शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

सव्वा कोटीतून ६२ वनतळ्यांची निर्मिती

By admin | Updated: December 6, 2015 01:34 IST

वन्य पशुंची उन्हाळ्यात तहाण भागविण्याबरोबरच भूजल साठ्यात वाढ करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने गडचिरोली वनवृत्तासाठी सुमारे ६२ वनतळे ...

वन विभागाचा उपक्रम : वन्य पशुंची तहान भागणारगडचिरोली : वन्य पशुंची उन्हाळ्यात तहाण भागविण्याबरोबरच भूजल साठ्यात वाढ करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने गडचिरोली वनवृत्तासाठी सुमारे ६२ वनतळे व सिमेंट बंधारे मंजूर केले आहेत. त्यासाठी १ कोटी २४ लाख ६६ हजार रूपयांचा निधीसुध्दा उपलब्ध करून दिला आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ७८ टक्के जंगल आहे. या जंगलामध्ये विविध प्रकारचे वन्य पशु आहेत. पावसाळा व हिवाळ्यात नदी, नाल्यांना पाणी राहत असल्याने वन्य पशुंना पाण्यासाठी गावाकडे धाव घ्यावी लागत नाही. मात्र मार्च नंतर लहान नद्या व तलाव कोरडे पडण्यास सुरूवात होतात. परिणामी वन्य पशुंना पाण्यासाठी गावाकडे धाव घ्यावी लागते. यातून प्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडतात. तर काही प्राणी पाण्याअभावी तडफडून मरतात. या सर्व बाबी लक्षात घेऊन मागील तीन वर्षांपासून वन विभागाच्या मार्फतीने राज्य शासन जंगलात शेततळे बांधत आहे. मागील वर्षी सुमारे २४५ वनतळे बांधण्यात आले होते. त्यावर पाच कोटी रूपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च झाली होती. यावर्षी राज्य शासनाने ६२ वनतळे व सिमेंट बंधारे बांधण्यास मंजुरी दिली आहे. त्यासाठी १ कोटी २४ लाख ६६ हजार रूपयांचा निधी मंजूर केला आहे. लवकरच निविदा काढली जाणार असून मार्चपूर्वी सर्वच वनतळ्यांचे काम पूर्ण केले जाणार आहे. मागील वर्षीचे २४५ व यावर्षीचे ६५ असे एकूण ३०७ वनतळे जिल्ह्यात होणार आहेत. या वन तळ्यामध्ये पाणी साचून वन्यप्राण्यांची तहाण जंगलातच भागण्यास मदत होईल. (नगर प्रतिनिधी)१०० वॉटर होलची निर्मितीवन्य प्राण्यांची तहाण भागविण्यासाठी वन विभागाच्या मार्फतीने वॉटर होलचेही बांधकाम करण्यात येते. या वॉटर होलमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवठा केला जातो. सदर वॉटर होल केवळ १५ हजार रूपयांच्या निधीत तयार होत असल्याने वन विभाग वॉटर होल निर्मितीवर विशेष भर देतो. चालू वर्षी १०० वॉटर होलचे बांधकाम केले जाणार आहे. नाल्यांवर सिमेंट बंधाऱ्यांचे बांधकाम जंगलात अनेक लहान-मोठे नाले आहेत. या नाल्यांचे पाणी अडविल्यास वन्य पशुंची तहाण भागविणे शक्य आहे. ही बाब लक्षात घेऊन वनतळ्यांबरोबरच ज्या ठिकाणी नाला आहे व या नाल्याला एप्रिल, मे महिन्यापर्यंत पाणी उपलब्ध राहते, अशा नाल्यावर सिमेंट बंधारा बांधून पाणी अडविले जाणार आहे. भूजल पातळी वाढण्यासही मदतभूजल पातळी वाढण्याबरोबरच सिंचनाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान राज्यभरात सुरू केले आहे. या अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ३३६ शेततळ्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. वनतळ्यांच्या माध्यमातूनही भूजल साठ्यात वाढ होईल, अशी अपेक्षा शासनाला असल्याने यावर्षी वनतळ्यांसाठी तत्काळ निधी उपलब्ध करून दिला आहे.