शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
5
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
6
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकड्यांचा फज्जा
7
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
8
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
9
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
10
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
11
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
12
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
13
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
14
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
15
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
16
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
17
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
18
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
19
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
20
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट

दुर्लक्षितांचे प्रश्न मांडण्याची ताकद वर्तमानपत्रातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2016 01:27 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पत्रकार होते. त्यांनी चळवळ उभारताना वृत्तपत्राद्वारे समाजात जागृती निर्माण करून जनतेची चळवळ उभी केली.

सामाजिक न्याय वर्षानिमित्त कार्यक्रम : रोहिदास राऊत यांचे प्रतिपादनगडचिरोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पत्रकार होते. त्यांनी चळवळ उभारताना वृत्तपत्राद्वारे समाजात जागृती निर्माण करून जनतेची चळवळ उभी केली. शोषित, पीडित व दुर्लक्षित समाजाचे प्रश्न मांडण्याची व त्यांना न्याय मिळवून देण्याची ताकद वृत्तपत्रांमध्येच आहे, त्यामुळे बाबासाहेबांच्या विचाराचा व तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करून प्रसारमाध्यमांनी काम केल्यास समाजाला न्याय मिळेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन हे वर्ष समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करीत आहे. त्याअंतर्गत गडचिरोली येथे पत्रकारांची कार्यशाळा बुधवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रा. बी. पी. नागदेवे, नितीन रामटेके, सोनटक्के, डॉ. सुरेश खंगार, मनोज भैसारे, कोमल खोब्रागडे, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे आदी उपस्थित होते.याप्रसंगी रोहिदास राऊत म्हणाले की, पत्रकारिता ही समाजाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक म्हणजेच पर्यायाने सर्वांगिक उन्नतीसाठी आहे.प्रा. कोमल खोब्रागडे, नितीन रामटेके, प्रा. सोनटक्के यांनी संविधानातील तरतुदींची अंमलबजावणी १०० टक्के व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करून समाजाने बाबासाहेबांचे विचार अंगिकारल्याशिवाय प्रगती शक्य नाही, तेव्हा त्यांचे प्रगल्भ ज्ञानभंडार वाचून समाज परिवर्तन घडवून आणावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे संचालन समाजकल्याण विभागाचे तालुका समन्वयक दीपक सोरदे यांनी तर आभार शिवाजी पाटील यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)