शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
2
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
3
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
4
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
5
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
6
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
7
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
8
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
9
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
10
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
11
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
12
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
13
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
14
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
15
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
16
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
17
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
18
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
19
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
20
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

आदिवासीच इथल्या जंगलाचे मालक, नक्षल्यांचा बाऊ करुन अन्याय नको; 'शेकाप'च्या जयंत पाटील यांचा इशारा

By संजय तिपाले | Updated: December 9, 2023 17:31 IST

जिल्ह्यात आदिवासींवर प्रशासनाकडून अन्याय होत असल्याचा आरोप इलाका प्रमुख सैनू गोटा यांनी केला.

गडचिरोली : आदिवासी बांधव हेच इथल्या जंगलाचे बाप अन् मालक आहेत, त्यामुळे त्यांच्यावर अन्याय नको. पेसा कायद्याची अंमलबजावणी करा, नक्षल्यांचा बाऊ करुन आदिवासींवर अन्याय करु नका. लाल बावटा अजून जिवंत आहे, असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई  जयंत पाटील यांनी दिला. येथे प्रागतिक आघाडीच्या झेंड्याखाली डाव्या तसेच आंबेडकरी विचारांचे विविध पक्ष एकत्रित आले असून ९ डिसेंबरला महामोर्चाचे आयोजन केले होते, पण पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे चंद्रपूर रोडवरील लॉन्समध्ये महासभा घेण्यात आली.

अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष बाळासाहेब खोब्रागडे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेशाध्यक्ष हरिष उईके, तुकाराम मस्के, शेकापचे जिल्हा सरचिटणीस रामदास जराते, इलाका प्रमुख सैनू गोटा, रोहिदास राऊत, महेश कोपूलवार, राज बन्सोड, मिलिंद बांबोळे, अमोल मारकवार, ईलियास पठाण, प्रशांत मडावी, कुणाल कोवे, विनोद मडावी,  देवराव चवळे, शामसुंदर उराडे, जयश्री वेळदा यांची उपस्थिती होती. भाई जयंत पाटील म्हणाले, गडचिरोलीत आदिवासी, ओबीसी बांधवांचे अनेक प्रश्न आहेत. वेळोवेळी ते विधिमंडळात मांडून मार्गी लावले आहेत. पेसा व वनकायद्याने स्वतंत्र अधिकारी दिले आहेत. खाण उत्खनन करताना स्थानिक ग्रामसभांची परवानगी घेऊन पेसा कायद्याची अंमलबजावणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. इथल्या नद्या, जंगलांवर प्रकल्पांवर आदिवासींचा अधिकार आहे, वनउपजावर रोजगार आदिवासींना रोजगार मिळतो, त्यामुळे हा रोजगार कोणी हिरावून घेऊ शकत नाही. मोर्चाला परवानगी मिळत नाही, पण खाणींना मिळते. प्रशासनाने हा अन्याय करु नये. जालन्यात आंदोलकांवर लाठीचार्ज केला, आता लाखो लोक रस्त्यावर उतरत आहेत . लाल बावट्याची चळवळ संघर्ष करणारी आहे, असेही त्यांनी सांगितले. अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरु आहे. यावर भाष्य करताना अंगणवाडी सेविकांमुळे मुलांच्या शिक्षणाचा पाया भक्कम आहे. त्यामुळे अंगणवाडीसेविकांना प्राथमिक शिक्षकांचा दर्जा मिळायला हवा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

जे आमच्यासाठी, आम्ही त्यांच्यासाठीजिल्ह्यात आदिवासींवर प्रशासनाकडून अन्याय होत असल्याचा आरोप इलाका प्रमुख सैनू गोटा यांनी केला. आदिवासींनी अन्यायाविरुध्द बोलायचेच नाही का असा सवाल करुन नक्षलसमर्थक ठरवून अटक केली जात असल्याचा दावा त्यांनी केला. जे  आमच्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी... अशा पध्दतीने यापुढील भूमिका राहणार असून जंगल व आदिवासी वाचले पाहिजेत अशी भूमिका त्यांनी मांडली. 

  

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली