्त गाव म्हणून ओळख असलेल्या भामरागड तालुक्यात रस्त्यांचे जाळे अद्यापही पसरले नाही. ग्रामीण भागात पायवाटेनेच नागरिकांना प्रवास ...

अतिदुर्गम व नक्षलग्रस्त गाव म्हणून ओळख असलेल्या भामरागड तालुक्यात रस्त्यांचे जाळे अद्यापही पसरले नाही. ग्रामीण भागात पायवाटेनेच नागरिकांना प्रवास करावा लागताे. अशा स्थितीतही बीआरओमार्फत भामरागड-लाहेरी रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते. गेल्या १० ते १५ वर्षांपासून सदर रस्त्याची दयनीय अवस्था झाली. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी लाहेरी परिसरातील नागरिक करीत होते.परंतु लाेकांचे समाधान करण्यासाठी थातूरमातूर दुरुस्ती दरवर्षी केली जायची. यासाठी लाखो रुपयांचा खर्च व्हायचा. परंतु काहीच उपयाेग हाेत नव्हता. दरवर्षी पावसाळ्यात रस्त्याच्या बाजूला अनेक वाहने फसत हाेती. त्यामुळे अनेकदा वाहतूक बंद व्हायची. ही समस्या लाहेरी परिसरातील नागरिकांसाठी डाेकेदुखीची ठरत हाेती. परंतु या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जायचे. एसटी महामंडळाची बस अनेकवेळा बंद-चालू झाली. याच कालावधीत लाहेरी व धोडराज पोलीस मदत केंद्रातील कर्मचारी व ग्रामस्थांनी श्रमदान करून अनेकवेळा दुरुस्तीसुद्धा केली. मात्र संबंधित विभाग व लोक प्रतिनिधींनी फारसे लक्ष दिले नाही. नागरिकांना खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागत होता. सध्या केंद्र शासनाकडून आलापल्ली-भामरागड-लाहेरी-बिनागुंडा मार्ग छत्तीसगड राज्यातील नारायणपूरला जाेडला जाणार आहे. याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण होऊन हा १८ किमीचा रस्ता चकाचक होण्याची शक्यता आहे.

बाॅक्स

४० गावांना मुख्यालयाशी जाेडणारा मार्ग

लाहेरी परिसरातील ४० गावांना भामरागड तालुका मुख्यालयाला जोडण्यासाठी लाहेरी-भामरागड मार्ग एकमेव आहे. याच मार्गाने नागरिक ये-जा करीत असतात. परंतु बांबू वाहतुकीची जड वाहने याच मार्गाने ये-जा करीत असल्याने चार-पाच वर्षांतच सदर मार्गाची दुरवस्था झाली. डागडुजीअभावी अनेक ठिकाणचे डांबर बेपत्ता होऊन मोठमोठे खड्डे पडले. पावसाळ्यात तर नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागताे. परंतु आता डांबरीकरण हाेत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त हाेत आहे.