शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

९२५ सिंचन विहिरी होणार

By admin | Updated: October 19, 2015 01:52 IST

राज्य शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जून २०१५ ते जून २०१८ या तीन वर्षांच्या कालावधीत ...

रोजगार हमी योजनेतून : तीन वर्षातील ३ हजार १४५ सिंचन विहिरींचा जम्बो कार्यक्रम जाहीरदिलीप दहेलकर गडचिरोलीराज्य शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जून २०१५ ते जून २०१८ या तीन वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील नवीन सिंचन विहिरींचा नियोजनबध्द कार्यक्रम जाहीर केला आहे. सिंचन सुविधेसाठी गडचिरोली जिल्ह्यात तीन वर्षांच्या कालावधीत एकूण ३ हजार १४५ वैयक्तिक सिंचन विहिरी होणार आहेत. तसे उद्दिष्टही जिल्ह्याला मिळाले आहे. २०१५-१६ या चालू वर्षात ९२५ सिंचन विहिरींचे उद्दिष्ट असून जि.प. नरेगा विभागाच्या वतीने या कामांचे नियोजन पूर्ण झाले आहे. या कामांना मंजुरी मिळाल्याने कामे हाती घेण्यात येणार आहे.गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरातील सिंचन प्रकल्प वन कायद्याच्या जाचक अटीत अडकले आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांना दरवर्षी सिंचनाअभावी दुष्काळाचा सामना करावा लागतो. गडचिरोली जिल्ह्यात अत्यंत अल्पस्वरूपात असलेल्या सिंचन सुविधेमुळे यंदाच्या खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने या वर्षीपासून प्रथमच रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सिंचन विहीर बांधकामाची जंबो योजना हाती घेण्यात आली आहे. आजपर्यंत नरेगा व कृषी विभागाच्या वतीने वैयक्तिक सिंचन विहिरी बांधण्याची योजना अल्प प्रमाणात राबविण्यात येत होती. मात्र शेती सिंचन व्यवस्थेला राज्य शासनाने केंद्रबिंदू मानून यावर्षीपासून नरेगातून जंबो सिंचन विहीर बांधण्याचा कार्यक्रम आखला आहे. या संदर्भात जि.प. प्रशासनाला राज्य शासनाकडून सिंचन विहिरींचे वर्षनिहाय उद्दिष्ट प्राप्त झाले असून त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहे. नरेगातून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्र्य रेषेखालील इतर शेतकऱ्यांना २ लाख ९० हजार रूपयांची सिंचन विहीर बांधून देण्यात येणार आहे. या सिंचन विहिरीसाठी राज्य शासनाकडून संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदान मिळणार आहे. ग्रामसभेच्या मंजुरीनंतर ग्रा.पं.नी यंदा ९२५ लाभार्थ्यांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केले. सदर प्रस्तावाला जि.प.च्या सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली असून लाभार्थी निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या योजनेतून हरीतक्रांती घडणार आहे.