शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

जिल्ह्यातील ७ हजार ३७७ विद्यार्थ्यांना अपंगत्व

By admin | Updated: November 4, 2014 22:39 IST

आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या पाहणीदरम्यान जिल्ह्यातील ७ हजार ३७७ विद्यार्थ्यांना अपंगत्व असल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील ४०४ विद्यार्थ्यांवर यावर्षी शिक्षण

गडचिरोली : आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या पाहणीदरम्यान जिल्ह्यातील ७ हजार ३७७ विद्यार्थ्यांना अपंगत्व असल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील ४०४ विद्यार्थ्यांवर यावर्षी शिक्षण विभागाच्यावतीने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना साहित्याचेही वितरण करण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण २ हजार ८१ शाळा असून त्यामध्ये सुमारे २ लाख २७ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना दैनंदिन शिक्षण देण्याबरोबरच त्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले राहावे, यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विशेष प्रयत्न केले जातात. त्यांतर्गतच शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांची दरवर्षी आरोग्य तपासणी करण्यात येते. आरोग्य तपासणीदरम्यान सुमारे ७ हजार ३७७ विद्यार्थ्यांना अपंगत्व असल्याचे निष्पन्न झाले आहे. अपंग विद्यार्थ्यांची जबलपूर येथील विशेष तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना आवश्यक औषधोपचार सुचविण्यात आला. यावर्षी ४०४ विद्यार्थ्यांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मागील वर्षी ४३ विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अपंग विद्यार्थ्यांना यावर्षी ट्रायसिकल, व्हीलचेअर, श्रवणयंत्र, चष्मे आदी सुमारे १० लाख रूपयांची साहित्य वितरित केले जाणार आहेत. भारतात पोलिओ मोहिमेला सुरूवात होण्यापूर्वी पोलिओ रोगाने अपंग असलेल्या बालकांची संख्या सर्वाधिक होती. मात्र मागील पाच वर्षांपासून पोलिओ मोहीम संपूर्ण देशात राबविली जात आहे. त्यामुळे पोलिओग्रस्तांची संख्या कमी झाली आहे. मात्र पर्यावरणातील बदलांमुळे डोळे कमजोर असणे, श्रवणाचे दोष वाढत असल्याचे करण्यात येणाऱ्या आरोग्य तपासणीदरम्यान दिसून आले आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. गडचिरोली जिल्ह्यात कुपोषणामुळेही विद्यार्थ्यांमध्ये अपंगत्व जास्त आढळून येते. (नगर प्रतिनिधी)