शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

९५ च्या वर शाळांना ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 01:15 IST

कायम विनाअनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या व कायम शब्द वगळण्यात आलेल्या मराठी माध्यमांच्या उच्च माध्यमिक शाळा वर्ग व तुकड्यांना अनुदानास पात्र घोषीत करून त्यांना अनुदान देण्यात येईल, ....

ठळक मुद्देअपेक्षाभंग : केवळ दोन कनिष्ठ महाविद्यालये अनुदानासाठी पात्र घोषित

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कायम विनाअनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या व कायम शब्द वगळण्यात आलेल्या मराठी माध्यमांच्या उच्च माध्यमिक शाळा वर्ग व तुकड्यांना अनुदानास पात्र घोषीत करून त्यांना अनुदान देण्यात येईल, अशी अपेक्षा जिल्ह्यातील विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शासनाकडे केली होती. यासंदर्भात शासनाने निर्णय घेतला. पण जिल्ह्यातील विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना न्याय मिळाला नाही. अनुदानासाठी जिल्ह्यातील केवळ दोन कनिष्ठ महाविद्यालयांना पात्र घोषीत करण्यात आले. राज्य शासनाने जिल्ह्यातील ९५ वर विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना ठेंगा दाखविला आहे. त्यामुळे या शाळांमधील शिक्षक व कर्मचाºयांचा अपेक्षा भंग झाला आहे.जिल्ह्यात एकूण १६५ उच्च माध्यमिक शाळा आहेत. यापैकी ५६ अनुदानित, जि.प.चे सहा कनिष्ठ महाविद्यालये, चार स्वयअर्थसहाय्यीत उच्च माध्यमिक शाळा आहेत. जवळपास ९९ उच्च माध्यमिक शाळा विनाअनुदान तत्वावर सुरू आहेत. या ९९ उच्च माध्यमिक शाळांमध्ये ५०० वर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विनावेतनावर अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. राज्य सरकारकडून आज ना उद्या शाळेला अनुदान प्राप्त होऊन वेतन मिळेल, या आशेने चाळीशी ओलांडलेले शिक्षकही कार्यरत आहेत. विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देण्यात यावे, या मागणीसाठी शिक्षक संघटनेच्या वतीने अनेक आंदोलने करण्यात आली. आता शासनाने जीआर काढून राज्यभरातील एकूण कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण १४६ वर्ग व तुकड्यांना अनुदानासाठी पात्र घोषीत केले आहेत. याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने २८ फेब्रुवारी २०१८ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील दोन महाविद्यालयांना अनुदानासाठी पात्र घोषीत करण्यात आले आहे. यामध्ये देसाईगंज येथील कुथे पाटील कला व विज्ञान महाविद्यालय व अमिर्झा येथील उच्च माध्यमिक शाळेचा समावेश आहे.चार जिल्ह्यावर सरकारची मेहरबानी२८ फेब्रुवारी २०१८ च्या जीआरनुसार विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदानासाठी पात्र घोषीत करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक औरंगाबाद जिल्ह्यातील १८, जालना जिल्ह्यातील १४ वर्ग व तुकड्यांना अनुदानासाठी पात्र घोषीत केले आहे. अकोला जिल्ह्यातील ११, गोंदिया जिल्ह्यातील १४ शाळांचा समावेश आहे. इतर जिल्ह्यातील एक ते चार शाळांना पात्र घोषीत केले आहे. इतर जिल्ह्यांवर शासनाकडून प्रचंड अन्याय झाला आहे.

टॅग्स :Schoolशाळा