शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

६० ट्रॅप कॅमेरे, पथकही शोधतेय पण, तीन बळी घेणारा वाघ सापडेना!

By गेापाल लाजुरकर | Updated: January 7, 2024 19:49 IST

‘जी-१८’ हल्लेखोर वाघाची वाकडी परिसरात दहशत.

गडचिरोली : गडचिरोली वनपरिक्षेत्रातील वाकडी परिसरात दोन महिन्यांत तीन महिलांचा बळी घेणाऱ्या जी-१८ वाघाची दहशत कायम असून त्या वाघाला जेरबंद करण्यासाठी परिसरात ६० ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. वाघाचे लोकेशन कॅमेऱ्याद्वारे घेतले जात आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून आलेले पथकसुद्धा मागावर आहे; परंतु पथकाला वाघ हुलकावणी देत आहे.

वाकडी परिसरात गेल्या पाच वर्षांपासूनच वाघांचा वावर आहे. परंतु या परिसरात मानवावर वाघांनी हल्ले केले नव्हते. २४ नोव्हेंबरला हिरापूर व १५ डिसेंबर २०२३ रोजी गोविंदपूर व नवीन वर्षांत ३ जानेवारीला वाकडी येथील महिलेचा बळी वाघाने घेतला. तर मागील वर्षाअखेर ३० डिसेंबरला बाेदली येथील एका महिलेला जखमी केले. हे सर्व हल्ले जी-१८ वाघानेच केले. ही बाब स्पष्ट झाल्यानंतर वाघाला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने ताडाेबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून विशेष चमू बोलावली. स्थानिक एक चमू नेमली, तसेच परिसरात ६० ट्रॅप कॅमेरे लावले. दोन रेडे शिकार सापळे (बेट) सुद्धा लावले आहेत. वाघाच्या हालचालींवर पथक लक्ष ठेवून आहे. वनविभागाकडून परिसरातील लोकांमध्ये जागृती केली जात आहे. लोकेशन मिळेनाजी-१८ ह्या हल्लेखोर वाघाला जेरबंद करण्यासाठी ताडोबा येथील डॉ. रविकांत खोब्रागडे यांची चमू तीन दिवसांपूर्वी दाखल झाली. यापूर्वी मुडझा, वाकडी, हिरापूर मारोडा, गुरवळा, गोविंदपूर आदी परिसरात ट्रॅप कॅमेरेसुद्धा लावले; परंतु सदर वाघ हुलकावणी देत आहे. त्याचे निश्चित लोकेशन मिळत नसल्याने जेरबंद करण्याची मोहीम लांबत आहे.

वाकडीतील मुलांसाठी वाहनाची सोयवाकडी गावातील अनेक विद्यार्थी गडचिरोली येथे शिक्षणासाठी जातात. ते संध्याकाळी उशिरापर्यंत घरी पोहोचतात. त्यांना धोका होऊ नये यासाठी वनविभागाने गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील फाट्यापासून वाकडीपर्यंत जाण्यासाठी वाहनाची सोय केली. विद्यार्थी व उशिरा घरी जाणाऱ्या लाेकांनाही सुरक्षितरित्या घरी पोहोचविले जात आहे. जी-१८ वाघाला जेरबंद करण्यासाठी वन विभाग प्रयत्नशील आहे. वाघाच्या प्रत्येक हालचालींवर ट्रॅप कॅमेरांद्वारे नजर आहे. बेटसुद्धा बांधले आहेत. काही भागांत वाघाचे पगमार्कसुद्धा आढळून आले आहेत. लवकरच वाघ जेरबंद केला जाईल. तोपर्यंत नागरिकांनी जंगलात जाऊ नये. वन विभागाला सहकार्य करावे.-मिलिश शर्मा, उपवन संरक्षक, वनविभाग, गडचिरोली

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली