शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

संचारबंदी न पाळणाऱ्यांवर कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:01 IST

मंगळवारी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी बैठक घेऊन अशा नागरिकांविरोधात कडक पावले उचलून कडक कारवाई करावी, असे निर्देश तहसीलदारांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून दिले. तहसीलदार, नगर परिषद मुख्याधिकारी व सर्व तालुका पोलीस अधिकारी यांच्याशी संयुक्तपणे झालेल्या ऑनलाईन बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोहीत गर्ग प्रामुख्याने हजर होते.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : पहिल्या दिवशी अनेक नागरिक पडले घराबाहेर, विनाकारण फिरणाºयांना मिळणार पोलिसांचा ‘प्रसाद’

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात सर्वत्र संचारबंदी लागू केल्यानंतरही काही नागरिक मंगळवारी विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ज्या उद्देशाने संचारबंदी लागू केली तो उद्देशच निष्फळ ठरण्याची शक्यता दिसून आली. यासंदर्भात मंगळवारी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी बैठक घेऊन अशा नागरिकांविरोधात कडक पावले उचलून कडक कारवाई करावी, असे निर्देश तहसीलदारांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून दिले.तहसीलदार, नगर परिषद मुख्याधिकारी व सर्व तालुका पोलीस अधिकारी यांच्याशी संयुक्तपणे झालेल्या ऑनलाईन बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोहीत गर्ग प्रामुख्याने हजर होते.संचारबंदीत कोणी ऐकत नसेल तर पोलिसांना व प्रशासनाला कारवाई करण्याची तरतूद कलम १४४ व साथरोग नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत आहे. संचारबंदीदरम्यान फक्त आवश्यक सेवांसाठीच फिरण्याची परवानगी असताना काही नागरिक विनाकारण फिरत असतील तर हे कायद्याचे उल्लंघन आहे.कोरोना संसर्ग साखळीतील आताची परीस्थिती निर्णायक स्तरावर पोहोचली आहे. नागरिकांनी गांभीर्याने संसर्ग साखळी समजून घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील परिस्थिती चांगली असताना आपण सहकार्य केले नाही तर प्रशासन, पोलीस किंवा आरोग्य विभागही संसर्ग रोखू शकत नाही. जगातील संसर्ग झालेल्या देशांमधील अनुभवावरून फक्त नागरिकच संसर्गसाखळी तोडू शकतात, असे दिसून आले आहे. जनतेच्या हितासाठी प्रशासन कठोर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही. गावस्तरावर पोलीस पाटील व ग्राम पाटील यांची मदत घेतली जाईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी बैठकीत दिली.गडचिरोली शहरातील महात्मा फुले वॉर्डात कोरोना बाधिताच्या भितीने नागरिकांनी काटेरी झाडे टाकून रस्ता अडविला होता.पोलीस, आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन कराजनेतेच्या हितासाठी करोना संसर्ग रोखण्याबाबत प्रशासन वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देत आहे, त्याचे पालन नागरिकांकडून होणे गरजेचे आहे. पोलीस विभागही संचारबंदीच्या अनुषंगाने महत्वाचे योगदान रस्त्यावर उभे राहून देत आहेत. त्यांना नागरीकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोग्यविषयक काळजी घ्या. करोना संसर्ग होवू नये म्हणून कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही. अफवांवर विश्वास ठेवून कोणत्याही स्थितीत चुकीचे उपचार घेवू नका, असे आवाहनही जिल्हाधिकाºयांनी केले.आपली जीवनावश्यक कामे कशी करावीत?सर्वत्र संचारबंदी आहे, मग जीवनावश्यक कामे कशी करावीत यासाठी प्रशासनाकडे विचारणा होत आहे. राज्य शासनाकडून दि.२३ मार्च रोजी याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे सूचना दिलेल्या आहेत. कोणत्याही आरोग्यविषयक आपतकालीन स्थितीत खाजगी वाहतुकीला परवानगी आहे. मात्र त्यांचे बरोबर दोन व्यक्तींना फिरण्यास परवानगी आहे. तसेच आवश्यक किराणा व इतर बाबी खरेदी करण्यासाठी चालक व त्याबरोबर एका व्यक्तीला सूट देण्यात आली आहे. मात्र प्रत्येक फिरणाºया नागरीकांनी फिरत असल्याबाबतचे कारण शासनाने सूट दिलेल्या कारणांपैकी असावे.बाहेरून आलेले ५९५० नागरिक राहणार निरीक्षणातजिल्ह्यात २० मार्च २०२० पासून परदेशातून, परराज्यातून, परजिल्ह्यातून आलेल्या सर्वच प्रवाशांचे घरोघरी जावून सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात मंगळपर्यंत ५९५० प्रवाशांची नोंद करण्यात आलेली आहे. या आकडेवारीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आता खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वच नागरीकांना प्रशासन त्यांच्या घरीच निरीक्षणाखाली ठेवणार आहे.२४ मार्चपासून शासकीय कर्मचारी व आशा यांचेमार्फत घरोघरी जावून त्या प्रवाशांच्या घरावर स्टीकर लावणे व त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. आशामार्फत सदर प्रवाशांच्या घरी भेटी देवून पुढील १४ दिवस पाठपुरावा करण्यात येईल. यासाठी त्या नागरीकांनी सहकार्य करावे, अन्यथा त्यांना सक्तीने शासकीय क्वारंटाईन कक्षात हलविण्यात येणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या