शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
3
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
4
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
5
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
6
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
7
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
8
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
9
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
10
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
11
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
12
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
13
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
14
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
15
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
16
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
17
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
19
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
20
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी

६३९ मंडळांची नोंदणीकडे पाठ

By admin | Updated: September 8, 2016 01:24 IST

राज्य शासनाने यावर्षी लोकमान्य गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या वतीने सार्वजनिक मंडळांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

स्पर्धांपासून वंचित राहणार : केवळ ४६ मंडळांनी केली धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणीगडचिरोली : राज्य शासनाने यावर्षी लोकमान्य गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या वतीने सार्वजनिक मंडळांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या योजनेत सहभागी होण्यासाठी संबंधित सार्वजनिक मंडळाची नोंदणी धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे असणे आवश्यक आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात एकूण ६२५ सार्वजनिक मंडळांपैकी ४६ मंडळांनीच गडचिरोली येथील धर्मदाय आयुक्त कार्यालयात नोंदणी केली आहे. उर्वरित ६३९ मंडळांनी नोंदणीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे सदर सार्वजनिक गणेश मंडळे शासनाच्या विविध स्पर्धांच्या सहभागापासून वंचित राहणार आहेत. यावर्षी महाराष्ट्र शासनाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची १२५ वी जन्म शताब्दी दिवस साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांसाठी विविध विषयांवर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये व्यसनमुक्ती, बेटी बचाव, स्वदेशी, साक्षरता, जलसंवर्धन आदी चार विषयांवर गणेश मंडळांना स्पर्धेत सहभागी होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रशासनाच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. सार्वजनिक गणेश उत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे सध्या १६० वे जयंती वर्ष सुरू आहे. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या या सार्वजनिक गणेश उत्सवाच्या चळवळीला पुढील वर्षी १२५ वर्ष पूर्ण होत आहेत. तसेच ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळविणारच’ या लोकमान्य टिळकांच्या जगप्रसिद्ध उद्गारचे चालू वर्ष शतक महोत्सवी वर्ष आहे.गडचिरोली जिल्ह्यात यंदा ९ पोलीस उपविभाग मिळून एकूण ४९३ सार्वजनिक मंडळांमार्फत गणेशोत्सव सुरू आहे. याशिवाय १९२ गावांमध्ये एक गाव, एक गणपतीची संकल्पना राबविण्यात येत असून या गावांमध्येही मोठ्या उत्साहात एकात्मतेने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. एकूण ६८५ सार्वजनिक गणेश मंडळांपैकी केवळ ४६ मंडळांनी धर्मदाय आयुक्त कार्यालय गडचिरोली यांच्याकडे सर्व कागदपत्रे सादर करून रितसर नोंदणी केली आहे. तर एका सार्वजनिक गणेश मंडळाचा अर्ज धर्मदाय आयुक्त कार्यालयात शिल्लक आहे. या मंडळालाही संबधित कार्यालयाकडून परवानगी पत्र देण्यात येणार आहे.विशेष म्हणजे सार्वजनिक गणेश मंडळांना गणेशोत्सवाच्या दहा दिवसांपूर्वी सर्व आवश्यक कागदपत्र सादर करून नोंदणी करणे गरजेचे होते. शांतता समितीच्या बैठकीत धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या नोंदणीबाबत माहिती देण्यात आली होती. मात्र ६०० वर सार्वजनिक गणेश मंडळांनी केवळ आपल्या गावालगतच्या पोलीस ठाण्यात नोंदणी केली आहे. मात्र या मंडळांनी धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या नोंदणीकडे पाठ फिरविली. त्यामुळे या मंडळांना राज्य शासनाच्या विविध स्पर्धांच्या सहभागापासून वंचित राहावे लागणार आहे. परिणामी पुरस्कारालाही सदर मंडळे मुकणार आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)