शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

आरटीई प्रवेशासाठी यावर्षी ६२४ जागा राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 23:30 IST

यावर्षी जिल्हाभरातील ७६ शाळांमध्ये ६२४ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ३ मार्चपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी अर्ज करावे, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत  करण्यात  आले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांच्या बालकांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश दिला जाते. जिल्हाभरातील ७६ शाळांनी ६२४ जागा आरटीई प्रवेशासाठी रिक्त ठेवल्या आहेत.

ठळक मुद्दे३ पासून प्रवेश प्रक्रिया सुरू, जिल्हाभरातील ७६ शाळांचा समावेश

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : शिक्षणाचा हक्क अधिनियमानुसार (आरटीई) दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. यावर्षी जिल्हाभरातील ७६ शाळांमध्ये ६२४ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ३ मार्चपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी अर्ज करावे, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत  करण्यात  आले.आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांच्या बालकांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश दिला जाते. जिल्हाभरातील ७६ शाळांनी ६२४ जागा आरटीई प्रवेशासाठी रिक्त ठेवल्या आहेत. यामध्ये गडचिराेली तालुक्यातील १४ शाळांमध्ये ९३ जागा, आरमाेरी तालुक्यातील ४ शाळांमध्ये ५१ जागा, कुरखेडा तालुक्यातील ८ शाळांमध्ये ४० जागा, धानाेरातील ३ शाळांमध्ये २४ जागा, चामाेर्शीतील १० शाळांमध्ये ७२ जागा, अहेरीतील १० शाळांमध्ये ५६ जागा, एटापल्लीतील दाेन शाळांमध्ये २५ जागा, सिराेंचा तालुक्यातील सात शाळांमध्ये ९८ जागा, मुलचेरा तालुक्यातील चार शाळांमध्ये ४४ जागा, काेरची तालुक्यातील तीन शाळांमध्ये २६ जागा व देसाईगंज तालुक्यातील ११ शाळांमध्ये ९५ जागा राखीव ठेवल्या आहेत. विद्यार्थ्याच्या प्रवेशासाठी आधारकार्ड, जन्मतारखेचा दाखला, रहिवासी दाखला, निवासी पुरावा, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. निवासासंदर्भात रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज बिल, टेलिफाेन बिल, प्राॅपर्टी टॅक्स, घर टॅक्स, बॅंक पासबुक आदी पुरावे ग्राह्य धरले जातील.आर्थिकदुर्बल घटकातील मुलांचे शिक्षण नामांकित शाळांमध्ये हाेण्यासाठी सरकारकडून ही याेजना राबविली जाते.

चुकीची माहिती भरल्यास प्रवेश हाेणार रद्दअर्ज करतेवेळी काेणतीही कागदपत्रे मागितली जात नाहीत. केवळ ऑनलाईन अर्जावर विश्वास ठेवून लाॅटरी काढली जाते. काही पालक चुकीचा पत्ता, चुकीचे उत्पन्न दाखवितात. विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी गट शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २० सदस्यांची समिती गठीत केली जाणार आहे. या समितीमार्फत प्रवेश घेतवेळी कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. तपासणीदरम्यान अर्जात भरलेली माहिती व प्रत्यक्ष कागदपत्रे यामध्ये तफावत आढळल्यास त्याचा प्रवेश रद्द केला जाणार आहे. त्यामुळे चुकीची माहिती भरू नये, असे आवाहन शिक्षणाधिकारी यांनी केले आहे.

 

टॅग्स :Educationशिक्षण