शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
बलुचिस्तानात मोठा खेला...! सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग; भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला
3
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
4
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
5
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
6
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
7
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
8
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
9
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
10
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
11
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
12
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
13
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
15
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
16
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
17
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
18
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
19
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
20
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा

१० वर्षात ६९७ किमी लांबीच्या रस्त्यांची निर्मिती

By admin | Updated: November 22, 2014 01:18 IST

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात १४ वर्षांच्या कालावधीत सुमारे ६९७.३७ किमीचे रस्ते बांधण्यात आले असून ...

दिगांबर जवादे गडचिरोलीप्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात १४ वर्षांच्या कालावधीत सुमारे ६९७.३७ किमीचे रस्ते बांधण्यात आले असून त्यावर १९७ कोटी ७५ लाख २९ हजार रूपये खर्च झाले आहेत. देशातील प्रत्येक गाव बारमाही रस्त्याने जोडण्याच्या उद्देशाने तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी २००० साली प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली. या योजनेंतर्गत ५०० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेली गावे जोडण्याचे उद्दिष्ट या योजनेंतर्गत देण्यात आले. आदिवासी भागासाठी यामध्ये थोडी शिथीलता देऊन ही अट २५० पेक्षा अधिक लोकसंख्या ऐवढी ठेवण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात या योजनेच्या कामाला २००० पासून सुरूवात झाली. सध्य:स्थितीत या योजनेचा दहावा टप्पा सुरू आहे. पहिला व दुसरा टप्पा जिल्हा परिषदेच्या मार्फतीने राबविण्यात आला. सन २००६-०७ मध्ये ही योजना राबविण्यासाठी ग्रामीण रस्ते विकास संस्थेची स्थापना करण्यात आली. तर २००९ पासून यासाठी स्वतंत्र कार्यकारी यंत्रणा स्थापन करण्यात आली व या यंत्रणेच्या मार्फतीने सध्या या योजनेचे काम सुरू आहे. २००० ते २०१४ या कालावधीपर्यंत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत २३३ कामांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी १८१ कामे पूर्ण झाली आहेत. तर ३८ कामे प्रगतीपथावर आहेत. विविध कारणांमुळे १४ कामे नियोजनातून वगळण्यात आली आहेत. यातून १०७४.३२ किमीचे रस्ते बांधण्याला मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी प्रत्यक्षात ६९७.३७ किमीचे रस्ते बांधण्यात आले आहेत. यातून गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो गावे रस्त्यांनी जोडण्यास मदत झाली आहे.गडचिरोली जिल्ह्यात २५० पेक्षा कमी लोकसंख्या असलेली अनेक गावे आहेत. देशातील सर्वच गावे रस्त्यांनी जोडण्यासाठी सदर योजनेची सुरूवात करण्यात आली असली तरी गडचिरोली जिल्ह्यातील २९९ गावे अजूनही बारमाही रस्त्यांनी जोडण्यात आली नाही. त्यामुळे या गावातील नागरिकांना पायवाटेचाच आधार घ्यावा लागतो. पावसाळ्याच्या दिवसात या गावांचा संपर्क तुटत असल्याने प्रचंड त्रास सहन करावा लागतो.