शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

कृषीपंपासाठी लागणार ६७१ ट्रान्सफॉर्मर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:54 IST

जिल्ह्यात आता नवीन कृषीपंपाची जोडणी उच्चदाब वाहिणीच्या सहाय्याने केली जाणार आहे. यासाठी जिल्हाभरात ६७१ रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) लागणार आहेत. यामुळे लघुदाब वाहिणीतून होणारी वीज गळती टाळता येणार आहे.

ठळक मुद्देवीज गळतीला बसणार आळा : उच्चदाब वितरण प्रणाली योजना कार्यान्वित

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात आता नवीन कृषीपंपाची जोडणी उच्चदाब वाहिणीच्या सहाय्याने केली जाणार आहे. यासाठी जिल्हाभरात ६७१ रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) लागणार आहेत. यामुळे लघुदाब वाहिणीतून होणारी वीज गळती टाळता येणार आहे.कृषीपंपाला आवश्यक तेवढा वीज पुरवठा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने प्रत्येक शेतकऱ्याच्या कृषीपंपासाठी स्वतंत्र ट्रान्सफार्मर लावून देण्यासाठी राज्य शासनाने ‘उच्चदाब वितरण प्रणाली’ योजना सुरू केली आहे. या प्रणालीअंतर्गत शेतकºयांच्या शेतापर्यंत उच्चदाब वाहिणी (११ केव्ही) टाकली जाणार आहे. त्यामुळे लघुदाब वाहिणीची गरज राहणार नाही. शनिवारी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते पारडी येथील शेतकºयांच्या शेतातील कृषी पंपाची कळ दाबून या योजनेचा शुभारंभ केला. जिल्ह्यात मार्च २०१८ अखेर कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी पैसे भरलेल्या ८९९ शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. ०.६ किमीपर्यंत वाहिणी लागणाºया ६७१ अर्जदारांच्या जोडण्या उच्चदाब वितरण प्रणाली योजनेतून केल्या जाणार आहेत. यासाठी स्वतंत्र डीपी बसविली जाणार आहे. या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. काही ठिकाणी काम सुध्दा प्रगतीवर आहेत. गडचिरोली तालुक्यातील पारडी येथील भास्कर शितकुरा गंडाटे तसेच चामोर्शी तालुक्यातील जामगिरी येथील मधुबाई देवतळे यांच्या शेतात उच्चदाब वाहिणीने वीज पुरवठा करण्यात आला आहे. पारडी येथील शेतकऱ्याच्या शेतात जाऊन आमदार डॉ. देवराव होळी यांनी स्वत:च्या हाताने कृषीपंप सुरू करून योजनेचा शुभारंभ केला. यावेळी गडचिरोली महावितरणचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे, कार्यकारी अभियंता विजय मेश्राम उपस्थित होते.२२८ शेतकऱ्यांना मिळणार सौरप्रणालीज्या शेतकऱ्यांचे शेत मुख्य लाईनपासून ०.६ किमीपेक्षा अधिक अंतरावर आहे, अशा २२८ शेतकºयांना सौरऊर्जा प्रणाली उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे याही शेतकऱ्यांना बिनाखर्ची वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे.एका ट्रान्सफॉर्मरची किंमत जवळपास अडीच लाख रूपये आहे. एवढ्या किमतीचे ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे शेत जवळजवळ आहे, अशा दोनपेक्षा अधिक शेतकºयांना एकाच रोहित्रावरून वीज पुरवठा उपलब्ध करून दिला जाणार आहे.ज्या शेतकऱ्यांनी मीटरसाठी डिमांड भरून त्यांना आजपर्यंत वीज पुरवठा उपलब्ध झाला नाही, अशा शेतकऱ्यांना यानंतर पुढे उच्चदाब वाहिणीद्वारेच वीज पुरवठा केला जाणार आहे. शासनाकडून निधी प्राप्त होताच टप्प्याटप्प्याने प्रत्येक शेतकऱ्यांला वीज पुरवठा उपलब्ध करून दिला जाणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीelectricityवीज