शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

९७ कोटींचे कर्ज वाटप

By admin | Updated: August 7, 2016 01:36 IST

विविध राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व सहकारी बँकांच्या वतीने चालू खरीप हंगामासाठी जिल्हाभरातील २२ हजार ९८ शेतकऱ्यांना

उद्दिष्टाच्या ५१ टक्के : जिल्ह्यातील २२ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ गडचिरोली : विविध राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व सहकारी बँकांच्या वतीने चालू खरीप हंगामासाठी जिल्हाभरातील २२ हजार ९८ शेतकऱ्यांना ९६ कोटी ७३ लाख रूपयांचे पीक कर्ज वितरित केले आहे. यावर्षी खरीप हंगामात १८८ कोटी रूपयांचे पीक कर्ज वितरित करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. उद्दिष्टाच्या निम्मेच कर्ज वितरित झाले आहे. वाढत्या महागाईबरोबरच तसेच शेतीतील अत्याधुनिक साधनांबरोबरच शेतीचा खर्च वाढत चालला आहे. गडचिरोली जिल्ह्यात ९० टक्के क्षेत्रावर धानाचे उत्पादन घेतले जाते. धानासाठी चांगले बियाणे, ट्रॅक्टरच्या सहाय्याने चिखणी आदी कामे केली जातात. त्याचबरोबर रासायनिक खते, कीटकनाशके यांचा खर्चही वाढला आहे. हा सर्व खर्च करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज काढल्याशिवाय पर्याय राहत नाही. कर्जासाठी शेतकरी सावकाराच्या दारात उभा होऊ नये, यासाठी मागेल त्या शेतकऱ्याला त्याच्या शेतीच्या क्षेत्राप्रमाणे कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश शासनाने बँकांना दिले आहेत. चालू खरीप हंगामात जिल्हाभरातील शेतकऱ्यांना १८८ कोटी १ लाख रूपये कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात ९६ कोटी ७३ लाख रूपयांचेच कर्ज वितरण झाले आहे. बँकांना जेवढे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट दिले जाते. त्याच्या निम्मेच कर्ज वितरण केले जाते. हा दरवर्षीचाच अनुभव आहे. याचाच कित्ता राष्ट्रीयकृत बँकांनी यावर्षीसुध्दा गिरविला आहे. काही बँकांनी उद्दिष्टाच्या २० टक्क्यांपेक्षाही कमी कर्जाचे वितरण केले आहे. (नगर प्रतिनिधी) जनजागृतीसाठी मेळाव्यांमुळे शेतकऱ्यांना कर्जाची मिळाली माहिती कर्जाबाबत जनजागृती करण्यासाठी मोठ्या गावांमध्ये शेतकरी मेळाव्यांचे आयोजन करण्याचे निर्देश शासनाच्या वतीने बँकांना दिले होते. त्यानुसार यावर्षी बँकांनी मोठ्या गावांमध्ये मेळाव्यांचे आयोजन केले. त्याचबरोबर महसूल विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या मेळाव्यांमध्ये बँक कर्मचारी उपस्थित राहून त्यांना कर्ज घेण्याविषयी आवाहन करीत होते. परिणामी दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली असल्याचे दिसून येते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आघाडी चालू खरीप हंगामात ९६ कोटी ६३ लाख रूपयांचे कर्ज वितरीत झाले आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ४३ कोटी २१ लाख रूपये कर्ज वितरित केले आहे. या बँकेला ५३ कोटी रूपयांचे कर्ज वितरित करण्याचे उद्दिष्ट दिले होते. उद्दिष्टाच्या ८२ टक्के कर्ज वितरित केले आहे. सर्वाधिक कर्ज वितरण याच बँकेतर्फे केले जाते. यावर्षीसुध्दा कर्ज वितरणात जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेने आघाडी घेतली आहे. गतवर्षी सुध्दा या बँकेने जिल्ह्यात सर्वाधिक पीक कर्जाचे वाटप केले होते, हे विशेष.