शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

१५ वर्षानंतर मोठा झेलिया ग्रामपंचायतीला मिळाला सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 23:55 IST

टिपागड पहाडाच्या कुशीत वसलेल्या मोठा झेलिया या गावातील सरपंचाची १५ वर्षांपूर्वी नक्षल्यांनी हत्या केली होती. त्यानंतर या गावच्या एकाही व्यक्तीने सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य बनण्याची हिंमत दाखविली नाही. त्यामुळे मागील १५ वर्षांपासून या गावाला सरपंच मिळाला नव्हता.

ठळक मुद्देतीन सदस्य अविरोध : पिटेसूरमध्येही निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : टिपागड पहाडाच्या कुशीत वसलेल्या मोठा झेलिया या गावातील सरपंचाची १५ वर्षांपूर्वी नक्षल्यांनी हत्या केली होती. त्यानंतर या गावच्या एकाही व्यक्तीने सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य बनण्याची हिंमत दाखविली नाही. त्यामुळे मागील १५ वर्षांपासून या गावाला सरपंच मिळाला नव्हता. मात्र अधिकाऱ्यांच्या पुढाकारानंतर गांगसाय मडावी या युवकाने सरपंच बनण्याची हिंमत दाखविली. अविरोध निवडून येत तो सरपंच पदावर विराजमान झाला. तब्बल १५ वर्षानंतर गावाला सरपंच मिळाला असून गावाचा विकास लोकशाही पध्दतीने होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे गावकºयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.मोठा झेलिया हे गाव कोरची तालुकास्थळापासून ४० किलोमीटर अंतरावर आहे. धानोरा तालुक्यातील मुरुमगाव येथूनही तेथे जाता येते. कटेझरीनंतर मोठा झेलियाला जाण्यासाठी रस्ताच नाही. पायवाटेचा आधार घेत गाव गाठावे लागते. गाव घनदाट जंगलाने व्यापले असल्याने या गावात आजपर्यंत नक्षल्यांचीच हुकूमत चालत होती. १५ वर्षांपूर्वी येथील सरपंचाला नक्षल्यांनी पोलिसांचा खबºया ठरवत त्याला ठार केले होते. तेव्हापासून या गावात निवडणूक झाली नव्हती. निवडणूक विभागाच्या नियमानुसार प्रत्येक वेळी निवडणूक जाहीर केली जात होती. मात्र कोणीच अर्ज करीत नसल्याने प्रत्येक वेळी या ठिकाणचे सरपंच व सदस्यांचे पद रिक्त राहत होते.अशातच मागच्या वर्षी पुष्पलता कुमरे या कोरची येथे तहसीलदार म्हणून रुजू झाल्या. त्यांनी सर्वप्रथम अतिदुर्गम गावांना भेटी देऊन तेथील नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. मोठा झेलिया, रानकट्टा, पिटेसूर इत्यादी गावांत जाऊन त्यांनी लोकांशी जवळीक साधली. यंदा मार्च महिन्यात त्या गावांत गेल्या होत्या आणि आता २ सप्टेंबरला पुन्हा त्या मोठा झेलिया, पिटेसूरला जाऊन आल्या. त्यांनी गावात २६ सप्टेंबरला ग्रामपंचायतीची निवडणूक असल्याचे सांगितले. परंतु नक्षल दहशतीमुळे कुणी उभा राहण्यास धजावेना. तहसीलदार पुष्पलता कुमरे यांना गांगसाय मडावी हा उच्चशिक्षित युवक शेजारच्या टिपागड पहाडाच्या पायथ्याशी असलेल्या निहायकल गावात असल्याचे कळले. कुमरे यांनी गांगसाय मडावी याच्याशी चर्चा करुन त्यास सरपंच पदासाठी अर्ज करण्यास प्रवृत्त केले. त्याने अर्ज केला. एकमेव अर्ज असल्याने तो अविरोध निवडूनही आला. गांगसाय मडावी हा एम.ए.बी.एड असून बेरोजगार आहे. आज मडावी हा कोरची तालुक्यातील सर्वात उच्चशिक्षित सरपंच आहे. सात सदस्यीय मोठा झेलिया ग्रामपंचायतीत तीन सदस्य अविरोध निवडून आले आहेत.याच परिसरातील पिटेसूर ग्रामपंचायतची सुद्धा निवडणूक झाली नव्हती. चैनुराम गांडोराम ताडामी यांचा एकमेव अर्ज असल्याने तेही अविरोध निवडून आले.प्रमाणपत्रांअभावी काही जागा रिक्तदुर्गम आदिवासीबहुल भागातील लोक अल्पशिक्षित आहेत. त्यामुळे निवडणूक वा अन्य योजनांसाठी कोणती कागदपत्रे लागतात आणि ती कुठून मिळवावी लागतात, याची त्यांना पुरेशी जाणीव नाही. इतर नागरिक अर्ज करण्यास इच्छुक झाले. मात्र त्यांच्याकडे आवश्यक असलेली कागदपत्रे नसल्याने त्यांना निवडून लढता आली नाही. परिणामी मोठा झेलिया गटग्रामपंचायतीमध्ये चार पदे तर नऊ सदस्यीय पिटेसूर ग्रामपंचायतमध्ये दोन पदे रिक्त आहेत. आता इच्छुकांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे लागणार आहे.

टॅग्स :sarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायत