शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

बालसंगोपनगृहात ७५ निराधारांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 23:31 IST

पालक नसल्याने निराधार बनलेल्या किंवा पालक असूनही मुलांचे पालन पोषण करण्याची क्षमता नसलेली बालके बालसंगोपन गृहात ठेवली जातात.

ठळक मुद्देबाल कल्याण विभागाचा उपक्रम : पालन पोषणाबरोबरच दिले जात आहे शिक्षणबाल दिन विशेष

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पालक नसल्याने निराधार बनलेल्या किंवा पालक असूनही मुलांचे पालन पोषण करण्याची क्षमता नसलेली बालके बालसंगोपन गृहात ठेवली जातात. गडचिरोली जिल्ह्यातील चार बाल संगोपन गृहात एकूण ७५ बालके आहेत. सदर बाल संगोपन गृह त्यांच्यासाठी आधारवड ठरले आहेत.बदलत्या समाज व्यवस्थेत बालकांचे प्रश्न गंभीर होत चालले आहेत. बाल मनावर विपरित परिणाम झाल्यास सदर बालक गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निराधार बालकांना आश्रय देऊन त्यांना शिक्षण देणे व त्यांच्यावर चांगले संस्कार होणे अतिशय आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाच्या वतीने बाल संगोपन गृह चालविले जातात. या बाल संगोपन गृहांमध्ये निराधार बालकांना प्रवेश दिला जातो. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली येथे बाल संगोपन व निरिक्षण गृह आहे. या ठिकाणी १५ बालके आहेत. त्याचबरोबर खासगी संस्थांच्या मार्फत घोट, मुलचेरा व देसाईगंज येथे बाल संगोपन गृह चालविले जातात. घोट येथील बाल संगोपन गृहात २० मुली, मुलचेरा येथील बाल संगोपन गृहात ३० मुली व देसाईगंज येथील बाल संगोपन गृहात १० मुली आहेत.बाल संगोपन गृहात राहणाºया बालकांचे पालन पोषण करण्याबरोबरच त्यांना जवळपासच्या शाळेमध्येही पाठविले जाते. त्यामुळे त्यांचे संगोपन होण्याबरोबरच त्यांच्यावर चांगले संस्कार होण्यास मदत होत आहे. या बाल संगोपन गृहात ६ ते १८ वयापर्यंतच्या मुलांना ठेवले जाते. बाल संगोपन गृहातून बाहेर पडल्यानंतर जीवन जगण्यासाठी ते स्वत: सक्षम व्हावे, यासाठी त्यांना एखाद्या रोजगाराचे धडेही दिले जात आहेत. आजपर्यंत अनेक बालके बाल संगोपन गृह सोडल्यानंतर स्वत:चा रोजगार थाटून जीवन जगत आहेत.अनुदानात वाढ करणे गरजेचेबाल संगोपन गृह चालविणाºया संस्थांना प्रती बालक १२०० रूपये मासिक अनुदान दिले जाते. वाढत्या महागाईमध्ये सदर अनुदान तुटपुंजे असल्याने अनुदानामध्ये वाढ करणे आवश्यक आहे.या मुलांना ठेवले जाते बाल संगोपनगृहातआई-वडील नसलेल्या निराधार बालकांना बाल संगोपन गृहात ठेवले जाते. त्याचबरोबर एखाद्या बालकाला पालक असूनही त्याचे आई-वडील त्याचे पालन पोषण करण्यास सक्षम नसल्यास सदर बालकाला बाल संगोपन गृहात प्रवेश दिला जातो. निराधार बालकाबाबतची माहिती प्राप्त झाल्यानंतर बाल कल्याण विभागाचे अधिकारी चौकशी करून बालकाला संगोपन गृहात आणतात.नागरिकांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त बाल संगोपन गृहातील बालकांना एखादी भेटवस्तू द्यावी. त्यामुळे बालकांमधील निराधारपणाची भावना कमी होण्यास मदत होईल. निराधार बालक आढळल्यास महिला व बाल कल्याण विभागाशी संपर्क साधावा.- अतुल भडांगे, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी