शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

आदिवासीच इथल्या जंगलाचे मालक, नक्षल्यांचा बाऊ करुन अन्याय नको; 'शेकाप'च्या जयंत पाटील यांचा इशारा

By संजय तिपाले | Updated: December 9, 2023 17:31 IST

जिल्ह्यात आदिवासींवर प्रशासनाकडून अन्याय होत असल्याचा आरोप इलाका प्रमुख सैनू गोटा यांनी केला.

गडचिरोली : आदिवासी बांधव हेच इथल्या जंगलाचे बाप अन् मालक आहेत, त्यामुळे त्यांच्यावर अन्याय नको. पेसा कायद्याची अंमलबजावणी करा, नक्षल्यांचा बाऊ करुन आदिवासींवर अन्याय करु नका. लाल बावटा अजून जिवंत आहे, असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई  जयंत पाटील यांनी दिला. येथे प्रागतिक आघाडीच्या झेंड्याखाली डाव्या तसेच आंबेडकरी विचारांचे विविध पक्ष एकत्रित आले असून ९ डिसेंबरला महामोर्चाचे आयोजन केले होते, पण पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे चंद्रपूर रोडवरील लॉन्समध्ये महासभा घेण्यात आली.

अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष बाळासाहेब खोब्रागडे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेशाध्यक्ष हरिष उईके, तुकाराम मस्के, शेकापचे जिल्हा सरचिटणीस रामदास जराते, इलाका प्रमुख सैनू गोटा, रोहिदास राऊत, महेश कोपूलवार, राज बन्सोड, मिलिंद बांबोळे, अमोल मारकवार, ईलियास पठाण, प्रशांत मडावी, कुणाल कोवे, विनोद मडावी,  देवराव चवळे, शामसुंदर उराडे, जयश्री वेळदा यांची उपस्थिती होती. भाई जयंत पाटील म्हणाले, गडचिरोलीत आदिवासी, ओबीसी बांधवांचे अनेक प्रश्न आहेत. वेळोवेळी ते विधिमंडळात मांडून मार्गी लावले आहेत. पेसा व वनकायद्याने स्वतंत्र अधिकारी दिले आहेत. खाण उत्खनन करताना स्थानिक ग्रामसभांची परवानगी घेऊन पेसा कायद्याची अंमलबजावणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. इथल्या नद्या, जंगलांवर प्रकल्पांवर आदिवासींचा अधिकार आहे, वनउपजावर रोजगार आदिवासींना रोजगार मिळतो, त्यामुळे हा रोजगार कोणी हिरावून घेऊ शकत नाही. मोर्चाला परवानगी मिळत नाही, पण खाणींना मिळते. प्रशासनाने हा अन्याय करु नये. जालन्यात आंदोलकांवर लाठीचार्ज केला, आता लाखो लोक रस्त्यावर उतरत आहेत . लाल बावट्याची चळवळ संघर्ष करणारी आहे, असेही त्यांनी सांगितले. अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरु आहे. यावर भाष्य करताना अंगणवाडी सेविकांमुळे मुलांच्या शिक्षणाचा पाया भक्कम आहे. त्यामुळे अंगणवाडीसेविकांना प्राथमिक शिक्षकांचा दर्जा मिळायला हवा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

जे आमच्यासाठी, आम्ही त्यांच्यासाठीजिल्ह्यात आदिवासींवर प्रशासनाकडून अन्याय होत असल्याचा आरोप इलाका प्रमुख सैनू गोटा यांनी केला. आदिवासींनी अन्यायाविरुध्द बोलायचेच नाही का असा सवाल करुन नक्षलसमर्थक ठरवून अटक केली जात असल्याचा दावा त्यांनी केला. जे  आमच्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी... अशा पध्दतीने यापुढील भूमिका राहणार असून जंगल व आदिवासी वाचले पाहिजेत अशी भूमिका त्यांनी मांडली. 

  

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली