शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

वृक्ष लागवडीचे ५७ टक्के उद्दिष्ट साध्य

By admin | Updated: December 9, 2014 22:51 IST

महाराष्ट्र शासनाने शतकोटी वृक्षलागवड योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला ९२ लाख २१ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट यावर्षी देण्यात आले होते. मात्र ३ डिसेंबरपर्यंत केवळ

गडचिरोली : महाराष्ट्र शासनाने शतकोटी वृक्षलागवड योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला ९२ लाख २१ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट यावर्षी देण्यात आले होते. मात्र ३ डिसेंबरपर्यंत केवळ ५२ लाख ५९ हजार ७१९ वृक्षांची लागवड करण्यात आली असून उद्दिष्टाच्या ५७ टक्के वृक्ष लागवड झाली आहे. वाढलेली लोकसंख्या, औद्योगिकरण, शेती यासाठी जंगलांची मोठ्या प्रमाणात तोड करण्यात आली. त्यामुळे जंगलाच्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय पर्यावरण संस्थेने मात्र पर्यावरण योग्य राहण्यासाठी किमान ३३ टक्के जंगल असणे, आवश्यक करण्यात आले आहे. वृक्षांचे प्रमाण वाढविण्यासाठी शासनाने २ वर्षापूर्वी राज्यात शतकोटी वृक्ष लागवड योजना सुरू केली. या योजनेंतर्गत ५ वर्षात १०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. त्यासाठी वनविभाग, जिल्हा परिषद, सामाजिक वनिकरण विभाग, कृषी विभाग, एफडीसीएम आदी विभागांना वृक्षांची लागवड करणे व ती जगविण्याची जबाबदारी देण्यात आली. मागील वर्षी गडचिरोली जिल्ह्यातील विविध विभागांना ८८ लाख ५१ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र ९२ लाख ७२ हजार ८०५ वृक्षांची लागवड करण्यात आली. मागील वर्षी दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवड झाली. यावर्षी मात्र वृक्ष लागवडीचा उत्साह मावळला असल्याचे दिसून येते. वृक्षांची लागवड मुख्यत: पावसाळ्याच्या सुरूवातीला व पावसाळ्यात करण्यात येते. पावसाळा पूर्णपणे संपला आहे. त्यामुळे यानंतर आता वृक्ष लागवड करणे, जवळपास अशक्य आहे. असे असतांनाही केवळ ५२ लाख ५९ हजार ७१९ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. म्हणजेच दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ ५७.४ टक्केच वृक्षांची लागवड झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत वृक्ष लागवड कमी झाली आहे. यावरून नागरिकांचा शतकोटी वृक्ष लागवडीतील उत्साह मावळत चालला असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. कृषी विभागाने तर संपूर्ण जिल्ह्यात केवळ ३२० वृक्षांची लागवड केली आहे. (नगर प्रतिनिधी)