शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
3
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
4
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
5
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
6
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
7
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
8
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
9
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
10
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
11
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
12
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
13
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
14
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
15
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
16
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
17
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
18
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
19
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
20
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
Daily Top 2Weekly Top 5

६६९ गावे मलेरियाग्रस्त

By admin | Updated: July 29, 2016 01:08 IST

जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीदरम्यान जिल्ह्यातील ६६९ गावांमध्ये...

 आरोग्य यंत्रणेचे विशेष लक्ष : जंगल व धान बांध्यांचा परिणाम; जनजागृतीचा अभाव गडचिरोली : जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीदरम्यान जिल्ह्यातील ६६९ गावांमध्ये मलेरिया जंतुंचा वार्षिक निर्देशांक ५० पेक्षा अधिक आढळून आला आहे. त्यामुळे या गावांना मलेरियादृष्ट्या संवेदनशील गावे म्हणून घोषित करण्यात आली आहेत. पावसाळ्यादरम्यान या गावांमध्ये मलेरियाचा प्रकोप होण्याची सर्वाधिक शक्यता राहत असल्याने आरोग्य विभागाच्या वतीने या गावांमध्ये विशेष उपाययोजना करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये धानाची शेती केली जाते. त्याचबरोबर येथील अधिकचे पर्जन्यमान, दमट वातावरण, गावाच्या सभोवताल असलेले जंगल तसेच नागरिकांमध्ये आरोग्याच्या काळजीबाबत असलेल्या जनजागृतीचा अभाव यामुळे गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यादरम्यान मलेरिया रोगाचा प्रकोप सुरू होतो. हा प्रकोप जुलैपासून आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यापर्यंत कायम राहतो. त्यातही जंगलव्याप्त असलेल्या तालुक्यांमधील गावांमध्ये प्रकोप अधिक असल्याचे दिसून येते. ज्या गावांचा वार्षिक जंतू निर्देशांक ५० पेक्षा अधिक आहे, अशा गावांना आरोग्य विभाग ‘ए’ श्रेणीमध्ये टाकते. गडचिरोली जिल्ह्यात अशा प्रकारची ६६९ गावे आहेत. १० ते ५० पर्यंतचा जंतू निर्देशांक असलेल्या गावांना ‘बी’ श्रेणीमध्ये तर १ ते १० वार्षिक जंतू निर्देशांक असलेल्या गावांना ‘सी’ श्रेणीमध्ये टाकले जाते. यातील ‘ए’ श्रेणीमध्ये मोडणारी गावे मलेरिया रोगाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील समजली जातात. त्यामुळे या गावांवर पावसाळ्याच्या दिवसात आरोग्य विभागाच्या वतीने विशेष लक्ष ठेवले जात आहे. तेथील नागरिकांमध्ये मलेरियाबाबत जनजागृती करण्याबरोबरच वेळोवेळी रक्त घेऊन मलेरिया झाला असल्याचे लक्षात येताच वेळीच उपाययोजना केली जात आहे. (नगर प्रतिनिधी) मलेरिया ट्रॉपिक बेल्टमध्ये गडचिरोली देशामध्ये ओडिशा ते तेलंगणादरम्यानचा उभा पट्टा हा मलेरियासाठी संवेदनशील मानला जातो. त्यामध्ये महाराष्ट्रातील गडचिरोली, गोंदिया, भंडारा व चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यातही गडचिरोली जिल्ह्याचे पर्जन्यमान सर्वाधिक आहे. धानाचे क्षेत्र असल्याने धानाच्या बांधीमध्ये चार महिने पाणी राहते. जनजागृतीअभावी येथील नागरिक मलेरिया झाल्यानंतर आरोग्यविषयक तपासणी करीत नाही. आदी कारणांमुळे राज्याच्या इतर कोणत्याही जिल्ह्यांपेक्षा गडचिरोली जिल्ह्यात मलेरियाचे रुग्ण सर्वाधिक आढळून येतात. सहा महिन्यांत ४ हजार १४७ रुग्ण पॉझिटिव्ह हिवताप कार्यालय तसेच इतर आरोग्य यंत्रणेच्या वतीने १ जानेवारी ते ३० जूनपर्यंत ३ लाख ८८ हजार ८८७ रक्ताचे नमूने घेण्यात आले. त्यापैकी ४ हजार १४७ नमूने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मागील वर्षीसुद्धा याच कालावधीत २ लाख ६२ हजार ९८८ रक्त नमूने घेण्यात आले होते. त्यापैकी ६ हजार ९८६ रक्त नमूने मलेरिया पॉझिटिव्ह आढळून आले. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मलेरिया पॉझिटिव्ह नमून्यांची संख्या २ हजार ८३९ ने कमी आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण मलेरियासाठी पोषक आहे. मात्र नागरिकांनी झोपताना मच्छरदानीचा वापर करणे, ताप आल्यास वेळीच रक्ततपासणी करून घेऊन औषधोपचार घेतल्यास मलेरिया रोगावर वेळीच प्रतिबंध घालता येते. जिल्ह्यात ७२१ हंगामी स्वरूपाचे कर्मचारी नेमले आहेत. ते नागरिकांचे रक्त नमुने घेणे, समुपदेशन करणे, डास उत्पत्ती स्थाने कमी करणे, गप्पी मासे सोडणे, आरोग्य विषयक जनजागृती करणे आदी कामे करीत आहेत. त्यामुळे कोरची वगळता इतर तालुक्यांमध्ये मलेरिया यावर्षी नियंत्रणात आहे. - एस. जे. पांडे, जिल्हा हिवताप अधिकारी गडचिरोली