शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

तेंदूपत्ता संकलनाची लगबग वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 23:27 IST

ग्रामीण व दुर्गम भागात तेंदूपत्ता संकलनाच्या कामाला सुरूवात झाली आहे. सकाळपासून दुपारी उशीरापर्यंत तेंदूपत्त्याचे संकलन करून जास्तीत जास्त मजुरी पाडण्यासाठी तेंदूपत्ता मजुरांची लगबग वाढली आहे.

ठळक मुद्देतेंदूपत्ता मजूर रवाना : ग्रामीण भागातही संकलन सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ग्रामीण व दुर्गम भागात तेंदूपत्ता संकलनाच्या कामाला सुरूवात झाली आहे. सकाळपासून दुपारी उशीरापर्यंत तेंदूपत्त्याचे संकलन करून जास्तीत जास्त मजुरी पाडण्यासाठी तेंदूपत्ता मजुरांची लगबग वाढली आहे.गडचिरोली जिल्ह्यात तेंदूपत्त्याची मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. तसेच तेंदूपत्त्याचा दर्जाही चांगला आहे. त्यामुळे येथील तेंदूपत्त्याला राष्ट्रीय बाजारात चांगली मागणी आहे. जवळपास एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तेंदूपत्ता परिपक्व होत असल्याने तेंदूपत्ता संकलनाच्या कामाला सुरूवात झाली आहे. पेसा कायद्यांतर्गत तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार ग्रामसभांना दिले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास ९०० ग्रामसभा स्वत:हून तेंदूपत्ता संकलनाचे काम करीत आहेत.उन्हाळ्यात ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध राहत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील मजूर तेंदूपत्ता संकलनासाठी दुर्गम भागात जातात. यापूर्वी तेंदूपत्ता संकलनाचे काम वन विभाग करीत होते. पेसा कायद्यानंतर मात्र ग्रामसभांना तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार देण्यात आल्याने काही ग्रामसभा स्वत:हून तेंदूपत्ता संकलन करीत आहेत. तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम जवळपास १५ दिवस चालतो. यातून प्रत्येक व्यक्ती पाच ते सहा हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त करते.लोकसभेच्या आचारसंहितेमुळे ग्रामसभांचे कंत्राटदारांसोबत करारनामे करताना अडचणी आल्या होत्या. मात्र आचारसंहिता शिथील होण्याची प्रतीक्षा केल्यास तो पर्यंत तेंदूपत्त्याचा हंगाम हातून निघून गेला असता. त्यामुळे ग्रामसभांनी यातून मार्ग काढत कंत्राटदारासोबत करारनामे केले. त्यामुळे आता तेंदूपत्ता संकलनाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील चार दिवसात तेंदूपत्ता संकलनाला पुन्हा गती येणार आहे.तेंदूपत्त्याचा दर्जा चांगलायावर्षी कडक ऊन पडल्याने तेंदूपत्त्याचा दर्जा अतिशय चांगला आहे. त्यामुळे तेंदूपत्त्याचे अधिकाधिक संकलन करणे मजुरांना शक्य होत आहे. तेंदूपत्त्याचा दर्जा चांगला असल्यास कंत्राटदारालाही व्यापाऱ्याकडून चांगला भाव मिळणार आहे. त्यामुळे मजूर व कंत्राटदार सध्या समाधानी आहेत. बाहेरगावावरून तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या नागरिकांना जंगलातच झोपड्या उभारून राहावे लागते. मात्र मागील काही दिवसांपासून अधूनमधून वादळ वाºयासह पाऊस सुरू आहे. यामुळे नागरिकांचे हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :forest departmentवनविभाग