शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

८०.६० लाखांचे अग्निशमन वाहन कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:27 IST

नगर पंचायतीला २०१६-१७ मध्ये जिल्हा नियोजन समितीकडून ८०.६० लाख रुपयांच्या निधीतून अग्निशमन वाहन उपलब्ध करून देण्यात आले. मात्र कुशल मनुष्यबळाअभावी येथील अग्निशमन यंत्रणेची अवस्था ‘चणे आहे पण दात नाही’ अशी झाली आहे.

ऑनलाईन लोकमतअहेरी : नगर पंचायतीला २०१६-१७ मध्ये जिल्हा नियोजन समितीकडून ८०.६० लाख रुपयांच्या निधीतून अग्निशमन वाहन उपलब्ध करून देण्यात आले. मात्र कुशल मनुष्यबळाअभावी येथील अग्निशमन यंत्रणेची अवस्था ‘चणे आहे पण दात नाही’ अशी झाली आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे हे वाहन उभ्या उभ्याच सडणार का? असा प्रश्न नगरवासीय विचारत आहेत.५ फेब्रुवारीला अहेरी उपजिल्हा रु ग्णालयाला मोठी आग लागून ५० लाखांपेक्षा जास्त किमतीचे साहित्य जळाले. मात्र ही आग विझविण्यासाठी अग्निशमन वाहनाचा कोणताही उपयोग झाला नाही. शहरात तसेच तालुक्यात आजपर्यंत आगीच्या अनेक घटना घडल्या आहेत. पण अग्निशमन वाहन आल्यानंतरही त्या आगी विजविण्यासाठी या वाहनाचा कोणताही उपयोग झाला नाही. आतापर्यंत केवळ एकदाच अहेरीपासून ७ किमी अंतरावर असलेल्या महागाव या गावी शेतात लागलेली आग विझविण्यासाठी हे वाहन गेले. नगर पंचायतच्या या अग्निशमन वाहनाला चालकच नाही. एवढेच नाही तर आग विझविण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारीही नाही. वाहन देताना कंपनीने जी प्राथमिक माहिती कर्मचऱ्यांना दिली त्याच्या जोरावर दिवस काढले जात आहेत. सदर वाहन व्यवस्थित चालवण्यासाठी फायरमन, लिडिंग फायरमन व वाहनचालक अशा कमीत कमी आठ जणांची टीम असणे गरजेचे आहे. त्यात महत्वाचं म्हणजे फायर स्टेशन असणे आवश्यक आहे. लोक त्याच ठिकाणी फोन करून अग्निशमन वाहन मागवू शकतील. पण ते नसल्याने हे वाहन पांढरा हत्ती झाले आहे.यंत्रणेची अशीही उदासीनताअहेरी नगर पंचायतीला २२ आॅगस्ट २०२७ रोजी अग्निशमन वाहन आले. परंतु तत्पूर्वी नगर पंचायतने प्रशासकीय मान्यता घेताना प्रशिक्षित मनुष्यबळाची मागणी केली. त्यानंतर ४ आॅक्टोबर व २९ डिसेंबर २०१७ तसेच ३ फेब्रुवारी २०१८ रोजी जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी व आयुक्त तथा संचालक नगर प्रशासन मुंबई यांना पत्रव्यवहार केला. पण अजूनपर्यत प्रशिक्षित मनुष्यबळासाठी कोणतेही नियोजन अद्याप करण्यात आले नाही.