शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

कृषीपंपासाठी लागणार ६७१ ट्रान्सफॉर्मर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:54 IST

जिल्ह्यात आता नवीन कृषीपंपाची जोडणी उच्चदाब वाहिणीच्या सहाय्याने केली जाणार आहे. यासाठी जिल्हाभरात ६७१ रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) लागणार आहेत. यामुळे लघुदाब वाहिणीतून होणारी वीज गळती टाळता येणार आहे.

ठळक मुद्देवीज गळतीला बसणार आळा : उच्चदाब वितरण प्रणाली योजना कार्यान्वित

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात आता नवीन कृषीपंपाची जोडणी उच्चदाब वाहिणीच्या सहाय्याने केली जाणार आहे. यासाठी जिल्हाभरात ६७१ रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) लागणार आहेत. यामुळे लघुदाब वाहिणीतून होणारी वीज गळती टाळता येणार आहे.कृषीपंपाला आवश्यक तेवढा वीज पुरवठा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने प्रत्येक शेतकऱ्याच्या कृषीपंपासाठी स्वतंत्र ट्रान्सफार्मर लावून देण्यासाठी राज्य शासनाने ‘उच्चदाब वितरण प्रणाली’ योजना सुरू केली आहे. या प्रणालीअंतर्गत शेतकºयांच्या शेतापर्यंत उच्चदाब वाहिणी (११ केव्ही) टाकली जाणार आहे. त्यामुळे लघुदाब वाहिणीची गरज राहणार नाही. शनिवारी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते पारडी येथील शेतकºयांच्या शेतातील कृषी पंपाची कळ दाबून या योजनेचा शुभारंभ केला. जिल्ह्यात मार्च २०१८ अखेर कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी पैसे भरलेल्या ८९९ शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. ०.६ किमीपर्यंत वाहिणी लागणाºया ६७१ अर्जदारांच्या जोडण्या उच्चदाब वितरण प्रणाली योजनेतून केल्या जाणार आहेत. यासाठी स्वतंत्र डीपी बसविली जाणार आहे. या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. काही ठिकाणी काम सुध्दा प्रगतीवर आहेत. गडचिरोली तालुक्यातील पारडी येथील भास्कर शितकुरा गंडाटे तसेच चामोर्शी तालुक्यातील जामगिरी येथील मधुबाई देवतळे यांच्या शेतात उच्चदाब वाहिणीने वीज पुरवठा करण्यात आला आहे. पारडी येथील शेतकऱ्याच्या शेतात जाऊन आमदार डॉ. देवराव होळी यांनी स्वत:च्या हाताने कृषीपंप सुरू करून योजनेचा शुभारंभ केला. यावेळी गडचिरोली महावितरणचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे, कार्यकारी अभियंता विजय मेश्राम उपस्थित होते.२२८ शेतकऱ्यांना मिळणार सौरप्रणालीज्या शेतकऱ्यांचे शेत मुख्य लाईनपासून ०.६ किमीपेक्षा अधिक अंतरावर आहे, अशा २२८ शेतकºयांना सौरऊर्जा प्रणाली उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे याही शेतकऱ्यांना बिनाखर्ची वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे.एका ट्रान्सफॉर्मरची किंमत जवळपास अडीच लाख रूपये आहे. एवढ्या किमतीचे ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे शेत जवळजवळ आहे, अशा दोनपेक्षा अधिक शेतकºयांना एकाच रोहित्रावरून वीज पुरवठा उपलब्ध करून दिला जाणार आहे.ज्या शेतकऱ्यांनी मीटरसाठी डिमांड भरून त्यांना आजपर्यंत वीज पुरवठा उपलब्ध झाला नाही, अशा शेतकऱ्यांना यानंतर पुढे उच्चदाब वाहिणीद्वारेच वीज पुरवठा केला जाणार आहे. शासनाकडून निधी प्राप्त होताच टप्प्याटप्प्याने प्रत्येक शेतकऱ्यांला वीज पुरवठा उपलब्ध करून दिला जाणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीelectricityवीज