शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

आदिवासींना अनुदान मिळणार

By admin | Updated: May 8, 2014 02:19 IST

राज्याच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने २९ मार्च २०१४ रोजी शासन निर्णय काढून विदर्भ विकास..

शासन मान्यता : सिंचन विहिरींवर विद्युत जोडणीसह पंपाची व्यवस्था

गडचिरोली : राज्याच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने २९ मार्च २०१४ रोजी शासन निर्णय काढून विदर्भ विकास कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागासाठी विशेष उपाययोजनांकरिता सन २०१३-१४ मध्ये नक्षलग्रस्त भागामधील ३० हजार आदिवासी कुटुंबांचे उत्पन्न वाढविण्याच्या योजनेसाठी निधीची तरतूद केली असून वितरीत करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे जिल्ह्यातील आदिवासी शेतकर्‍यांना सिंचन विहिरींवर विद्युत जोडणीसह विद्युत पंप संच बसविण्यासाठी अनुदान मिळणार आहे.

आदिवासी उपयोजनेंतर्गत विदर्भ विकास कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागासाठी विशेष उपाययोजनेंतर्गत नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील ३० हजार आदिवासी कुटुंबाचे उत्पन्न वाढविण्याकरिता आदिवासी विकास विभागाने सन २०११-१२ या वर्षासाठी १५ कोटी रूपयाचा निधी मंजूर केला होता. वित्त विभागाने योजनेंतर्गत सदर आर्थिक वर्षात मंजूर निधीच्या ८५ टक्के मर्यादेत निधी वितरीत करण्याचे धोरण अवलंबिले होते. यामुळे या योजनेंतर्गत केवळ १२.७५ कोटी रूपयाचा निधी वितरीत करण्यात आला होता. सदर योजनेंतर्गत जिल्ह्यातील आदिवासी शेतकर्‍यांच्या बांधण्यात आलेल्या विहिरींवर विद्युत जोडणीसह विद्युत पंप पुरविण्यासाठी क्षेत्रीयस्तरावरून होत असलेल्या मागणीला अनुसरून उर्वरीत २.२५ कोटी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्याच्या मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ७ जानेवारी २०१३ च्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार सन २०१३ च्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात २.२५ कोटी एवढा निधी पुरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आला. सदर निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

२.२५ कोटी रूपयाचा निधी वितरीत करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील आदिवासी शेतकर्‍यांच्या शेतात बांधण्यात आलेल्या विहिरींवर विद्युत जोडणीसह विद्युत पंप व संच बसविण्यासाठी वितरीत करण्यात येणार आहे. प्रत्येक आदिवासी लाभार्थी शेतकर्‍याला विद्युत जोडणीसाठी ६ हजार ५०० व विद्युत पंपासाठी २० हजार असे एकूण २६ हजार ६५० रूपयाचे अनुदान देण्यात येणार असल्याचे २९ मार्च २०१४ च्या शासन निर्णयात म्हटले आहे. सदर विशेष योजनेंतर्गत सिंचन सुविधाचा लाभ नक्षलग्रस्त भागातील आदिवासी क्षेत्रातील लाभार्थ्यांना मिळणार आहे. यासाठी लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील असावा, शेतीविषयक अद्याप एकही लाभ न घेतलेल्या आदिवासी शेतकर्‍यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)