शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञान अंगिकारून अंधश्रध्दा दूर सारा

By admin | Updated: December 20, 2014 22:38 IST

जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात विज्ञानाचा प्रसार झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात भूकबळी, कुपोषण, दारिद्र्य आदी सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह सर्वांनीच विज्ञानाचा

विज्ञान, तंत्रज्ञानावर व्याख्यान : अभय बंग यांचे आवाहन गडचिरोली : जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात विज्ञानाचा प्रसार झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात भूकबळी, कुपोषण, दारिद्र्य आदी सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह सर्वांनीच विज्ञानाचा अंगिकार करून अंधश्रध्देला दूर सारावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी केले.कारमेल हायस्कूलमध्ये आयोजित विज्ञान प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी ‘समावेशक विकासासाठी स्वदेशी तंत्रज्ञान’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. निखील जोशी, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, उपशिक्षणाधिकारी निकम आदी उपस्थित होते. देशात व राज्यात गडचिरोलीची वाईट जिल्हा म्हणून ओळख आहे. त्यामुळे या जिल्ह्याविषयी इतर जिल्ह्यात गैरसमज आहे. असे असले तरी हिरवळ, जल, हवा, सुंदर माणसं आदींनी श्रीमंत जिल्हा आहे. मात्र अतिमागास व नक्षलग्रस्त असल्याने शासनही अधिकारी, कर्मचाऱ्यांना धाक दाखवून या जिल्ह्यात ‘पनिशमेंट’ म्हणून सेवा देण्यास पाठवित आहेत. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक क्रांती घडवून आणल्यास जिल्ह्याचा विकास झपाट्याने होईल. प्रत्येकास विज्ञानाविषयी आवड असली पाहिजे. तेव्हाच जिल्ह्यातील प्रत्येकापर्यंत विज्ञान पोहचून जिल्हा विकासाचा मार्ग सुकर होईल. प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञान आहे. मनामध्ये प्रश्न निर्माण होणे ही विज्ञानाची सुरुवात आहे. जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात विज्ञानाचा प्रसार झाला नाही. म्हणून जिल्ह्यात अंधश्रध्दा दिसून येत आहे. त्यामुळे कुपोषण, भूकबळी, साथीचे आजार आदी सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पूर्वीच्या काळात अंधश्रध्देपोटी धान पिकाचे उत्पादन जास्तीचे होते असा समज होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नरबळी दिला जात होता. आता यात बदल झाला असून हा बदल विज्ञानामुळेच झाल्याचे डॉ. अभय बंग यांनी सांगितले. विज्ञान म्हणजे नवे संशोधन असे सांगत लपलेले उघडून काढणे हे विज्ञान आहे. जीवनात विज्ञान येईल तेव्हाच विषमता दूर होईल, असेही डॉ. अभय बंग म्हणाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी समायोचित मार्गदर्शन केले. संचालन व आभार विज्ञान पर्यवेक्षक खराटे यांनी केले. यावेळी बहुसंख्य विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षकवृंद उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)