शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

वर्षभरात गडचिरोलीत ६५ नक्षलवाद्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 01:13 IST

राज्यात सर्वाधिक नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी नक्षली गुन्ह्यांचे प्रमाण घटले असून ६५ नक्षलवाद्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

ठळक मुद्देनऊ नक्षलवादी ठार : नक्षली गुन्ह्यांचे प्रमाण घटल्याची डीआयजी शिंदे यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यात सर्वाधिक नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी नक्षली गुन्ह्यांचे प्रमाण घटले असून ६५ नक्षलवाद्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. याशिवाय पोलीस कारवाईदरम्यान ४० चकमकी होऊन नऊ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.पाच दिवसीय वार्षिक निरीक्षणानंतर बुधवारी त्यांनी वर्षभरातील नक्षल कारवाया आणि पोलीस विभागाने राबविलेले उपक्रम याबद्दलची माहिती पत्रपरिषदेत दिली. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख आणि अपर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित उपस्थित होते.यावर्षी जानेवारी ते आतापर्यंत नक्षली कारवाया नियंत्रणात ठेवण्यात पोलीस विभागाला मोठे यश आल्याचे शिंदे यांनी सांगितले. छत्तीसगड सिमेवरील अबुझमाडच्या जंगलात पहिल्यांदाच गडचिरोली पोलिसांनी शिरून दोन वेळा नक्षलवाद्यांचे ७ घोडे जप्त केले. २० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. १३५ शस्त्रास्त्र आणि १५० किलो स्फोटकं जप्त केली. गेल्यावर्षी नक्षल्यांनी ७६ विविध प्रकारचे गुन्हे घडविले होते. यावर्षी ६२ गुन्हे झाले आहेत. गेल्यावर्षी नक्षल्यांनी १४ निरपराध आदिवासींची हत्या केली होती. यावर्षी ७ जणांची हत्या झाली.यावर्षी नागरिकांमध्ये जागृती करण्यात यश आल्याने नक्षल सप्ताहाला नागरिकांनी प्रथमच उघड विरोध दर्शविला. त्यामुळे हा सप्ताह नक्षलविरोधी सप्ताह झाला. नक्षल चळवळीत भरती होण्यासाठी आता गडचिरोली जिल्ह्यातून कोणी तयार होत नसल्यामुळे छत्तीसगडमधील युवक-युवतींना समाविष्ट करण्याचे प्रमाण जास्त असल्याची माहितीही यावेळी उपमहानिरीक्षक शिंदे आणि पो.अधीक्षक डॉ.देशमुख यांनी दिली.पाच दिवस झालेल्या जिल्हा पोलीस दलाच्या निरीक्षणावर डीआयजी शिंदे यांनी समाधान व्यक्त केले.तीन राज्यांच्या सीमेवर नवीन एओपीनक्षल्यांचे गडचिरोली जिल्ह्यातील अस्तित्व काहीसे कमी झाले असले तरी गोंदिया-बालाघाट-राजनांदगाव या तीन राज्यांच्या सीमावर्ती जिल्ह्यांमिळून नक्षल्यांनी नवीन ठिय्या तयार केला आहे. त्याला नियंत्रणात करण्यासाठी मुरकूटडोह येथे नवीन सशस्त्र दूरक्षेत्र (एओपी) तयार करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.नागरी कृती कार्यक्रमाची व्याप्ती वाढणारगडचिरोली जिल्ह्यात पोलीस वगळता इतर विभागांमध्ये अधिकारी-कर्मचाºयांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे नागरी कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून पोलीसच ग्रामीण भागात इतर विभागांची कामेही करतात. त्यासाठी पोलीस विभागाला स्वतंत्र निधी देण्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली असल्याचे यावेळी पो.अधीक्षक डॉ.देशमुख यांनी सांगितले.युनो आणि केंद्र सरकारने ९ आॅगस्ट हा यावर्षीपासून आदिवासी दिन पाळण्याचे जाहीर केले. त्यानिमित्ताने आदिवासींसाठी विविध स्पर्धा घेऊन त्यांच्या प्रतिभेला चालना देण्याचा प्रयत्न झाला. त्यांचे रेला नृत्य २६ जानेवारीच्या पथसंचलनात समाविष्ट करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.नक्षल कारवायांवर देखरेख करण्यासाठी ड्रोन खरेदीची प्रक्रिया सुरू असून तीन नवीन पोलीस मदत केंद्र प्रस्तावित असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी