शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
2
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
3
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
4
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
5
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
6
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
7
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
8
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
9
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
11
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
12
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
13
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
14
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
15
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
16
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
17
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
18
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
19
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
20
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!

कृषीपंपासाठी लागणार ६७१ ट्रान्सफॉर्मर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:54 IST

जिल्ह्यात आता नवीन कृषीपंपाची जोडणी उच्चदाब वाहिणीच्या सहाय्याने केली जाणार आहे. यासाठी जिल्हाभरात ६७१ रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) लागणार आहेत. यामुळे लघुदाब वाहिणीतून होणारी वीज गळती टाळता येणार आहे.

ठळक मुद्देवीज गळतीला बसणार आळा : उच्चदाब वितरण प्रणाली योजना कार्यान्वित

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात आता नवीन कृषीपंपाची जोडणी उच्चदाब वाहिणीच्या सहाय्याने केली जाणार आहे. यासाठी जिल्हाभरात ६७१ रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) लागणार आहेत. यामुळे लघुदाब वाहिणीतून होणारी वीज गळती टाळता येणार आहे.कृषीपंपाला आवश्यक तेवढा वीज पुरवठा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने प्रत्येक शेतकऱ्याच्या कृषीपंपासाठी स्वतंत्र ट्रान्सफार्मर लावून देण्यासाठी राज्य शासनाने ‘उच्चदाब वितरण प्रणाली’ योजना सुरू केली आहे. या प्रणालीअंतर्गत शेतकºयांच्या शेतापर्यंत उच्चदाब वाहिणी (११ केव्ही) टाकली जाणार आहे. त्यामुळे लघुदाब वाहिणीची गरज राहणार नाही. शनिवारी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते पारडी येथील शेतकºयांच्या शेतातील कृषी पंपाची कळ दाबून या योजनेचा शुभारंभ केला. जिल्ह्यात मार्च २०१८ अखेर कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी पैसे भरलेल्या ८९९ शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. ०.६ किमीपर्यंत वाहिणी लागणाºया ६७१ अर्जदारांच्या जोडण्या उच्चदाब वितरण प्रणाली योजनेतून केल्या जाणार आहेत. यासाठी स्वतंत्र डीपी बसविली जाणार आहे. या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. काही ठिकाणी काम सुध्दा प्रगतीवर आहेत. गडचिरोली तालुक्यातील पारडी येथील भास्कर शितकुरा गंडाटे तसेच चामोर्शी तालुक्यातील जामगिरी येथील मधुबाई देवतळे यांच्या शेतात उच्चदाब वाहिणीने वीज पुरवठा करण्यात आला आहे. पारडी येथील शेतकऱ्याच्या शेतात जाऊन आमदार डॉ. देवराव होळी यांनी स्वत:च्या हाताने कृषीपंप सुरू करून योजनेचा शुभारंभ केला. यावेळी गडचिरोली महावितरणचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे, कार्यकारी अभियंता विजय मेश्राम उपस्थित होते.२२८ शेतकऱ्यांना मिळणार सौरप्रणालीज्या शेतकऱ्यांचे शेत मुख्य लाईनपासून ०.६ किमीपेक्षा अधिक अंतरावर आहे, अशा २२८ शेतकºयांना सौरऊर्जा प्रणाली उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे याही शेतकऱ्यांना बिनाखर्ची वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे.एका ट्रान्सफॉर्मरची किंमत जवळपास अडीच लाख रूपये आहे. एवढ्या किमतीचे ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे शेत जवळजवळ आहे, अशा दोनपेक्षा अधिक शेतकºयांना एकाच रोहित्रावरून वीज पुरवठा उपलब्ध करून दिला जाणार आहे.ज्या शेतकऱ्यांनी मीटरसाठी डिमांड भरून त्यांना आजपर्यंत वीज पुरवठा उपलब्ध झाला नाही, अशा शेतकऱ्यांना यानंतर पुढे उच्चदाब वाहिणीद्वारेच वीज पुरवठा केला जाणार आहे. शासनाकडून निधी प्राप्त होताच टप्प्याटप्प्याने प्रत्येक शेतकऱ्यांला वीज पुरवठा उपलब्ध करून दिला जाणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीelectricityवीज