शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

गडचिरोली जिल्ह्यात दारूवर वर्षाकाठी ६४ कोटी खर्च !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 07:00 IST

liquor Gadchiroli News जानेवारी २०२० मध्ये गडचिरोली जिल्ह्यात केलेल्या सँपल सर्व्हेनुसार येथील १२ लाख लोकसंख्येचा वर्षाकाठी दारूवरील खर्च ६४ कोटी रु पये आहे.

ठळक मुद्देदारूबंदीमुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत १३ टक्केच खर्चडॉ.अभय बंग यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यातील इतर जिल्ह्यांत १२ लाख लोकसंख्येमागे वर्षाला सरासरी ५०० कोटी रूपये लोक दारूवर खर्च करतात. जानेवारी २०२० मध्ये गडचिरोली जिल्ह्यात केलेल्या सँपल सर्व्हेनुसार येथील १२ लाख लोकसंख्येचा वर्षाकाठी दारूवरील खर्च ६४ कोटी रु पये आहे. दारूबंदी असल्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत या जिल्ह्यात दारूवरील खर्च केवळ १३ टक्के आहे. तोही कमी होऊ शकतो. त्यासाठी दारूबंदीची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करावी. ती उठविण्याचा विचारही करू नये, असे आवाहन पद्मश्री डॉ.अभय बंग व डॉ.राणी बंग यांनी केले.

डॉ.बंग दाम्पत्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच शरद पवार, बाळासाहेब थोरात आदी नेत्यांना याबाबतचे निवेदन पाठविले. त्यात नमुद केल्यानुसार, गडचिरोली जिल्ह्यातली दारूबंदी आदिवासी नागरिक व सर्व स्त्रियांच्या हिताची आहे. कोरोनाने जिल्ह्यात माणसे मरत असताना त्यांना वाचवण्याऐवजी दारूबंदी उठविण्यासाठी तातडीने समिती गठीत करण्याचा प्रयत्न करणे चूक आहे. दारूबंदीशी नाही तर कोरोनाशी लढावे, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

गेली २७ वर्षे गडचिरोलीत दारूबंदी आहे. २०१६ सालापासून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाव्यापी दारू-तंबाखूमुक्ती अभियान ‘मुक्तीपथ’ सुरु आहे. परिणामी महाराष्ट्राच्या सरासरीपेक्षा या जिल्ह्यात दारूवरील खर्चाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे त्यांनी सांगितले. दारू सुरू केल्यास स्त्रियांवरील अत्याचार दुप्पट होतील, असा इशारा त्यांनी दिला.

पंचायतराज घटनादुरु स्ती, पेसा कायदा व महाराष्ट्रातील महिला धोरणानुसार आदिवासी ग्रामसभा, महिला ग्रामसभा व ग्रामपंचायतींना दारू नियमन करण्याचे अधिकार आहेत. शेकडो गावांनी दारूबंदीसाठी प्रस्ताव पारित केले आहेत. त्यामुळे दारु बंदी अधिक प्रभावी कशी करावी, हा विचार करावा, ती उठविण्याचा प्रयत्न बेकायदेशीर असल्याचे डॉ.बंग यांना वाटते.

कोरोनापेक्षा दारूबंदी मोठी आपत्ती आहे का?दारू व तंबाखूमुळे कोरोनाचा प्रसार वाढतो. म्हणून या महामारीच्या नियंत्रणासाठी दारू विक्र ी व तंबाखू सेवन बंद करावे, अशा सूचना आरोग्य मंत्रालय, भारत सरकार व आय.सी.एम.आर. यांच्या आहेत. गडचिरोलीमध्ये कोरोना वेगाने पसरतो आहे. अशावेळी कोरोना नियंत्रणाऐवजी दारूबंदी उठविण्याचा विचार घातक आहे. शासनाला कोरोनापेक्षा दारूबंदी मोठी आपत्ती वाटते का? असा सवाल डॉ.बंग दाम्पत्याने उपस्थित केला आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी