शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली जिल्ह्यात दारूवर वर्षाकाठी ६४ कोटी खर्च !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 07:00 IST

liquor Gadchiroli News जानेवारी २०२० मध्ये गडचिरोली जिल्ह्यात केलेल्या सँपल सर्व्हेनुसार येथील १२ लाख लोकसंख्येचा वर्षाकाठी दारूवरील खर्च ६४ कोटी रु पये आहे.

ठळक मुद्देदारूबंदीमुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत १३ टक्केच खर्चडॉ.अभय बंग यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यातील इतर जिल्ह्यांत १२ लाख लोकसंख्येमागे वर्षाला सरासरी ५०० कोटी रूपये लोक दारूवर खर्च करतात. जानेवारी २०२० मध्ये गडचिरोली जिल्ह्यात केलेल्या सँपल सर्व्हेनुसार येथील १२ लाख लोकसंख्येचा वर्षाकाठी दारूवरील खर्च ६४ कोटी रु पये आहे. दारूबंदी असल्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत या जिल्ह्यात दारूवरील खर्च केवळ १३ टक्के आहे. तोही कमी होऊ शकतो. त्यासाठी दारूबंदीची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करावी. ती उठविण्याचा विचारही करू नये, असे आवाहन पद्मश्री डॉ.अभय बंग व डॉ.राणी बंग यांनी केले.

डॉ.बंग दाम्पत्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच शरद पवार, बाळासाहेब थोरात आदी नेत्यांना याबाबतचे निवेदन पाठविले. त्यात नमुद केल्यानुसार, गडचिरोली जिल्ह्यातली दारूबंदी आदिवासी नागरिक व सर्व स्त्रियांच्या हिताची आहे. कोरोनाने जिल्ह्यात माणसे मरत असताना त्यांना वाचवण्याऐवजी दारूबंदी उठविण्यासाठी तातडीने समिती गठीत करण्याचा प्रयत्न करणे चूक आहे. दारूबंदीशी नाही तर कोरोनाशी लढावे, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

गेली २७ वर्षे गडचिरोलीत दारूबंदी आहे. २०१६ सालापासून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाव्यापी दारू-तंबाखूमुक्ती अभियान ‘मुक्तीपथ’ सुरु आहे. परिणामी महाराष्ट्राच्या सरासरीपेक्षा या जिल्ह्यात दारूवरील खर्चाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे त्यांनी सांगितले. दारू सुरू केल्यास स्त्रियांवरील अत्याचार दुप्पट होतील, असा इशारा त्यांनी दिला.

पंचायतराज घटनादुरु स्ती, पेसा कायदा व महाराष्ट्रातील महिला धोरणानुसार आदिवासी ग्रामसभा, महिला ग्रामसभा व ग्रामपंचायतींना दारू नियमन करण्याचे अधिकार आहेत. शेकडो गावांनी दारूबंदीसाठी प्रस्ताव पारित केले आहेत. त्यामुळे दारु बंदी अधिक प्रभावी कशी करावी, हा विचार करावा, ती उठविण्याचा प्रयत्न बेकायदेशीर असल्याचे डॉ.बंग यांना वाटते.

कोरोनापेक्षा दारूबंदी मोठी आपत्ती आहे का?दारू व तंबाखूमुळे कोरोनाचा प्रसार वाढतो. म्हणून या महामारीच्या नियंत्रणासाठी दारू विक्र ी व तंबाखू सेवन बंद करावे, अशा सूचना आरोग्य मंत्रालय, भारत सरकार व आय.सी.एम.आर. यांच्या आहेत. गडचिरोलीमध्ये कोरोना वेगाने पसरतो आहे. अशावेळी कोरोना नियंत्रणाऐवजी दारूबंदी उठविण्याचा विचार घातक आहे. शासनाला कोरोनापेक्षा दारूबंदी मोठी आपत्ती वाटते का? असा सवाल डॉ.बंग दाम्पत्याने उपस्थित केला आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी