शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदी न पाळणाऱ्यांवर कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:01 IST

मंगळवारी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी बैठक घेऊन अशा नागरिकांविरोधात कडक पावले उचलून कडक कारवाई करावी, असे निर्देश तहसीलदारांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून दिले. तहसीलदार, नगर परिषद मुख्याधिकारी व सर्व तालुका पोलीस अधिकारी यांच्याशी संयुक्तपणे झालेल्या ऑनलाईन बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोहीत गर्ग प्रामुख्याने हजर होते.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : पहिल्या दिवशी अनेक नागरिक पडले घराबाहेर, विनाकारण फिरणाºयांना मिळणार पोलिसांचा ‘प्रसाद’

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात सर्वत्र संचारबंदी लागू केल्यानंतरही काही नागरिक मंगळवारी विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ज्या उद्देशाने संचारबंदी लागू केली तो उद्देशच निष्फळ ठरण्याची शक्यता दिसून आली. यासंदर्भात मंगळवारी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी बैठक घेऊन अशा नागरिकांविरोधात कडक पावले उचलून कडक कारवाई करावी, असे निर्देश तहसीलदारांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून दिले.तहसीलदार, नगर परिषद मुख्याधिकारी व सर्व तालुका पोलीस अधिकारी यांच्याशी संयुक्तपणे झालेल्या ऑनलाईन बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोहीत गर्ग प्रामुख्याने हजर होते.संचारबंदीत कोणी ऐकत नसेल तर पोलिसांना व प्रशासनाला कारवाई करण्याची तरतूद कलम १४४ व साथरोग नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत आहे. संचारबंदीदरम्यान फक्त आवश्यक सेवांसाठीच फिरण्याची परवानगी असताना काही नागरिक विनाकारण फिरत असतील तर हे कायद्याचे उल्लंघन आहे.कोरोना संसर्ग साखळीतील आताची परीस्थिती निर्णायक स्तरावर पोहोचली आहे. नागरिकांनी गांभीर्याने संसर्ग साखळी समजून घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील परिस्थिती चांगली असताना आपण सहकार्य केले नाही तर प्रशासन, पोलीस किंवा आरोग्य विभागही संसर्ग रोखू शकत नाही. जगातील संसर्ग झालेल्या देशांमधील अनुभवावरून फक्त नागरिकच संसर्गसाखळी तोडू शकतात, असे दिसून आले आहे. जनतेच्या हितासाठी प्रशासन कठोर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही. गावस्तरावर पोलीस पाटील व ग्राम पाटील यांची मदत घेतली जाईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी बैठकीत दिली.गडचिरोली शहरातील महात्मा फुले वॉर्डात कोरोना बाधिताच्या भितीने नागरिकांनी काटेरी झाडे टाकून रस्ता अडविला होता.पोलीस, आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन कराजनेतेच्या हितासाठी करोना संसर्ग रोखण्याबाबत प्रशासन वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देत आहे, त्याचे पालन नागरिकांकडून होणे गरजेचे आहे. पोलीस विभागही संचारबंदीच्या अनुषंगाने महत्वाचे योगदान रस्त्यावर उभे राहून देत आहेत. त्यांना नागरीकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोग्यविषयक काळजी घ्या. करोना संसर्ग होवू नये म्हणून कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही. अफवांवर विश्वास ठेवून कोणत्याही स्थितीत चुकीचे उपचार घेवू नका, असे आवाहनही जिल्हाधिकाºयांनी केले.आपली जीवनावश्यक कामे कशी करावीत?सर्वत्र संचारबंदी आहे, मग जीवनावश्यक कामे कशी करावीत यासाठी प्रशासनाकडे विचारणा होत आहे. राज्य शासनाकडून दि.२३ मार्च रोजी याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे सूचना दिलेल्या आहेत. कोणत्याही आरोग्यविषयक आपतकालीन स्थितीत खाजगी वाहतुकीला परवानगी आहे. मात्र त्यांचे बरोबर दोन व्यक्तींना फिरण्यास परवानगी आहे. तसेच आवश्यक किराणा व इतर बाबी खरेदी करण्यासाठी चालक व त्याबरोबर एका व्यक्तीला सूट देण्यात आली आहे. मात्र प्रत्येक फिरणाºया नागरीकांनी फिरत असल्याबाबतचे कारण शासनाने सूट दिलेल्या कारणांपैकी असावे.बाहेरून आलेले ५९५० नागरिक राहणार निरीक्षणातजिल्ह्यात २० मार्च २०२० पासून परदेशातून, परराज्यातून, परजिल्ह्यातून आलेल्या सर्वच प्रवाशांचे घरोघरी जावून सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात मंगळपर्यंत ५९५० प्रवाशांची नोंद करण्यात आलेली आहे. या आकडेवारीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आता खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वच नागरीकांना प्रशासन त्यांच्या घरीच निरीक्षणाखाली ठेवणार आहे.२४ मार्चपासून शासकीय कर्मचारी व आशा यांचेमार्फत घरोघरी जावून त्या प्रवाशांच्या घरावर स्टीकर लावणे व त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. आशामार्फत सदर प्रवाशांच्या घरी भेटी देवून पुढील १४ दिवस पाठपुरावा करण्यात येईल. यासाठी त्या नागरीकांनी सहकार्य करावे, अन्यथा त्यांना सक्तीने शासकीय क्वारंटाईन कक्षात हलविण्यात येणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या