शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

57 टक्के लाेक अजूनही लसीकरणापासून दूरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 05:00 IST

सुरुवातीच्या कालावधीत नागरिकांमध्ये काेराेना लसविषयी गैरसमज असल्याने नागरिक लस घेण्यास धजावत नव्हते. मात्र आराेग्य विभागाने नागरिकांमध्ये जागृती केल्यानंतर हळूहळू नागरिक लसीकरणास पुढे येऊ लागले आहेत. त्यातही शहरी भागातील नागरिकांचेच जास्त प्रमाणात लसीकरण झाले असल्याचे दिसून येत आहे. लसीकरणाच्या तालुकानिहाय आकडेवारीकडे नजर टाकल्यास दुर्गम भागातील नागरिक लस घेण्यास तयार हाेत नसल्याचे दिसून येत आहे. 

दिगांबर जवादेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जास्तीत जास्त नागरिकांचे काेराेना लसीकरण व्हावे यासाठी आराेग्य विभाग व प्रशासन प्रयत्न करीत असला तरी जिल्ह्यातील १८ पेक्षा अधिक वय असलेल्या ४३ टक्केच नागरिकांचे लसीकरण झाले आहे. ५७ टक्के लाेकसंख्या अजूनही लसीकरणापासून दूरच असल्याचे दिसून येते. काेराेनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचे आव्हान आराेग्य विभागासमाेर आहे. सुरुवातीच्या कालावधीत नागरिकांमध्ये काेराेना लसविषयी गैरसमज असल्याने नागरिक लस घेण्यास धजावत नव्हते. मात्र आराेग्य विभागाने नागरिकांमध्ये जागृती केल्यानंतर हळूहळू नागरिक लसीकरणास पुढे येऊ लागले आहेत. त्यातही शहरी भागातील नागरिकांचेच जास्त प्रमाणात लसीकरण झाले असल्याचे दिसून येत आहे. लसीकरणाच्या तालुकानिहाय आकडेवारीकडे नजर टाकल्यास दुर्गम भागातील नागरिक लस घेण्यास तयार हाेत नसल्याचे दिसून येत आहे. गडचिराेली जिल्ह्यात १८ वर्ष वयाच्या पुढील लाेकसंख्या जवळपास ८ लाखाच्या घरात आहे. १८ वर्षापुढीलच नागरिकांना लस दिली जात असल्याने सध्या लसीकरणाचे उद्दिष्ट हेच मानावे लागेल. ६ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील ३ लाख ४२ हजार ६०३ नागरिकांना लस देण्यात आली आहे. १८ वर्ष वयाच्या पुढील लाेकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण ४३ टक्के आहे. त्यातही पहिला डाेस २ लाख ७९ हजार ६० नागरिकांनी तर दुसरा डाेस केवळ ६३ हजार ५४३ नागरिकांनी घेतला आहे. 

‘प्राेजेक्ट मुंबई’समाेर लसीकरणाचे आव्हानआजपर्यंत आराेग्य विभागाने लसीकरणाच्या जागृतीसाठी अनेक प्रयत्न केले आहेत. त्याचा ग्रामीण व शहरी भागात सकारात्मक परिणामही दिसून आला आहे. मात्र दुर्गम व आदिवासीबहूल भागात लसीकरणाचे प्रमाण अजूनही अत्यल्प आहे. लसीकरणाच्या जागृतीची जबाबदारी आता ‘प्राेजेक्ट मुंबई’ या संस्थेने घेतली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी व प्राेजेक्ट मुंबई यांच्यात ५ ऑगस्ट राेजी सामंजस्य करारही झाला. त्यामुळे आतापर्यंत आराेग्य विभागाला जे काम करणे शक्य झाले नाही ते काम प्राेजेक्ट मुंबई ही संस्था कशा पद्धतीने यशस्वी करून दाखविते याकडे जिल्हावासीयांचे लक्ष राहणार आहे.  

दुर्गम भागात लसीकरणाचे प्रमाण नगण्य

- एटापल्ली, भामरागड, सिराेंचा, काेरची, धानाेरा हे पाच तालुके आदिवासीबहूल आहेत. या तालुक्यांमध्ये मात्र लसीकरणाचे प्रमाण अतिशय कमी असल्याचे दिसून येते. 

- एटापल्ली तालुक्यात केवळ ६ हजार २५७, भामरागड तालुक्यात ५ हजार ५४२, धानाेरा तालुक्यात १४ हजार ६६३, काेरची तालुक्यात केवळ ९ हजार ५७ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.- संबंधित तालुक्यांची संख्या लक्षात घेतली तर हे प्रमाण १० टक्केपेक्षाही कमी असल्याचे दिसून येते. यावरून आराेग्य विभागाचे प्रयत्न अयशस्वी झाल्याचे दिसून येते.

- दुर्गम भागातील नागरिकांचे मन वळविण्याचे माेठे आव्हान आराेग्य विभागाला पेलावे लागणार आहे. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या