शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

सिरोंचा बाजार समितीला मान्यता द्या

By admin | Updated: June 23, 2014 00:03 IST

अहेरी, एटापल्ली व भामरागड, सिरोंचा या चार तालुक्यासाठी अहेरी येथे एकमेव कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. अहेरीपासून सिरोंचाचे ९६ किमी अंतर आहे. यामुळे तिनही तालुक्यातील शेतकऱ्यांना आपला

प्रस्ताव शासनदरबारी प्रलंबित : आमदारांचे कृषी व पणन मंत्र्यांकडे साकडेगडचिरोली : अहेरी, एटापल्ली व भामरागड, सिरोंचा या चार तालुक्यासाठी अहेरी येथे एकमेव कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. अहेरीपासून सिरोंचाचे ९६ किमी अंतर आहे. यामुळे तिनही तालुक्यातील शेतकऱ्यांना आपला कृषी माल अहेरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीकरीता आणण्यासाठी अडचण जात आहे. परिणामी अनेक खासगी व्यापारी शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी सिरोंचा येथे कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण करण्यात यावी, अशी मागणी अहेरीचे आमदार दीपक आत्राम यांनी राज्याचे कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.सिरोंचा या नव्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रस्ताव शासन दरबारी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. त्यामुळे शासनाने आता सिरोंचा बाजार समितीच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी, अशी मागणी आमदार दीपक आत्राम यांनी कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यांनी अधिवेशन काळात या मागणीचे निवेदन नामदार विखे पाटील यांना दिले. आमदार दीपक आत्राम यांनी निवेदनात म्हटले आहे की, अहेरीपासून भामरागड व एटापल्लीचे अंतर प्रचंड आहे. या दोनही तालुक्यातून शेतकरी अहेरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत येत नाही. कारण त्यांना वाहतुकीचा खर्च परवडत नाही. तसेच त्यांना निवास व भोजनाचीही समस्या भेडसावते. चार तालुक्यासाठी दोन स्वतंत्र बाजार समित्या आवश्यक आहेत. मात्र असे असतानासुध्दा शासनदरबारी प्रलंबित असलेल्या सिरोंचा बाजार समितीच्या प्रस्तावावर मंत्रीमंडळात चर्चा घडवून आणून त्याला मान्यता द्यावी, अशीही मागणी आमदार दीपक आत्राम यांनी निवेदनातून केली आहे. स्वतंत्र बाजार समिती नसल्याने सिरोंचा या शहरातील व तालुक्यातील बाजारपेठ विकसित होत नसल्याचेही आमदार दीपक आत्राम यांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)