शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

९५ दुर्गम गावांमध्ये पोहोचणार वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 22:11 IST

दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ४१९.२२ किमीच्या वीज वाहिन्या टाकण्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे.

ठळक मुद्देकाम प्रगतीपथावर : ४२० किमीच्या नवीन वीज वाहिन्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ४१९.२२ किमीच्या वीज वाहिन्या टाकण्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. यामध्ये ३३५.७७ किमीची उच्चदाब वाहिनी व ८३.४५ किमीची लघुदाब वाहिनी यांचा समावेश असून काही ठिकाणी वीज वाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले आहे. या नवीन वाहिन्यांमुळे आजपर्यंत कधीच वीज न पोहोचलेल्या ९५ गावांमध्ये वीज पोहोचणार आहे.गडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग जंगलाने व्याप्त व दुर्गम आहे. जंगलातून वीज वाहिनीचे बांधकाम करताना वन विभागाची परवानगी घ्यावी लागते. बºयाचवेळा वन विभाग परवानगी देत नाही. त्यामुळे वीज वाहिनीचे काम करताना अडचण निर्माण होत असल्याने काही गावांमध्ये अजुनही वीज पोहोचली नाही. देशातील प्रत्येक गाव व प्रत्येक घरी वीज पोहोचली पाहिजे, या उद्देशाने केंद्र शासनाने दिनदयाल उपाध्याय, ग्रामज्योती योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत ज्या गावांपर्यंत वीज पोहोचली नाही, अशा गावांपर्यंत वीज वाहिनीचे बांधकाम करून वीज पोहोचविण्याच्या कामाला सुरूवात केली आहे. २०१७-१८ या वर्षात जिल्हाभरात सुमारे ३३५.७७ किमीच्या उच्चदाब वाहिनीचे व ८३.४५ किमीच्या लघुदाब वाहिनीचे काम केले जाणार आहे. या वाहिन्यांमुळे नवीन गावे, टोल्या, वस्त्या जोडल्या जाणार आहेत.पावसाळ्यादरम्यान नदी, नाल्यांमुळे बांधकाम करताना अडचण निर्माण होत होती. त्यामुळे पावसाळ्यादरम्यान काम संथगतीने सुरू होते. मात्र पावसाळा संपताच वीज वाहिन्या उभारण्याच्या कामाला गती आली असून आर्थिक वर्ष संपण्याच्या पूर्वी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने वीज विभाग कामाला लागला आहे.२७३ नवीन रोहित्र बसणारवाढती लोकसंख्या व विजेचा वापर यामुळे जास्त क्षमतेचे तसेच नवीन रोहित्र बसविणे आवश्यक झाले आहे. काही जुन्या रोहित्रामध्ये बिघाड निर्माण झाल्याने त्या ठिकाणी नवीन रोहित्र बसविणे गरजेचे झाले आहेत. याच योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात २७३ नवीन रोहित्र बसविले जाणार आहेत. यामध्ये गडचिरोली तालुक्यात आठ, आरमोरी तालुक्यात ४१, देसाईगंज तालुक्यात ६२, कुरखेडा ३३, कोरची ४, धानोरा ८, अहेरी १०, मुलचेरा तालुक्यात ४, चामोर्शी तालुक्यात ५४, एटापल्ली तालुक्यात ६, भामरागड तालुक्यात ४, सिरोंचा तालुक्यात ३९ रोहित्र बसविले जाणार आहेत. कुरखेडा, धानोरा, अहेरी तालुक्यात प्रत्येकी एक नवीन उपकेंद्र बसविले जाणार आहे.५० कोटींचा खर्चतीन उपकेंद्रांची निर्मिती, दोन उपकेंद्रांच्या क्षमतेत वाढ, २७३ नवीन रोहित्र, सात वाहिन्यांचे विलगिकरण, ३३५.७७ किमीच्या नवीन उच्चदाब वाहिन्या, ८३.४५ किमीच्या लघुदाब वाहिन्या, २६ हजार ११३ घरगुती वीज जोडणी आदींसाठी सुमारे ४० कोटी ८० लाख ४२ हजार रूपयांचा खर्च येणार आहे.दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यातील प्रस्तावित कामांना सुरूवात झाली आहे. कालावधी संपण्याच्या पूर्वी कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने गती दिली जात आहे. नवीन कामांमुळे विजेची समस्या दूर होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.- अशोक म्हस्के, अधीक्षक अभियंता, महावितरण गडचिरोली