शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

तेंदूपत्ता संकलनाची लगबग वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 23:27 IST

ग्रामीण व दुर्गम भागात तेंदूपत्ता संकलनाच्या कामाला सुरूवात झाली आहे. सकाळपासून दुपारी उशीरापर्यंत तेंदूपत्त्याचे संकलन करून जास्तीत जास्त मजुरी पाडण्यासाठी तेंदूपत्ता मजुरांची लगबग वाढली आहे.

ठळक मुद्देतेंदूपत्ता मजूर रवाना : ग्रामीण भागातही संकलन सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ग्रामीण व दुर्गम भागात तेंदूपत्ता संकलनाच्या कामाला सुरूवात झाली आहे. सकाळपासून दुपारी उशीरापर्यंत तेंदूपत्त्याचे संकलन करून जास्तीत जास्त मजुरी पाडण्यासाठी तेंदूपत्ता मजुरांची लगबग वाढली आहे.गडचिरोली जिल्ह्यात तेंदूपत्त्याची मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. तसेच तेंदूपत्त्याचा दर्जाही चांगला आहे. त्यामुळे येथील तेंदूपत्त्याला राष्ट्रीय बाजारात चांगली मागणी आहे. जवळपास एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तेंदूपत्ता परिपक्व होत असल्याने तेंदूपत्ता संकलनाच्या कामाला सुरूवात झाली आहे. पेसा कायद्यांतर्गत तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार ग्रामसभांना दिले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास ९०० ग्रामसभा स्वत:हून तेंदूपत्ता संकलनाचे काम करीत आहेत.उन्हाळ्यात ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध राहत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील मजूर तेंदूपत्ता संकलनासाठी दुर्गम भागात जातात. यापूर्वी तेंदूपत्ता संकलनाचे काम वन विभाग करीत होते. पेसा कायद्यानंतर मात्र ग्रामसभांना तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार देण्यात आल्याने काही ग्रामसभा स्वत:हून तेंदूपत्ता संकलन करीत आहेत. तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम जवळपास १५ दिवस चालतो. यातून प्रत्येक व्यक्ती पाच ते सहा हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त करते.लोकसभेच्या आचारसंहितेमुळे ग्रामसभांचे कंत्राटदारांसोबत करारनामे करताना अडचणी आल्या होत्या. मात्र आचारसंहिता शिथील होण्याची प्रतीक्षा केल्यास तो पर्यंत तेंदूपत्त्याचा हंगाम हातून निघून गेला असता. त्यामुळे ग्रामसभांनी यातून मार्ग काढत कंत्राटदारासोबत करारनामे केले. त्यामुळे आता तेंदूपत्ता संकलनाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील चार दिवसात तेंदूपत्ता संकलनाला पुन्हा गती येणार आहे.तेंदूपत्त्याचा दर्जा चांगलायावर्षी कडक ऊन पडल्याने तेंदूपत्त्याचा दर्जा अतिशय चांगला आहे. त्यामुळे तेंदूपत्त्याचे अधिकाधिक संकलन करणे मजुरांना शक्य होत आहे. तेंदूपत्त्याचा दर्जा चांगला असल्यास कंत्राटदारालाही व्यापाऱ्याकडून चांगला भाव मिळणार आहे. त्यामुळे मजूर व कंत्राटदार सध्या समाधानी आहेत. बाहेरगावावरून तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या नागरिकांना जंगलातच झोपड्या उभारून राहावे लागते. मात्र मागील काही दिवसांपासून अधूनमधून वादळ वाºयासह पाऊस सुरू आहे. यामुळे नागरिकांचे हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :forest departmentवनविभाग