शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

२० वर्षानंतर कुरूमपल्लीला मिळाला सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 00:31 IST

अहेरी तालुक्यातील कुरूमपल्ली हे गाव अतिशय संवेदनशील आहे. या गावात नक्षल्यांची दहशत असल्याने सरपंच पदासाठी कुणीही नामांकन सादर करीत नव्हते. २० वर्षांपूर्वी जोगी तलांडी हे सरपंच बनले होते. तब्बल २० वर्षांच्या कालावधीनंतर त्यांची मुलगी मैनी जोगी तलांडी ही सरपंच बनली आहे.

ठळक मुद्देआविसंच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला पुढाकार : माजी सरपंचाच्या मुलीने दाखविली हिंमत

लोकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : अहेरी तालुक्यातील कुरूमपल्ली हे गाव अतिशय संवेदनशील आहे. या गावात नक्षल्यांची दहशत असल्याने सरपंच पदासाठी कुणीही नामांकन सादर करीत नव्हते. २० वर्षांपूर्वी जोगी तलांडी हे सरपंच बनले होते. तब्बल २० वर्षांच्या कालावधीनंतर त्यांची मुलगी मैनी जोगी तलांडी ही सरपंच बनली आहे.विकासाला विरोध करणारे नक्षली स्थानिक नागरिकांना ग्रामपंचायतीचे पदाधिकारी बनण्यासही विरोध करतात. नक्षल्यांचा विरोध पत्करून पदाधिकारी बनलेल्यांना नक्षल्यांच्या दहशतीचाही सामना करावा लागल्याच्या घटना यापूर्वी जिल्ह्यात घडल्या आहेत. कुरूमपल्ली हे गाव नक्षलग्रस्त भागात मोडते. जंगलाने व्यापलेल्या या गावात नक्षल्यांची दहशत होती. २० वर्षांपूर्वी नक्षल दहशत झुगारून जोगी तलांडी हे सरपंच बनले होते. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर एकाही व्यक्तीने सरपंच बनण्याची हिंमत दाखविली नाही. सदस्य जरी बनले तरी सरपंच बनण्यास सदस्य तयार होत नव्हते. आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते तथा माजी आमदार दीपक आत्राम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी ग्रामपंचायत सदस्य मैनी जोगी तलांडी हिला मार्गदर्शन करून हिंमत वाढविली. त्यानंतर तिने सरपंच पदासाठी आविसंतर्फे नामांकन अर्ज दाखल केला. शनिवारच्या विशेष सभेत मैनी तलांडी सरपंच तर मासा येरा मडावी हे बिनविरोध निवडून आले.यावेळी ग्रा.पं. सदस्य अमृता झाडे, गीला गावडे, पोचा कुळमेथे उपस्थित होते. निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून नायब तहसीलदार एन. एल. गुरनुले, तलाठी व्ही. एस. कवठी, ग्रामसेवक एस. बी. पुराम हजर होते. त्याचबरोबर जि.प. सदस्य अजय नैताम, पं.स. सभापती सुरेखा आलाम, पं.स. सदस्य भास्कर तलांडे, कमलापूरच्या सरपंच रजनिता मडावी, वट्राचे सरपंच रवी आत्राम, आविसं कार्यकर्ते दिवाकर आलाम, संतोष ताटीकोंडावार, अशोक झाडे, शैलेश कोंडागुर्ले, राजू आत्राम, इरपा तलांडी उपस्थित होते.गावात जल्लोषतब्बल २० वर्षांच्या कालावधीनंतर गावाला सरपंच मिळाल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. सरपंचाची निवड झाल्यानंतर गावात गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला. सरपंचाच निवडीमुळे गावाच्या विकासाला चालना मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच