शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

१० वर्षात ६९७ किमी लांबीच्या रस्त्यांची निर्मिती

By admin | Updated: November 22, 2014 01:18 IST

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात १४ वर्षांच्या कालावधीत सुमारे ६९७.३७ किमीचे रस्ते बांधण्यात आले असून ...

दिगांबर जवादे गडचिरोलीप्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात १४ वर्षांच्या कालावधीत सुमारे ६९७.३७ किमीचे रस्ते बांधण्यात आले असून त्यावर १९७ कोटी ७५ लाख २९ हजार रूपये खर्च झाले आहेत. देशातील प्रत्येक गाव बारमाही रस्त्याने जोडण्याच्या उद्देशाने तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी २००० साली प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली. या योजनेंतर्गत ५०० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेली गावे जोडण्याचे उद्दिष्ट या योजनेंतर्गत देण्यात आले. आदिवासी भागासाठी यामध्ये थोडी शिथीलता देऊन ही अट २५० पेक्षा अधिक लोकसंख्या ऐवढी ठेवण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात या योजनेच्या कामाला २००० पासून सुरूवात झाली. सध्य:स्थितीत या योजनेचा दहावा टप्पा सुरू आहे. पहिला व दुसरा टप्पा जिल्हा परिषदेच्या मार्फतीने राबविण्यात आला. सन २००६-०७ मध्ये ही योजना राबविण्यासाठी ग्रामीण रस्ते विकास संस्थेची स्थापना करण्यात आली. तर २००९ पासून यासाठी स्वतंत्र कार्यकारी यंत्रणा स्थापन करण्यात आली व या यंत्रणेच्या मार्फतीने सध्या या योजनेचे काम सुरू आहे. २००० ते २०१४ या कालावधीपर्यंत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत २३३ कामांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी १८१ कामे पूर्ण झाली आहेत. तर ३८ कामे प्रगतीपथावर आहेत. विविध कारणांमुळे १४ कामे नियोजनातून वगळण्यात आली आहेत. यातून १०७४.३२ किमीचे रस्ते बांधण्याला मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी प्रत्यक्षात ६९७.३७ किमीचे रस्ते बांधण्यात आले आहेत. यातून गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो गावे रस्त्यांनी जोडण्यास मदत झाली आहे.गडचिरोली जिल्ह्यात २५० पेक्षा कमी लोकसंख्या असलेली अनेक गावे आहेत. देशातील सर्वच गावे रस्त्यांनी जोडण्यासाठी सदर योजनेची सुरूवात करण्यात आली असली तरी गडचिरोली जिल्ह्यातील २९९ गावे अजूनही बारमाही रस्त्यांनी जोडण्यात आली नाही. त्यामुळे या गावातील नागरिकांना पायवाटेचाच आधार घ्यावा लागतो. पावसाळ्याच्या दिवसात या गावांचा संपर्क तुटत असल्याने प्रचंड त्रास सहन करावा लागतो.