शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

९५ दुर्गम गावांमध्ये पोहोचणार वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 22:11 IST

दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ४१९.२२ किमीच्या वीज वाहिन्या टाकण्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे.

ठळक मुद्देकाम प्रगतीपथावर : ४२० किमीच्या नवीन वीज वाहिन्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ४१९.२२ किमीच्या वीज वाहिन्या टाकण्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. यामध्ये ३३५.७७ किमीची उच्चदाब वाहिनी व ८३.४५ किमीची लघुदाब वाहिनी यांचा समावेश असून काही ठिकाणी वीज वाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले आहे. या नवीन वाहिन्यांमुळे आजपर्यंत कधीच वीज न पोहोचलेल्या ९५ गावांमध्ये वीज पोहोचणार आहे.गडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग जंगलाने व्याप्त व दुर्गम आहे. जंगलातून वीज वाहिनीचे बांधकाम करताना वन विभागाची परवानगी घ्यावी लागते. बºयाचवेळा वन विभाग परवानगी देत नाही. त्यामुळे वीज वाहिनीचे काम करताना अडचण निर्माण होत असल्याने काही गावांमध्ये अजुनही वीज पोहोचली नाही. देशातील प्रत्येक गाव व प्रत्येक घरी वीज पोहोचली पाहिजे, या उद्देशाने केंद्र शासनाने दिनदयाल उपाध्याय, ग्रामज्योती योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत ज्या गावांपर्यंत वीज पोहोचली नाही, अशा गावांपर्यंत वीज वाहिनीचे बांधकाम करून वीज पोहोचविण्याच्या कामाला सुरूवात केली आहे. २०१७-१८ या वर्षात जिल्हाभरात सुमारे ३३५.७७ किमीच्या उच्चदाब वाहिनीचे व ८३.४५ किमीच्या लघुदाब वाहिनीचे काम केले जाणार आहे. या वाहिन्यांमुळे नवीन गावे, टोल्या, वस्त्या जोडल्या जाणार आहेत.पावसाळ्यादरम्यान नदी, नाल्यांमुळे बांधकाम करताना अडचण निर्माण होत होती. त्यामुळे पावसाळ्यादरम्यान काम संथगतीने सुरू होते. मात्र पावसाळा संपताच वीज वाहिन्या उभारण्याच्या कामाला गती आली असून आर्थिक वर्ष संपण्याच्या पूर्वी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने वीज विभाग कामाला लागला आहे.२७३ नवीन रोहित्र बसणारवाढती लोकसंख्या व विजेचा वापर यामुळे जास्त क्षमतेचे तसेच नवीन रोहित्र बसविणे आवश्यक झाले आहे. काही जुन्या रोहित्रामध्ये बिघाड निर्माण झाल्याने त्या ठिकाणी नवीन रोहित्र बसविणे गरजेचे झाले आहेत. याच योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात २७३ नवीन रोहित्र बसविले जाणार आहेत. यामध्ये गडचिरोली तालुक्यात आठ, आरमोरी तालुक्यात ४१, देसाईगंज तालुक्यात ६२, कुरखेडा ३३, कोरची ४, धानोरा ८, अहेरी १०, मुलचेरा तालुक्यात ४, चामोर्शी तालुक्यात ५४, एटापल्ली तालुक्यात ६, भामरागड तालुक्यात ४, सिरोंचा तालुक्यात ३९ रोहित्र बसविले जाणार आहेत. कुरखेडा, धानोरा, अहेरी तालुक्यात प्रत्येकी एक नवीन उपकेंद्र बसविले जाणार आहे.५० कोटींचा खर्चतीन उपकेंद्रांची निर्मिती, दोन उपकेंद्रांच्या क्षमतेत वाढ, २७३ नवीन रोहित्र, सात वाहिन्यांचे विलगिकरण, ३३५.७७ किमीच्या नवीन उच्चदाब वाहिन्या, ८३.४५ किमीच्या लघुदाब वाहिन्या, २६ हजार ११३ घरगुती वीज जोडणी आदींसाठी सुमारे ४० कोटी ८० लाख ४२ हजार रूपयांचा खर्च येणार आहे.दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यातील प्रस्तावित कामांना सुरूवात झाली आहे. कालावधी संपण्याच्या पूर्वी कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने गती दिली जात आहे. नवीन कामांमुळे विजेची समस्या दूर होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.- अशोक म्हस्के, अधीक्षक अभियंता, महावितरण गडचिरोली