शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
3
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
4
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
5
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
6
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
7
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
8
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
9
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
10
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
11
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
12
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
13
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
14
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
15
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
16
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
17
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
18
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
19
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
20
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?

९५ च्या वर शाळांना ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 01:15 IST

कायम विनाअनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या व कायम शब्द वगळण्यात आलेल्या मराठी माध्यमांच्या उच्च माध्यमिक शाळा वर्ग व तुकड्यांना अनुदानास पात्र घोषीत करून त्यांना अनुदान देण्यात येईल, ....

ठळक मुद्देअपेक्षाभंग : केवळ दोन कनिष्ठ महाविद्यालये अनुदानासाठी पात्र घोषित

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कायम विनाअनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या व कायम शब्द वगळण्यात आलेल्या मराठी माध्यमांच्या उच्च माध्यमिक शाळा वर्ग व तुकड्यांना अनुदानास पात्र घोषीत करून त्यांना अनुदान देण्यात येईल, अशी अपेक्षा जिल्ह्यातील विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शासनाकडे केली होती. यासंदर्भात शासनाने निर्णय घेतला. पण जिल्ह्यातील विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना न्याय मिळाला नाही. अनुदानासाठी जिल्ह्यातील केवळ दोन कनिष्ठ महाविद्यालयांना पात्र घोषीत करण्यात आले. राज्य शासनाने जिल्ह्यातील ९५ वर विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना ठेंगा दाखविला आहे. त्यामुळे या शाळांमधील शिक्षक व कर्मचाºयांचा अपेक्षा भंग झाला आहे.जिल्ह्यात एकूण १६५ उच्च माध्यमिक शाळा आहेत. यापैकी ५६ अनुदानित, जि.प.चे सहा कनिष्ठ महाविद्यालये, चार स्वयअर्थसहाय्यीत उच्च माध्यमिक शाळा आहेत. जवळपास ९९ उच्च माध्यमिक शाळा विनाअनुदान तत्वावर सुरू आहेत. या ९९ उच्च माध्यमिक शाळांमध्ये ५०० वर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विनावेतनावर अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. राज्य सरकारकडून आज ना उद्या शाळेला अनुदान प्राप्त होऊन वेतन मिळेल, या आशेने चाळीशी ओलांडलेले शिक्षकही कार्यरत आहेत. विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देण्यात यावे, या मागणीसाठी शिक्षक संघटनेच्या वतीने अनेक आंदोलने करण्यात आली. आता शासनाने जीआर काढून राज्यभरातील एकूण कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण १४६ वर्ग व तुकड्यांना अनुदानासाठी पात्र घोषीत केले आहेत. याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने २८ फेब्रुवारी २०१८ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील दोन महाविद्यालयांना अनुदानासाठी पात्र घोषीत करण्यात आले आहे. यामध्ये देसाईगंज येथील कुथे पाटील कला व विज्ञान महाविद्यालय व अमिर्झा येथील उच्च माध्यमिक शाळेचा समावेश आहे.चार जिल्ह्यावर सरकारची मेहरबानी२८ फेब्रुवारी २०१८ च्या जीआरनुसार विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदानासाठी पात्र घोषीत करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक औरंगाबाद जिल्ह्यातील १८, जालना जिल्ह्यातील १४ वर्ग व तुकड्यांना अनुदानासाठी पात्र घोषीत केले आहे. अकोला जिल्ह्यातील ११, गोंदिया जिल्ह्यातील १४ शाळांचा समावेश आहे. इतर जिल्ह्यातील एक ते चार शाळांना पात्र घोषीत केले आहे. इतर जिल्ह्यांवर शासनाकडून प्रचंड अन्याय झाला आहे.

टॅग्स :Schoolशाळा