शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

वैनगंगा नदीपुलावर वाढला अपघाताचा धाेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2022 05:00 IST

वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचा निर्माणाधीन कालावधी हा सन १९९०-१९९५ दरम्यानचा आहे. गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या पुलावरून दुचाकीसह अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. या पुलावर दोन स्लॅब ज्या ठिकाणी आलेले आहेत असे एकंदरीत अठ्ठावीस भेगा पडल्या आहेत. पुलाच्या निर्माणाधीन कालावधीत या भेगा लहान स्वरूपाच्या होत्या; पण आता या दोन स्लॅबच्या गॅपमधील रुंदी वाढली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : येथील वैनगंगा नदीवर दुचाकी ते अवजड वाहनांसाठी बांधण्यात आलेल्या पुलावर दोन स्लॅबच्या दरम्यान मोठ्या स्वरूपात  गडप तयार होऊन मोठ्या खाचा निर्माण झाल्या आहेत. उंचवटे  व  खाच तयार  झाल्याने वाहनांना जबरदस्त झटका बसून वाहनांची मोठ्या प्रमाणात हानी होऊन  अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचा निर्माणाधीन कालावधी हा सन १९९०-१९९५ दरम्यानचा आहे. गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या पुलावरून दुचाकीसह अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. या पुलावर दोन स्लॅब ज्या ठिकाणी आलेले आहेत असे एकंदरीत अठ्ठावीस भेगा पडल्या आहेत. पुलाच्या निर्माणाधीन कालावधीत या भेगा लहान स्वरूपाच्या होत्या; पण आता या दोन स्लॅबच्या गॅपमधील रुंदी वाढली आहे. त्यामुळे ब्रेकरपेक्षाही मोठे झटके वाहनांना बसू लागले आहेत. या गॅपमध्ये वाहनाचा तोल जाऊन पडण्याचे प्रमाणही वाढले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या ठिकाणी गॅप बुजविण्यासाठी डांबर टाकले होते. काही दिवसांनी तेच डांबर वाहनाच्या वर्दळीने वर येऊन त्यांचे उंच कडा व गॅप तयार झाल्याने या पुलावर २८ ठिकाणी भेगा पडल्या आहेत. पुलावर तयार झालेल्या खाचा व उंचवटे अपघातास निमंत्रण देत असून, वाहनांचीही मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. संबंधित बांधकाम विभागाने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे.  पुलावर पडलेला मोठा गॅप  त्वरित बुजविण्यात यावा, अशी मागणी होत आहे. याबाबतीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

ग्रामीण भागातील अनेक रस्ते उखडलेदेसाईगंज तालुक्याच्या विसाेरा, कुरूड, काेंढाळा गावातील अंतर्गत रस्ते उखडले आहेत. ग्राम पंचायत प्रशासनाच्या वतीने दरवर्षी रस्ते व नाल्या बांधकामांवर लाखाे रूपयांचा खर्च केला जाताे. मात्र काम याेग्य हाेत नसल्याने अल्पावधीतच पुन्हा जैसे थे हाेतात. रस्ते कामाबाबत अनेक तक्रारी येऊनही दर्जा सुधारताना दिसून येत नाही. 

 

टॅग्स :riverनदी