शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
3
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
4
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
5
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
6
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
7
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
8
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
9
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
10
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
11
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
12
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
13
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
14
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

तीन हजार कृषी वीजपंप जोडा

By admin | Updated: May 3, 2015 01:08 IST

चांगल्या उगणवक्षतेचे बियाणे, योग्य वेळेत खत पुरवून सिंचनाच्या सूक्ष्म नियोजनाद्वारे ...

गडचिरोली : चांगल्या उगणवक्षतेचे बियाणे, योग्य वेळेत खत पुरवून सिंचनाच्या सूक्ष्म नियोजनाद्वारे २ हजार ९५१ कृषी वीजपंपाची जोडणी चालू आर्थिक वर्षात पूर्ण करून शेतकऱ्याच्या हिताचा प्राधान्यांने विचार करा, असे निर्देश आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. आढावा बैठकीला खा. अशोक नेते, जिल्हाधिकारी रणजीतकुमार, आ. क्रिष्णा गजबे, आ. डॉ. देवराव होळी, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, नागपूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक विजयकुमार घावटे, नगराध्यक्ष निर्मला मडके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुडमूलवार, निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी, बाबुराव कोहळे, प्रमोद पिपरे, प्रकाश गेडाम उपस्थित होते.महाराष्ट्र वीज वितरण कंपनीने कृषी विजपंपांची जोडणी करण्याच्या सूचना अनेकदा देऊनही स्थानिक पातळीवर काम अद्यापही पूर्ण झाले नाही. या कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करून दंड आकारावा, तसेच ट्रान्सफार्मबाबत योग्य दक्षता घेऊन शेतकऱ्यांना वेळेत पिकांकरिता पाणी द्यावे, झालेल्या कामाची पाहणी लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन करावी, तसेच पाण्याबाबत सूक्ष्म नियोजन करून बदलत्या वातावरणाचा अभ्यास करावा व शेतीला पाणी द्यावे. कॅनलची वेळीच दुरूस्ती करून पाणी निचरा होणार नाही, याची प्रामुख्याने काळजी घ्यावी, पाणीवाटप संस्थांना विश्वासात घ्यावे, सौरऊर्जेद्वारे सिंचनाची योग्य सोय ज्या ठिकाणी करण्यात आली आहे, तेथील पंप सुस्थितीत करावे, अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक, सातत्याने विचारविनिमय करून सर्व कामे पार पाडावीत, अशा सूचनाही अम्ब्रीशराव आत्राम यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शेतकऱ्यांना अधिक उगवणक्षमता असलेली बियाणे उपलब्ध करून द्यावीत, खत पुरवठादारांनी नियमाप्रमाणे खताची विक्री करावी अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुडमुलवार यांनी केले. (शहर प्रतिनिधी)