शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
2
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
3
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
6
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
7
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
8
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
9
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
11
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
12
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
13
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
14
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
15
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
16
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
17
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
18
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
19
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
20
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

७९ हजारांचे सागवान लठ्ठे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:36 IST

मिळालेल्या माहितीच्या आधारे आसरअल्ली वनक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी गस्तीदरम्यान पहाटे २ ते ३ वाजताच्या दरम्यान सोमनपल्लीकडून सिरोंचाकडे येणाऱ्या वाहनाची तपासणी करीत ...

मिळालेल्या माहितीच्या आधारे आसरअल्ली वनक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी गस्तीदरम्यान पहाटे २ ते ३ वाजताच्या दरम्यान सोमनपल्लीकडून सिरोंचाकडे येणाऱ्या वाहनाची तपासणी करीत असताना एका वाहन चालकाने वाहन न थांबविता वेगाने पळून जाण्याचा प्रयत्न केला.

तेव्हा वन कर्मचारी यांनी सदर वाहनाचा पाठलाग केला. आसरअल्ली पासून २ किलोमीटर अंतरावर वाहन थांबवून त्याची तपासणी केली असता सदर वाहनांमध्ये सागाचे ५० नग (६.८३० घ.मी) ४७९१८६ रूपये किमतीचा माल मिळून आला.

सदर माल अवैधरित्या तेलंगणा राज्यात वाहतूक केला जात असल्यामुळे भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१ व महाराष्ट्र वन नियमावली २०१४ चे कलम ३१ अन्वये ८२ अन्वये वाहन चालकाच्या नावाने वन गुन्हा क्रमांक ८१५/१६ - ७ मार्च राेजी दाखल करण्यात आला आहे.

त्याचबरोबर वन गुन्ह्यात वापरण्यात आलेले दोन वाहने हे कलम ५२ (१)अंतर्गत जप्त करण्यात आलेले आहे. सदर आंतरराज्य साग तस्करी प्रकरणी पुढील तपास वनपरिक्षेत्राधिकारी सिरोंचा यांचेतर्फे सुरू आहे. तसेच दुसऱ्या घटनेमध्ये ७ मार्च राेजी सायंकाळी ५ वाजता वनपरिक्षेत्रातील कोपेला उपवन क्षेत्रातील कक्ष क्रमांक ३१३ मध्ये अवैध वृक्षतोड व अवैध साग माल वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. कर्मचारी यांनी जागेवर जाऊन पाहणी केली असता सागाचे १८ नग ६ बंड्या व १२ बैल आढळून आले.

घटनास्थळी आरोपी वन कर्मचाऱ्यांना पाहताच जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यानंतर सदर घटनास्थळाची पाहणी करून भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ५२ (१) अन्वये १८ नग सागवन लठ्ठे तसेच बैल व बैल बंडी जप्त करून वनपरिक्षेत्र कार्यालय आसरअली येथे आणले. अज्ञात आरोपीविरोधात अवैध साग वृक्ष तोड व अवैध साग मालाची वाहतूक प्रकरणी वन गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास क्षेत्र सहाय्यक तागडे करीत आहेत. सदर कारवाई उपवनसंरक्षक सुमित कुमार, सहाय्यक वनसंरक्षक एस. एस .पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आसरअली परिक्षेत्रातील वनकर्मचारी श्रीकांत नवघरे, सोमनपल्लीचे क्षेत्र सहाय्यक आर.बी. मडावी, तागडे, वनरक्षक राहुल चिचघरे, गजानन सडमेक, प्रमोद कोठारे, अजय इरकिवार, विशाल दडमल, बाबुलू वाघाळे, प्रीतम मडावी , कडम पयले, बिसेन तारम, कैलास उईके, किसन कन्नाके, महेश डूब्बुला व वन मजुरांनी केली.