शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेशासाठी यावर्षी ६२४ जागा राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 23:30 IST

यावर्षी जिल्हाभरातील ७६ शाळांमध्ये ६२४ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ३ मार्चपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी अर्ज करावे, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत  करण्यात  आले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांच्या बालकांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश दिला जाते. जिल्हाभरातील ७६ शाळांनी ६२४ जागा आरटीई प्रवेशासाठी रिक्त ठेवल्या आहेत.

ठळक मुद्दे३ पासून प्रवेश प्रक्रिया सुरू, जिल्हाभरातील ७६ शाळांचा समावेश

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : शिक्षणाचा हक्क अधिनियमानुसार (आरटीई) दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. यावर्षी जिल्हाभरातील ७६ शाळांमध्ये ६२४ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ३ मार्चपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी अर्ज करावे, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत  करण्यात  आले.आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांच्या बालकांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश दिला जाते. जिल्हाभरातील ७६ शाळांनी ६२४ जागा आरटीई प्रवेशासाठी रिक्त ठेवल्या आहेत. यामध्ये गडचिराेली तालुक्यातील १४ शाळांमध्ये ९३ जागा, आरमाेरी तालुक्यातील ४ शाळांमध्ये ५१ जागा, कुरखेडा तालुक्यातील ८ शाळांमध्ये ४० जागा, धानाेरातील ३ शाळांमध्ये २४ जागा, चामाेर्शीतील १० शाळांमध्ये ७२ जागा, अहेरीतील १० शाळांमध्ये ५६ जागा, एटापल्लीतील दाेन शाळांमध्ये २५ जागा, सिराेंचा तालुक्यातील सात शाळांमध्ये ९८ जागा, मुलचेरा तालुक्यातील चार शाळांमध्ये ४४ जागा, काेरची तालुक्यातील तीन शाळांमध्ये २६ जागा व देसाईगंज तालुक्यातील ११ शाळांमध्ये ९५ जागा राखीव ठेवल्या आहेत. विद्यार्थ्याच्या प्रवेशासाठी आधारकार्ड, जन्मतारखेचा दाखला, रहिवासी दाखला, निवासी पुरावा, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. निवासासंदर्भात रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज बिल, टेलिफाेन बिल, प्राॅपर्टी टॅक्स, घर टॅक्स, बॅंक पासबुक आदी पुरावे ग्राह्य धरले जातील.आर्थिकदुर्बल घटकातील मुलांचे शिक्षण नामांकित शाळांमध्ये हाेण्यासाठी सरकारकडून ही याेजना राबविली जाते.

चुकीची माहिती भरल्यास प्रवेश हाेणार रद्दअर्ज करतेवेळी काेणतीही कागदपत्रे मागितली जात नाहीत. केवळ ऑनलाईन अर्जावर विश्वास ठेवून लाॅटरी काढली जाते. काही पालक चुकीचा पत्ता, चुकीचे उत्पन्न दाखवितात. विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी गट शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २० सदस्यांची समिती गठीत केली जाणार आहे. या समितीमार्फत प्रवेश घेतवेळी कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. तपासणीदरम्यान अर्जात भरलेली माहिती व प्रत्यक्ष कागदपत्रे यामध्ये तफावत आढळल्यास त्याचा प्रवेश रद्द केला जाणार आहे. त्यामुळे चुकीची माहिती भरू नये, असे आवाहन शिक्षणाधिकारी यांनी केले आहे.

 

टॅग्स :Educationशिक्षण