शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

आरटीई प्रवेशासाठी यावर्षी ६२४ जागा राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 23:30 IST

यावर्षी जिल्हाभरातील ७६ शाळांमध्ये ६२४ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ३ मार्चपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी अर्ज करावे, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत  करण्यात  आले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांच्या बालकांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश दिला जाते. जिल्हाभरातील ७६ शाळांनी ६२४ जागा आरटीई प्रवेशासाठी रिक्त ठेवल्या आहेत.

ठळक मुद्दे३ पासून प्रवेश प्रक्रिया सुरू, जिल्हाभरातील ७६ शाळांचा समावेश

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : शिक्षणाचा हक्क अधिनियमानुसार (आरटीई) दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. यावर्षी जिल्हाभरातील ७६ शाळांमध्ये ६२४ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ३ मार्चपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी अर्ज करावे, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत  करण्यात  आले.आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांच्या बालकांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश दिला जाते. जिल्हाभरातील ७६ शाळांनी ६२४ जागा आरटीई प्रवेशासाठी रिक्त ठेवल्या आहेत. यामध्ये गडचिराेली तालुक्यातील १४ शाळांमध्ये ९३ जागा, आरमाेरी तालुक्यातील ४ शाळांमध्ये ५१ जागा, कुरखेडा तालुक्यातील ८ शाळांमध्ये ४० जागा, धानाेरातील ३ शाळांमध्ये २४ जागा, चामाेर्शीतील १० शाळांमध्ये ७२ जागा, अहेरीतील १० शाळांमध्ये ५६ जागा, एटापल्लीतील दाेन शाळांमध्ये २५ जागा, सिराेंचा तालुक्यातील सात शाळांमध्ये ९८ जागा, मुलचेरा तालुक्यातील चार शाळांमध्ये ४४ जागा, काेरची तालुक्यातील तीन शाळांमध्ये २६ जागा व देसाईगंज तालुक्यातील ११ शाळांमध्ये ९५ जागा राखीव ठेवल्या आहेत. विद्यार्थ्याच्या प्रवेशासाठी आधारकार्ड, जन्मतारखेचा दाखला, रहिवासी दाखला, निवासी पुरावा, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. निवासासंदर्भात रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज बिल, टेलिफाेन बिल, प्राॅपर्टी टॅक्स, घर टॅक्स, बॅंक पासबुक आदी पुरावे ग्राह्य धरले जातील.आर्थिकदुर्बल घटकातील मुलांचे शिक्षण नामांकित शाळांमध्ये हाेण्यासाठी सरकारकडून ही याेजना राबविली जाते.

चुकीची माहिती भरल्यास प्रवेश हाेणार रद्दअर्ज करतेवेळी काेणतीही कागदपत्रे मागितली जात नाहीत. केवळ ऑनलाईन अर्जावर विश्वास ठेवून लाॅटरी काढली जाते. काही पालक चुकीचा पत्ता, चुकीचे उत्पन्न दाखवितात. विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी गट शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २० सदस्यांची समिती गठीत केली जाणार आहे. या समितीमार्फत प्रवेश घेतवेळी कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. तपासणीदरम्यान अर्जात भरलेली माहिती व प्रत्यक्ष कागदपत्रे यामध्ये तफावत आढळल्यास त्याचा प्रवेश रद्द केला जाणार आहे. त्यामुळे चुकीची माहिती भरू नये, असे आवाहन शिक्षणाधिकारी यांनी केले आहे.

 

टॅग्स :Educationशिक्षण