शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाचा दीड महिना उलटला; पेरणी केवळ ११ टक्के !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2023 22:38 IST

Gadchiroli News अद्यापही पाऊस जाेरदार बरसला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना राेवणीची कामे करता आली नाही. सिंचनाची साेय असलेले शेतकरी राेवणीची कामे जाेमात करीत आहेत; परंतु काेरडवाहू शेतकऱ्यांना अद्याप जाेरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

गडचिराेली : जिल्ह्यात अद्यापही पाऊस जाेरदार बरसला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना राेवणीची कामे करता आली नाही. सिंचनाची साेय असलेले शेतकरी राेवणीची कामे जाेमात करीत आहेत; परंतु काेरडवाहू शेतकऱ्यांना अद्याप जाेरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

जिल्ह्यात आवत्याची धान लागवड पूर्ण झाली असली तरी धान राेवणीची कामे शिल्लक आहेत. मात्र, १२ जुलैपर्यंत कृषी विभागाच्या नाेंदीत जिल्ह्यात केवळ ११.२३ टक्केच पेरणी दाखविली आहे. जिल्ह्यात धान, कापूस, साेयाबीन, तीळ, मका, तूर आदी पिके खरीप हंगामात घेतली जातात. सर्वाधिक क्षेत्र धान पीक लागवडीखाली आहे. यावर्षी सुद्धा धान पिकाची लागवड सर्वाधिक हाेईल, असे कृषी विभागाचे नियाेजन हाेते. त्यानंतर कापूस पिकाचा क्रमांक लागताे. यावर्षी अद्याप जाेरदार पाऊस बरसला नाही. तुरळक पावसाच्या भरवशावरच शेतकऱ्यांनी पेरणी केली. सिंचनाची साेय असलेल्या शेतकऱ्यांनी धानाची पेरणी केली. काही शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली तर काहींनी तुरळक पाऊस पडल्यानंतर पेरणी केली.

सर्वात कमी पेरणी एटापल्लीत

जिल्ह्यात आतापर्यंत सर्वात कमी पेरणी एटापल्ली तालुक्यात झाली आहे. येथे ०.३४ टक्केच पेरणी झाली. त्यानंतर भामरागड तालुक्यात १.४५ टक्के, अहेरी तालुक्यात १.५३ टक्के तर सिराेंचा तालुक्यात ५.९० टक्केच पेरणी झाली. ही स्थिती कृषी विभागाच्या साप्ताहिक अहवालात दर्शवली आहे.

गडचिराेली तालुका आघाडीवर

जिल्ह्यात २० टक्क्यांहून अधिक एकाच गडचिराेली तालुक्यात खरीप पीक पेरणी झाली. येथे पीक पेरणीचे प्रमाण ३६.१२ टक्के आहे. त्यानंतर सर्वच ११ तालुके २० टक्क्यांच्या खाली आहेत. त्यामुळे ह्या तालुक्यातील पीक पेरणी केव्हा पूर्ण हाेईल, असा प्रश्न आहे.

राेवणीनंतर हाेईल काय उद्दिष्ट साध्य ?

जिल्ह्यात सध्या कापूस, साेयाबिन, तूर, तीळ, मका आदी पिकांची पेरणी झाली आहे. केवळ धान पिकाची पेरणी हाेणे शिल्लक आहे. काही शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली. तर काही शेतकऱ्यांनी तुरळक पावसानंतर पेरणी केली. ज्या काेरडवाहू शेतकऱ्यांनी धान पऱ्हे बांध्यांमध्ये टाकले हाेते. त्या शेतकऱ्यांची राेवणी शिल्लक आहे. पुरेसा पाऊस पडल्यानंतरच ही राेवणी हाेईल. त्यामुळे राेवणीनंतर पेरणीचे उद्दिष्ट साध्य हाेईल.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र