शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईल; निर्मला सीतारामन यांचे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
3
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
4
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
5
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
6
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
7
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
8
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
9
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
10
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
11
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
12
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
13
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
14
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
15
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
16
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
17
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
18
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
19
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
20
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!

तीन हजार कृषी वीजपंप जोडा

By admin | Updated: May 3, 2015 01:08 IST

चांगल्या उगणवक्षतेचे बियाणे, योग्य वेळेत खत पुरवून सिंचनाच्या सूक्ष्म नियोजनाद्वारे ...

गडचिरोली : चांगल्या उगणवक्षतेचे बियाणे, योग्य वेळेत खत पुरवून सिंचनाच्या सूक्ष्म नियोजनाद्वारे २ हजार ९५१ कृषी वीजपंपाची जोडणी चालू आर्थिक वर्षात पूर्ण करून शेतकऱ्याच्या हिताचा प्राधान्यांने विचार करा, असे निर्देश आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. आढावा बैठकीला खा. अशोक नेते, जिल्हाधिकारी रणजीतकुमार, आ. क्रिष्णा गजबे, आ. डॉ. देवराव होळी, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, नागपूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक विजयकुमार घावटे, नगराध्यक्ष निर्मला मडके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुडमूलवार, निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी, बाबुराव कोहळे, प्रमोद पिपरे, प्रकाश गेडाम उपस्थित होते.महाराष्ट्र वीज वितरण कंपनीने कृषी विजपंपांची जोडणी करण्याच्या सूचना अनेकदा देऊनही स्थानिक पातळीवर काम अद्यापही पूर्ण झाले नाही. या कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करून दंड आकारावा, तसेच ट्रान्सफार्मबाबत योग्य दक्षता घेऊन शेतकऱ्यांना वेळेत पिकांकरिता पाणी द्यावे, झालेल्या कामाची पाहणी लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन करावी, तसेच पाण्याबाबत सूक्ष्म नियोजन करून बदलत्या वातावरणाचा अभ्यास करावा व शेतीला पाणी द्यावे. कॅनलची वेळीच दुरूस्ती करून पाणी निचरा होणार नाही, याची प्रामुख्याने काळजी घ्यावी, पाणीवाटप संस्थांना विश्वासात घ्यावे, सौरऊर्जेद्वारे सिंचनाची योग्य सोय ज्या ठिकाणी करण्यात आली आहे, तेथील पंप सुस्थितीत करावे, अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक, सातत्याने विचारविनिमय करून सर्व कामे पार पाडावीत, अशा सूचनाही अम्ब्रीशराव आत्राम यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शेतकऱ्यांना अधिक उगवणक्षमता असलेली बियाणे उपलब्ध करून द्यावीत, खत पुरवठादारांनी नियमाप्रमाणे खताची विक्री करावी अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुडमुलवार यांनी केले. (शहर प्रतिनिधी)