शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
2
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
3
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
4
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
5
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
6
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
7
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
8
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
9
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
10
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
12
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
13
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
14
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
15
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
16
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
17
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
18
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
19
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
20
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या

५७ लाखांचा निधी गेला परत

By admin | Updated: September 9, 2015 01:33 IST

जिल्ह्यात ७८ टक्के जंगल असून केवळ २२ टक्के जमीन आहे. यातही मोठ्या प्रमाणात वन जमीन असून जमिनीच्या बऱ्याच भागावर गाव व शहर वसले आहे.

शेतजमीन न मिळाल्याचा परिणाम : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनादिलीप दहेलकर गडचिरोलीजिल्ह्यात ७८ टक्के जंगल असून केवळ २२ टक्के जमीन आहे. यातही मोठ्या प्रमाणात वन जमीन असून जमिनीच्या बऱ्याच भागावर गाव व शहर वसले आहे. कसण्यायोग्य शेतजमीन खरेदीसाठी न मिळाल्यामुळे शासनाकडून सन २००४-०५ ते २००६-०७ या तीन वर्षात सहायक आयुक्त समाज कल्याण गडचिरोलीला कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभीमान योजनेंतर्गत मिळालेला तब्बल ५७ लाख ९ हजारांचा निधी शासनाला परत गेल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. अनुसूचित जातीमधील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजूर व नवबौध्द घटकांच्या सबलीकरणासाठी राज्य शासनाने कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजना सुरू केली. गडचिरोली जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी २००४-०५ या वर्षांपासून सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व सांस्कृतिक कार्यक्रीडा व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जातीतील दारिद्र्यरेषेखालील भूमिहिन शेतमजूर परित्यक्त्या, विधवा व स्त्रियांच्या कुटुंबीयांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण करून योजनेत बसणाऱ्या कुटुंबाला शासनाकडून चार एकर कोरडवाहू जमीन किंवा दोन एकर ओलिताखालील (बागायती) जमीन उपलब्ध करून देण्यात येते. त्यात ५० टक्के रक्कम बिनव्याजी कर्ज व ५० टक्के रक्कम अनुदानाची या आधारावर सदर योजना राबविली जाते. स्वाभिमान योजनेंतर्गत समाजकल्याण विभागाला २००४-०५ या वर्षात १० लाख, २००५-०६ या वर्षात ५० लाख, २००६-०७ या वर्षात १० लाख असे एकूण ७० लाखांचे अनुदान प्राप्त झाले. यापैकी ३७.५० लाखांची शेतजमीन खरेदी करण्यात आली असून १२.६४ लाख रूपये खर्च झाले आहे.आतापर्यंत १४ लाभार्थ्यांना मिळाला लाभसहायक आयुक्त समाज कल्याण विभाग गडचिरोलीच्या वतीने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेंतर्गत २००४-०५ पासून तर आतापर्यंत अनुसूचित जातीमधील दारिद्र्यरेषेखालील एकूण १४ लाभार्थ्यांना जमीन वितरित करून या योजनेचा लाभ देण्यात आला. २००४-०५ या वर्षात चामोर्शी तालुक्यातील वाघोली येथील तीन लाभार्थ्यांना ३ लाख २३ हजार रूपये किमतीची साडेसात एकर जमीन वितरित करण्यात आली. २००५-०६ या वर्षात सिरोंचा तालुक्यातील नऊ लाभार्थ्यांना ६ लाख ४७ हजार रूपये किमतीची २० एकर जमीन वितरित करण्यात आली. यामध्ये आठ एकर कोरडवाहू व १४ एकर ओलिताखालील शेतजमिनीचा समावेश आहे. २००६-०७ या वर्षात कोरची तालुक्यातील बेतकाठी येथील २ लाख ९४ हजार रूपये किमतीची आठ एकर कोरडवाहू शेतजमीन दोन लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली, अशी माहिती विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.दुष्काळामुळे केवळ दीड लाखांचीच कर्ज वसुलीसहायक आयुक्त समाज कल्याण विभाग गडचिरोलीच्या वतीने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभीमान योजनेंतर्गत आतापर्यंत एकूण १२ लाख ६४ हजार रूपयांची शेतजमीन खरेदी करण्यात आली. सदर शेतजमीन योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या १४ लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली. १२ लाख ६४ हजार रूपयांपैकी ६ लाख ३२ हजार रूपयांचे अनुदान विभागाला शासनाकडून मिळाले आहे. ५० टक्क्याच्या वाट्यानुसार लाभार्थ्यांवर ६ लाख ३२ हजार रूपयांचे बिनव्याजी कर्ज होते. यापैकी लाभार्थ्यांकडून केवळ दीड लाख रूपयांची कर्ज वसुली आतापर्यत झाली असून ४ लाख ३२ हजार रूपयांचे कर्ज या योजनेच्या लाभार्थ्यांवर शिल्लक असल्याची माहिती मिळाली आहे.