शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
4
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
5
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
8
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
9
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
10
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
11
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
12
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
13
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
14
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
15
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
16
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
17
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
18
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
19
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
20
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले

७०.३३ कोटींचा खर्च

By admin | Updated: December 7, 2015 05:30 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागाच्या नियंत्रणाखाली

गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागाच्या नियंत्रणाखाली बाराही पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर तसेच यंत्रणास्तरावर रस्ते, बोडी, मजगी, शेततळे, सिंचन विहीर, राजीव गांधी भवन, शौचालय बांधकाम, वृक्ष लागवड आदीसह विविध कामे अंतिम टप्प्यात आहेत. तसेच सद्य:स्थितीत ग्रामपंचायतस्तरावर नरेगाचे विविध कामे सुरू करण्यात आले आहेत. १ एप्रिल ते १ डिसेंबर २०१५ या आठ महिन्यांच्या कालावधीत नरेगाच्या कामांवर एकूण ७०.३३ कोटी रूपयांचा खर्च झाला असल्याची माहिती नरेगा विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.अहेरी तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर सुरू असलेल्या नरेगाच्या विविध कामांवर मजुरी व बांधकाम साहित्यांवर मिळून गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत २६०.२५ लक्ष रूपये खर्च करण्यात आले आहे. आरमोरी तालुक्यात ८४२.०६ लाख, भामरागड १६४.१४ लाख, चामोर्शी ६९४.९५ लाख, देसाईगंज ४७०.७८ लाख, धानोरा ११२८.१५ लाख, एटापल्ली ४१३.१७ लाख, गडचिरोली ८३२.२३ लाख, कोरची ६४१.६५ लाख, कुरखेडा ९२६.२४ लाख, मुलचेरा ४२८.०१ व सिरोंचा तालुक्यात नरेगाच्या कामांवर मजुरी व साहित्य मिळून एकूण २००.०४ लाख रूपयांचा खर्च झाला असल्याची माहिती मिळाली आहे. अहेरी तालुक्यातील नरेगाच्या विविध कामांवर मजुरींवर १४३.६३ लाख, आरमोरी ५०७.०५ लाख, भामरागड ८०.०१ लाख, चामोर्शी ५४४.५६ लाख, देसाईगंज ११५.८५ लाख, धानोरा ८५०.३७ लाख, एटापल्ली २६६.९१ लाख, गडचिरोली ५८५.७० लाख, कोरची ३६७.०२ लाख, कुरखेडा ६१०.९ लाख, मुलचेरा २७४.८३ लाख व सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायतस्तरावरील कामावर १४२.९४ लाख रूपयांचा खर्च मजुरीवर झाला आहे.जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत नरेगाच्या कामावरील बांधकाम साहित्यावर एकूण १९६०.६८ लाख रूपयांचा खर्च झाला आहे. यामध्ये अहेरी तालुक्यात १००.०७ लाख, आरमोरी २९८.१५ लाख, भामरागड ६७.५६ लाख, चामोर्शी १०३.११ लाख, देसाईगंज १२८.६५ लाख, धानोरा २४१.१८ लाख, एटापल्ली १२२.२३ लाख, गडचिरोली २०८.९ लाख, कोरची २४३.३९ लाख, कुरखेडा ६६९.०५ लाख, मुलचेरा १३७.५ लाख व सिरोंचा तालुक्यात नरेगाच्या कामावरील बांधकाम साहित्यावर ४०.२६ लाखांचा खर्च झाला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)१ कोटी ९७ लाख ३५ हजार रूपये अदा करणे आहे शिल्लक४महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ग्रामपंचायतस्तरावर विविध कामे आटोपली आहेत. तर काही कामे अंतिम टप्प्यात आहे. या कामांवरील मजुरी व बांधकाम साहित्यांवर झालेल्या खर्चाचा तब्बल १ कोटी ९७ लाख ३५ हजार रूपयांचा निधी नरेगा विभागाला अदा करणे शिल्लक आहे. काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर या कामांवरील उर्वरित निधी अदा करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. नरेगा अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात घेण्यात आलेल्या जुन्या वैयक्तिक सिंचन विहिरींच्या दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच अनुदानाचा पहिला हप्ता मिळालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नव्या सिंचन विहिरींचे काम सुरू केले आहे.३२५ ग्रा.पं.मध्ये नरेगाच्या कामांना प्रारंभच नाही४महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सध्या जिल्ह्यातील १३५ ग्रामपंचायतीच्या गावांमध्ये रस्ते, बोडी, मजगी, शेततळे व इतर कामे सुरू आहेत. मात्र बाराही तालुक्यातील तब्बल ३२५ ग्रामपंचायतीच्या गावांमध्ये अद्यापही नरेगाच्या कामांना प्रारंभच करण्यात आला नाही. ग्रामपंचायत प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे कामे सुरू करण्यात न आल्याने रोजगाराअभावी जिल्ह्यातील शेकडो मजूर जिल्हाबाहेर कामासाठी स्थलांतरीत होत आहे. सध्या सुरू असलेल्या नरेगाच्या कामांवर ६ हजार २५० मजूर कार्यरत आहेत. चामोर्शी व धानोरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये नरेगाचे कामे ग्रामपंचायत प्रशासनाने सुरू केले नाहीत.