शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
3
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
4
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
5
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
6
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
7
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
8
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
9
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
10
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
11
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
12
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
13
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
14
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
15
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
16
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
17
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
18
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
19
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
20
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

नववी उत्तीर्ण व दहावीचे आवेदनपत्र न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:27 IST

निवेदनात म्हटले की, शासन निर्णय २८ मे २०२१च्या अनुषंगाने इयत्ता १० वीच्या परीक्षेसाठी आवेदन केलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना ...

निवेदनात म्हटले की, शासन निर्णय २८ मे २०२१च्या अनुषंगाने इयत्ता १० वीच्या परीक्षेसाठी आवेदन केलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना इयत्ता ९ वीचे ५० टक्के गुण व १० वीचे अंतर्गत व इतर मिळून ५० टक्के गुण ग्राह्य धरून मूल्यांकनाची पद्धत ठरलेली आहे. त्यानुसार २०२०-२०२१ मध्ये महाराष्ट्र बोर्ड, सीबीएससी बोर्ड व इतर बोर्डाच्या इयत्ता १० वी परीक्षार्थ्यांची संख्या ही अंदाजे १७ लाखांच्या जवळपास आहे. २०२०-२०२१ मध्ये महाराष्ट्र बोर्ड पॉलिटेक्निक व आयटीआयमध्ये प्रवेश क्षमता ही २२ लाख होती. वरील संख्येचा विचार केल्यास अकरावी प्रवेशीत विद्यार्थी संख्या ही अंदाजे परीक्षार्थ्यांची संख्या यामध्ये ५ लाखांचा फरक आहे. याचाच अर्थ उपलब्ध विद्यार्थ्यांच्या तुलनेत उपलब्ध जागांची संख्या जास्त आहे.

चालू सत्रात इयत्ता ११ वीच्या बहुसंख्य तुकड्या, तसेच काही शाळा बंद होऊ शकतात. जे विद्यार्थी ग्रामीण भागातील ऑनलाईन शिक्षण घेऊ न शकल्यामुळे दुरावले व इतर तांत्रिक अडचणींमुळे आवेदन भरू शकले नाहीत; परंतु ९ वीची परीक्षा उत्तीर्ण आहेत, अशा विद्यार्थ्यांनासुद्धा चालू शैक्षणिक वर्षात अकरावीत प्रवेश दिल्यास सोयीचे होऊ शकते. यासाठी शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करून ही समस्या निकाली काढावी, अशी मागणी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष संतोष सुरावार यांनी केली आहे.