शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शहरी भागातील प्रत्येक कुटुंबावर प्रशासनाची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 05:00 IST

जिल्ह्यात कोरोना भरीवर असताना सीईओ म्हणून आशीर्वाद रुजू झाले. कोरोनाची स्थिती जिल्ह्यात सध्या आहे त्यापेक्षाही वाढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. वास्तविक कोरोना हा आजार मुळात गंभीर नाही. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून प्राथमिक स्थितीतच त्यावर उपचार करणे टाळल्यास आजाराची गुंतागुंत वाढून उपचार करण्यापलिकडे जातो. त्यामुळे ही स्थिती येण्याआधीच थोडी जरी लक्षणे दिसली तरी लोकांनी कोरोना चाचणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांची घेणार मदत : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाचा प्रसार शहरातूनच खेड्याकडे होत आहे. त्यामुळे शहरातच कोरोनाला नियंत्रित ठेवल्यास ग्रामीण भागात उदे्रक होणार नाही. त्यामुळे गडचिरोली शहरासह जिल्ह्यातील सर्व शहरी भागात प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्यविषयक स्थितीवर नजर ठेवण्याची स्वतंत्र व्यवस्था प्रशासनाकडून केली जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.जिल्ह्यात कोरोना भरीवर असताना सीईओ म्हणून आशीर्वाद रुजू झाले. कोरोनाची स्थिती जिल्ह्यात सध्या आहे त्यापेक्षाही वाढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. वास्तविक कोरोना हा आजार मुळात गंभीर नाही. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून प्राथमिक स्थितीतच त्यावर उपचार करणे टाळल्यास आजाराची गुंतागुंत वाढून उपचार करण्यापलिकडे जातो. त्यामुळे ही स्थिती येण्याआधीच थोडी जरी लक्षणे दिसली तरी लोकांनी कोरोना चाचणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.सध्या आरोग्य विभागाकडून ग्रामीण भागात आजाराबाबत सर्व्हेक्षण सुरू असले तरी शहरी भागासाठी तेवढे मनुष्यबळ उपलब्ध नाही. त्यामुळे ९ ते ११ वीच्या एक हजार विद्यार्थ्यांची यासाठी मदत घेतली जाईल. ७० हजारच्या घरात लोकसंख्या (२० हजार कुटुंब) असलेल्या गडचिरोली शहरासाठी निवडलेले विद्यार्थी मोबाईलने, व्हॉटस अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून आपल्या परिसरातील २० कुटुंबांच्या संपर्कात राहतील. त्या विद्यार्थ्यांकडील माहिती एमएसडब्ल्यूचे विद्यार्थी आरोग्य विभागाला पुरवेल. यातून कुटुंबांच्या आरोग्यावर लक्ष ठेवले जाईल.तीन ठिकाणी नवीन सुसज्ज कोविड केंद्रजिल्ह्यात आतापर्यंत केवळ जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेले कोविड आरोग्य केंद्र आता सिरोंचा (५० बेड), अहेरी (१०० बेड) आणि एटापल्ली (५० बेड) येथेही सुरू केले जाणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प््यात आहे. त्या ठिकाणी प्रत्येक बेडवर आॅक्सिजनची सुविधा राहणार असून चांगल्या उपचारासाठी डॉक्टरांचे प्रशिक्षणही सुरू आहे.३-३ महिन्यासाठी ऐच्छिक सेवा घेणारजिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. कारण कमी पगारात जिल्ह्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागात सेवा देण्यासाठी जाण्यास कोणी डॉक्टर तयार नसतात. पण सेवाभावी दृष्टिने जे कोणी जाण्यास तयार होतील त्यांना प्रोत्साहन देऊन ३-३ महिन्यासाठी त्यांची सेवा घेतली जाईल. त्यांना हार्डशिप अलाऊन्सही दिला जाईल, असे सीईओ आशीर्वाद यांनी सांगितले.म्हणून प्रशासक म्हणून केवळ अधिकारी ठेवलेकार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून योग्य व्यक्ती निवडावी असे आदेशात म्हटले आहे. पण त्यात शासकीय अधिकारी सोडून दुसऱ्यांची नियुक्ती केली तर त्या नियुक्तीमागे राजकीय प्रभाव असल्याचे मानले जाते. हे टाळण्यासाठी विस्तार अधिकाऱ्यांची कमतरता असतानाही तालुक्याच्या कृषी अधिकाºयांकडे प्रशासक म्हणून जबाबदारी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :zpजिल्हा परिषद