शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

वैनगंगा नदीपुलावर वाढला अपघाताचा धाेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2022 05:00 IST

वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचा निर्माणाधीन कालावधी हा सन १९९०-१९९५ दरम्यानचा आहे. गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या पुलावरून दुचाकीसह अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. या पुलावर दोन स्लॅब ज्या ठिकाणी आलेले आहेत असे एकंदरीत अठ्ठावीस भेगा पडल्या आहेत. पुलाच्या निर्माणाधीन कालावधीत या भेगा लहान स्वरूपाच्या होत्या; पण आता या दोन स्लॅबच्या गॅपमधील रुंदी वाढली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : येथील वैनगंगा नदीवर दुचाकी ते अवजड वाहनांसाठी बांधण्यात आलेल्या पुलावर दोन स्लॅबच्या दरम्यान मोठ्या स्वरूपात  गडप तयार होऊन मोठ्या खाचा निर्माण झाल्या आहेत. उंचवटे  व  खाच तयार  झाल्याने वाहनांना जबरदस्त झटका बसून वाहनांची मोठ्या प्रमाणात हानी होऊन  अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचा निर्माणाधीन कालावधी हा सन १९९०-१९९५ दरम्यानचा आहे. गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या पुलावरून दुचाकीसह अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. या पुलावर दोन स्लॅब ज्या ठिकाणी आलेले आहेत असे एकंदरीत अठ्ठावीस भेगा पडल्या आहेत. पुलाच्या निर्माणाधीन कालावधीत या भेगा लहान स्वरूपाच्या होत्या; पण आता या दोन स्लॅबच्या गॅपमधील रुंदी वाढली आहे. त्यामुळे ब्रेकरपेक्षाही मोठे झटके वाहनांना बसू लागले आहेत. या गॅपमध्ये वाहनाचा तोल जाऊन पडण्याचे प्रमाणही वाढले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या ठिकाणी गॅप बुजविण्यासाठी डांबर टाकले होते. काही दिवसांनी तेच डांबर वाहनाच्या वर्दळीने वर येऊन त्यांचे उंच कडा व गॅप तयार झाल्याने या पुलावर २८ ठिकाणी भेगा पडल्या आहेत. पुलावर तयार झालेल्या खाचा व उंचवटे अपघातास निमंत्रण देत असून, वाहनांचीही मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. संबंधित बांधकाम विभागाने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे.  पुलावर पडलेला मोठा गॅप  त्वरित बुजविण्यात यावा, अशी मागणी होत आहे. याबाबतीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

ग्रामीण भागातील अनेक रस्ते उखडलेदेसाईगंज तालुक्याच्या विसाेरा, कुरूड, काेंढाळा गावातील अंतर्गत रस्ते उखडले आहेत. ग्राम पंचायत प्रशासनाच्या वतीने दरवर्षी रस्ते व नाल्या बांधकामांवर लाखाे रूपयांचा खर्च केला जाताे. मात्र काम याेग्य हाेत नसल्याने अल्पावधीतच पुन्हा जैसे थे हाेतात. रस्ते कामाबाबत अनेक तक्रारी येऊनही दर्जा सुधारताना दिसून येत नाही. 

 

टॅग्स :riverनदी