शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

बालसंगोपनगृहात ७५ निराधारांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 23:31 IST

पालक नसल्याने निराधार बनलेल्या किंवा पालक असूनही मुलांचे पालन पोषण करण्याची क्षमता नसलेली बालके बालसंगोपन गृहात ठेवली जातात.

ठळक मुद्देबाल कल्याण विभागाचा उपक्रम : पालन पोषणाबरोबरच दिले जात आहे शिक्षणबाल दिन विशेष

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पालक नसल्याने निराधार बनलेल्या किंवा पालक असूनही मुलांचे पालन पोषण करण्याची क्षमता नसलेली बालके बालसंगोपन गृहात ठेवली जातात. गडचिरोली जिल्ह्यातील चार बाल संगोपन गृहात एकूण ७५ बालके आहेत. सदर बाल संगोपन गृह त्यांच्यासाठी आधारवड ठरले आहेत.बदलत्या समाज व्यवस्थेत बालकांचे प्रश्न गंभीर होत चालले आहेत. बाल मनावर विपरित परिणाम झाल्यास सदर बालक गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निराधार बालकांना आश्रय देऊन त्यांना शिक्षण देणे व त्यांच्यावर चांगले संस्कार होणे अतिशय आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाच्या वतीने बाल संगोपन गृह चालविले जातात. या बाल संगोपन गृहांमध्ये निराधार बालकांना प्रवेश दिला जातो. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली येथे बाल संगोपन व निरिक्षण गृह आहे. या ठिकाणी १५ बालके आहेत. त्याचबरोबर खासगी संस्थांच्या मार्फत घोट, मुलचेरा व देसाईगंज येथे बाल संगोपन गृह चालविले जातात. घोट येथील बाल संगोपन गृहात २० मुली, मुलचेरा येथील बाल संगोपन गृहात ३० मुली व देसाईगंज येथील बाल संगोपन गृहात १० मुली आहेत.बाल संगोपन गृहात राहणाºया बालकांचे पालन पोषण करण्याबरोबरच त्यांना जवळपासच्या शाळेमध्येही पाठविले जाते. त्यामुळे त्यांचे संगोपन होण्याबरोबरच त्यांच्यावर चांगले संस्कार होण्यास मदत होत आहे. या बाल संगोपन गृहात ६ ते १८ वयापर्यंतच्या मुलांना ठेवले जाते. बाल संगोपन गृहातून बाहेर पडल्यानंतर जीवन जगण्यासाठी ते स्वत: सक्षम व्हावे, यासाठी त्यांना एखाद्या रोजगाराचे धडेही दिले जात आहेत. आजपर्यंत अनेक बालके बाल संगोपन गृह सोडल्यानंतर स्वत:चा रोजगार थाटून जीवन जगत आहेत.अनुदानात वाढ करणे गरजेचेबाल संगोपन गृह चालविणाºया संस्थांना प्रती बालक १२०० रूपये मासिक अनुदान दिले जाते. वाढत्या महागाईमध्ये सदर अनुदान तुटपुंजे असल्याने अनुदानामध्ये वाढ करणे आवश्यक आहे.या मुलांना ठेवले जाते बाल संगोपनगृहातआई-वडील नसलेल्या निराधार बालकांना बाल संगोपन गृहात ठेवले जाते. त्याचबरोबर एखाद्या बालकाला पालक असूनही त्याचे आई-वडील त्याचे पालन पोषण करण्यास सक्षम नसल्यास सदर बालकाला बाल संगोपन गृहात प्रवेश दिला जातो. निराधार बालकाबाबतची माहिती प्राप्त झाल्यानंतर बाल कल्याण विभागाचे अधिकारी चौकशी करून बालकाला संगोपन गृहात आणतात.नागरिकांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त बाल संगोपन गृहातील बालकांना एखादी भेटवस्तू द्यावी. त्यामुळे बालकांमधील निराधारपणाची भावना कमी होण्यास मदत होईल. निराधार बालक आढळल्यास महिला व बाल कल्याण विभागाशी संपर्क साधावा.- अतुल भडांगे, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी