शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

५७ लाखांचा निधी गेला परत

By admin | Updated: September 9, 2015 01:33 IST

जिल्ह्यात ७८ टक्के जंगल असून केवळ २२ टक्के जमीन आहे. यातही मोठ्या प्रमाणात वन जमीन असून जमिनीच्या बऱ्याच भागावर गाव व शहर वसले आहे.

शेतजमीन न मिळाल्याचा परिणाम : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनादिलीप दहेलकर गडचिरोलीजिल्ह्यात ७८ टक्के जंगल असून केवळ २२ टक्के जमीन आहे. यातही मोठ्या प्रमाणात वन जमीन असून जमिनीच्या बऱ्याच भागावर गाव व शहर वसले आहे. कसण्यायोग्य शेतजमीन खरेदीसाठी न मिळाल्यामुळे शासनाकडून सन २००४-०५ ते २००६-०७ या तीन वर्षात सहायक आयुक्त समाज कल्याण गडचिरोलीला कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभीमान योजनेंतर्गत मिळालेला तब्बल ५७ लाख ९ हजारांचा निधी शासनाला परत गेल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. अनुसूचित जातीमधील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजूर व नवबौध्द घटकांच्या सबलीकरणासाठी राज्य शासनाने कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजना सुरू केली. गडचिरोली जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी २००४-०५ या वर्षांपासून सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व सांस्कृतिक कार्यक्रीडा व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जातीतील दारिद्र्यरेषेखालील भूमिहिन शेतमजूर परित्यक्त्या, विधवा व स्त्रियांच्या कुटुंबीयांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण करून योजनेत बसणाऱ्या कुटुंबाला शासनाकडून चार एकर कोरडवाहू जमीन किंवा दोन एकर ओलिताखालील (बागायती) जमीन उपलब्ध करून देण्यात येते. त्यात ५० टक्के रक्कम बिनव्याजी कर्ज व ५० टक्के रक्कम अनुदानाची या आधारावर सदर योजना राबविली जाते. स्वाभिमान योजनेंतर्गत समाजकल्याण विभागाला २००४-०५ या वर्षात १० लाख, २००५-०६ या वर्षात ५० लाख, २००६-०७ या वर्षात १० लाख असे एकूण ७० लाखांचे अनुदान प्राप्त झाले. यापैकी ३७.५० लाखांची शेतजमीन खरेदी करण्यात आली असून १२.६४ लाख रूपये खर्च झाले आहे.आतापर्यंत १४ लाभार्थ्यांना मिळाला लाभसहायक आयुक्त समाज कल्याण विभाग गडचिरोलीच्या वतीने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेंतर्गत २००४-०५ पासून तर आतापर्यंत अनुसूचित जातीमधील दारिद्र्यरेषेखालील एकूण १४ लाभार्थ्यांना जमीन वितरित करून या योजनेचा लाभ देण्यात आला. २००४-०५ या वर्षात चामोर्शी तालुक्यातील वाघोली येथील तीन लाभार्थ्यांना ३ लाख २३ हजार रूपये किमतीची साडेसात एकर जमीन वितरित करण्यात आली. २००५-०६ या वर्षात सिरोंचा तालुक्यातील नऊ लाभार्थ्यांना ६ लाख ४७ हजार रूपये किमतीची २० एकर जमीन वितरित करण्यात आली. यामध्ये आठ एकर कोरडवाहू व १४ एकर ओलिताखालील शेतजमिनीचा समावेश आहे. २००६-०७ या वर्षात कोरची तालुक्यातील बेतकाठी येथील २ लाख ९४ हजार रूपये किमतीची आठ एकर कोरडवाहू शेतजमीन दोन लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली, अशी माहिती विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.दुष्काळामुळे केवळ दीड लाखांचीच कर्ज वसुलीसहायक आयुक्त समाज कल्याण विभाग गडचिरोलीच्या वतीने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभीमान योजनेंतर्गत आतापर्यंत एकूण १२ लाख ६४ हजार रूपयांची शेतजमीन खरेदी करण्यात आली. सदर शेतजमीन योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या १४ लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली. १२ लाख ६४ हजार रूपयांपैकी ६ लाख ३२ हजार रूपयांचे अनुदान विभागाला शासनाकडून मिळाले आहे. ५० टक्क्याच्या वाट्यानुसार लाभार्थ्यांवर ६ लाख ३२ हजार रूपयांचे बिनव्याजी कर्ज होते. यापैकी लाभार्थ्यांकडून केवळ दीड लाख रूपयांची कर्ज वसुली आतापर्यत झाली असून ४ लाख ३२ हजार रूपयांचे कर्ज या योजनेच्या लाभार्थ्यांवर शिल्लक असल्याची माहिती मिळाली आहे.