शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
3
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
4
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
5
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
6
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
7
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
8
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
9
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
10
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
12
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
13
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
14
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!
15
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसला मसूद अजहर; आता बिलावल भुट्टो आपला शब्द खरा करणार का?
16
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
17
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
18
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
19
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
20
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान

सव्वा कोटीतून ६२ वनतळ्यांची निर्मिती

By admin | Updated: December 6, 2015 01:34 IST

वन्य पशुंची उन्हाळ्यात तहाण भागविण्याबरोबरच भूजल साठ्यात वाढ करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने गडचिरोली वनवृत्तासाठी सुमारे ६२ वनतळे ...

वन विभागाचा उपक्रम : वन्य पशुंची तहान भागणारगडचिरोली : वन्य पशुंची उन्हाळ्यात तहाण भागविण्याबरोबरच भूजल साठ्यात वाढ करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने गडचिरोली वनवृत्तासाठी सुमारे ६२ वनतळे व सिमेंट बंधारे मंजूर केले आहेत. त्यासाठी १ कोटी २४ लाख ६६ हजार रूपयांचा निधीसुध्दा उपलब्ध करून दिला आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ७८ टक्के जंगल आहे. या जंगलामध्ये विविध प्रकारचे वन्य पशु आहेत. पावसाळा व हिवाळ्यात नदी, नाल्यांना पाणी राहत असल्याने वन्य पशुंना पाण्यासाठी गावाकडे धाव घ्यावी लागत नाही. मात्र मार्च नंतर लहान नद्या व तलाव कोरडे पडण्यास सुरूवात होतात. परिणामी वन्य पशुंना पाण्यासाठी गावाकडे धाव घ्यावी लागते. यातून प्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडतात. तर काही प्राणी पाण्याअभावी तडफडून मरतात. या सर्व बाबी लक्षात घेऊन मागील तीन वर्षांपासून वन विभागाच्या मार्फतीने राज्य शासन जंगलात शेततळे बांधत आहे. मागील वर्षी सुमारे २४५ वनतळे बांधण्यात आले होते. त्यावर पाच कोटी रूपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च झाली होती. यावर्षी राज्य शासनाने ६२ वनतळे व सिमेंट बंधारे बांधण्यास मंजुरी दिली आहे. त्यासाठी १ कोटी २४ लाख ६६ हजार रूपयांचा निधी मंजूर केला आहे. लवकरच निविदा काढली जाणार असून मार्चपूर्वी सर्वच वनतळ्यांचे काम पूर्ण केले जाणार आहे. मागील वर्षीचे २४५ व यावर्षीचे ६५ असे एकूण ३०७ वनतळे जिल्ह्यात होणार आहेत. या वन तळ्यामध्ये पाणी साचून वन्यप्राण्यांची तहाण जंगलातच भागण्यास मदत होईल. (नगर प्रतिनिधी)१०० वॉटर होलची निर्मितीवन्य प्राण्यांची तहाण भागविण्यासाठी वन विभागाच्या मार्फतीने वॉटर होलचेही बांधकाम करण्यात येते. या वॉटर होलमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवठा केला जातो. सदर वॉटर होल केवळ १५ हजार रूपयांच्या निधीत तयार होत असल्याने वन विभाग वॉटर होल निर्मितीवर विशेष भर देतो. चालू वर्षी १०० वॉटर होलचे बांधकाम केले जाणार आहे. नाल्यांवर सिमेंट बंधाऱ्यांचे बांधकाम जंगलात अनेक लहान-मोठे नाले आहेत. या नाल्यांचे पाणी अडविल्यास वन्य पशुंची तहाण भागविणे शक्य आहे. ही बाब लक्षात घेऊन वनतळ्यांबरोबरच ज्या ठिकाणी नाला आहे व या नाल्याला एप्रिल, मे महिन्यापर्यंत पाणी उपलब्ध राहते, अशा नाल्यावर सिमेंट बंधारा बांधून पाणी अडविले जाणार आहे. भूजल पातळी वाढण्यासही मदतभूजल पातळी वाढण्याबरोबरच सिंचनाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान राज्यभरात सुरू केले आहे. या अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ३३६ शेततळ्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. वनतळ्यांच्या माध्यमातूनही भूजल साठ्यात वाढ होईल, अशी अपेक्षा शासनाला असल्याने यावर्षी वनतळ्यांसाठी तत्काळ निधी उपलब्ध करून दिला आहे.