शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

१८ वर्षानंतर कैकाडी समाज वस्तीत पोहोचली वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:08 IST

सध्याच्या युगात प्रत्येक घरी वीज पुरवठा असणे काळाची गरज आहे. मात्र वस्तीमध्ये विजच पोहोचली नसेल तर विविध समस्यांना तोंड देत राहावे लागते. गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून चामोर्शी मार्गावर दोन किमी अंतरावर असलेल्या कैकाडी समाज वस्तीत तब्बल १८ वर्षानंतर वीज पोहोचली. यामुळे सदर वस्तीतील कैकाडी समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

ठळक मुद्देसंडे अँकर । १० लाख ८३ हजार रुपयातून झाले विद्युतीकरणाचे काम; ५९ कुटुंबाच्या घरी उजेड; डीपीसह पथदिवेही लावले

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सध्याच्या युगात प्रत्येक घरी वीज पुरवठा असणे काळाची गरज आहे. मात्र वस्तीमध्ये विजच पोहोचली नसेल तर विविध समस्यांना तोंड देत राहावे लागते. गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून चामोर्शी मार्गावर दोन किमी अंतरावर असलेल्या कैकाडी समाज वस्तीत तब्बल १८ वर्षानंतर वीज पोहोचली. यामुळे सदर वस्तीतील कैकाडी समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.गडचिरोली शहराच्या गोकुलनगर, विवेकानंद नगर व इतर मोकळ्या ठिकाणी कैकाडी समाज बांधव आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते. दरम्यान त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. दरम्यान १८ वर्षापूर्वी या समाजातील लोकांनी चामोर्शी मार्गावरील वन विभागाच्या झुडपी जंगलाच्या जागेवर झोपड्या बांधल्या. सद्य:स्थितीत या ठिकाणी ७० कुटुंब वास्तव्यास असून येथील लोकसंख्या ४०० च्या आसपास आहे. या ठिकाणी एक सार्वजनिक विहीर व हातपंप आहे. अलिकडे काही कुटुंबांनी स्वत:च्या घरी खासगी स्वरूपात बोअरवेल खोदले. त्यामुळे पाण्याची समस्या काही प्रमाणात मार्गी लागली आहे. या वस्तीमध्ये वीज पुरवठा नसल्याने सर्पदंशाने दोन ते तीन जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर सदर वस्तीतील नागरिकांनी वीज पुरवठ्याच्या मागणीबाबत नगर परिषद प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला, मात्र यश आले नाही.शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या पाठपुराव्याला यशआॅल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पदाधिकाऱ्यांनी दीड वर्षापूर्वी या वस्तीला भेट देऊन तेथील मूलभूत समस्या जाणून घेतल्या. येथील विजेचा प्रश्न सोडविण्याचा निर्धार त्यांनी केला.त्यानंतर फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय बांबोळे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष पंडीत मेश्राम, उपाध्यक्ष रूपेश सोनटक्के, सचिव अरूण शेंडे, हेमंत मेश्राम आदींनी नगर परिषद, महावितरण तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात वारंवार भेटी देऊन या ठिकाणी विद्युतीकरणाचे काम करण्याची मागणी केली व सतत पाठपुरावा केला.पक्के रस्ते व नाल्यांचा अभावकैकाडी समाज समाज वस्तीत वीज पोहोचविण्यासाठी महावितरणचे कार्यकारी अभियंता विजय मेश्राम यांचे सहकार्य लाभले. ५९ घरी वीज मीटर लावले आहे. मात्र या वस्तीत अद्यापही पक्के रस्ते व नाल्यांचा अभाव आहे. तसेच या वस्तीत प्राथमिक व पूर्व प्राथमिक शिक्षणाची सुविधा नाही. येथे अंगणवाडी व शाळेची सुविधा करणे आवश्यक आहे.

टॅग्स :electricityवीज