शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

विज्ञान अंगिकारून अंधश्रध्दा दूर सारा

By admin | Updated: December 20, 2014 22:38 IST

जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात विज्ञानाचा प्रसार झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात भूकबळी, कुपोषण, दारिद्र्य आदी सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह सर्वांनीच विज्ञानाचा

विज्ञान, तंत्रज्ञानावर व्याख्यान : अभय बंग यांचे आवाहन गडचिरोली : जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात विज्ञानाचा प्रसार झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात भूकबळी, कुपोषण, दारिद्र्य आदी सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह सर्वांनीच विज्ञानाचा अंगिकार करून अंधश्रध्देला दूर सारावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी केले.कारमेल हायस्कूलमध्ये आयोजित विज्ञान प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी ‘समावेशक विकासासाठी स्वदेशी तंत्रज्ञान’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. निखील जोशी, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, उपशिक्षणाधिकारी निकम आदी उपस्थित होते. देशात व राज्यात गडचिरोलीची वाईट जिल्हा म्हणून ओळख आहे. त्यामुळे या जिल्ह्याविषयी इतर जिल्ह्यात गैरसमज आहे. असे असले तरी हिरवळ, जल, हवा, सुंदर माणसं आदींनी श्रीमंत जिल्हा आहे. मात्र अतिमागास व नक्षलग्रस्त असल्याने शासनही अधिकारी, कर्मचाऱ्यांना धाक दाखवून या जिल्ह्यात ‘पनिशमेंट’ म्हणून सेवा देण्यास पाठवित आहेत. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक क्रांती घडवून आणल्यास जिल्ह्याचा विकास झपाट्याने होईल. प्रत्येकास विज्ञानाविषयी आवड असली पाहिजे. तेव्हाच जिल्ह्यातील प्रत्येकापर्यंत विज्ञान पोहचून जिल्हा विकासाचा मार्ग सुकर होईल. प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञान आहे. मनामध्ये प्रश्न निर्माण होणे ही विज्ञानाची सुरुवात आहे. जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात विज्ञानाचा प्रसार झाला नाही. म्हणून जिल्ह्यात अंधश्रध्दा दिसून येत आहे. त्यामुळे कुपोषण, भूकबळी, साथीचे आजार आदी सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पूर्वीच्या काळात अंधश्रध्देपोटी धान पिकाचे उत्पादन जास्तीचे होते असा समज होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नरबळी दिला जात होता. आता यात बदल झाला असून हा बदल विज्ञानामुळेच झाल्याचे डॉ. अभय बंग यांनी सांगितले. विज्ञान म्हणजे नवे संशोधन असे सांगत लपलेले उघडून काढणे हे विज्ञान आहे. जीवनात विज्ञान येईल तेव्हाच विषमता दूर होईल, असेही डॉ. अभय बंग म्हणाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी समायोचित मार्गदर्शन केले. संचालन व आभार विज्ञान पर्यवेक्षक खराटे यांनी केले. यावेळी बहुसंख्य विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षकवृंद उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)